शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पाणथळींसह खारफुटी वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा एल्गार

By नारायण जाधव | Updated: March 16, 2024 16:29 IST

शनिवारी विविध संघटनांनी एकत्र येऊन पाणथळींसह खारफुटी वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा एल्गार पुकारला.

नवी मुंबई : नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर एनआरआय आणि टीएस चाणक्य या पाणथळींसह नेरूळ सेक्टर-६० चा परिसर नवी मुंबई महापालिकेने आपल्या प्रारूप विकास आराखड्यात निवासी आणि वाणिज्यिक वापरासाठी खुला केला आहे. याविरोधात पर्यावरणप्रेमींत तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशातच परिसरातील खारफुटी वाचविण्यासाठी महापालिका, सिडको आणि वन खात्याकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने या विरोधात शहरातील पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. शनिवारी विविध संघटनांनी एकत्र येऊन पाणथळींसह खारफुटी वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा एल्गार पुकारला.

नवी मुंबई शहराचा फ्लेमिंगो सिटी असा उल्लेख करून महापालिकेने ठिकठिकाणी प्रतिकृती उभारल्या आहेत. मात्र, याच फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाणथळींवर बांधकामक्षेत्र प्रस्तावित केले आहे. महापालिकेेची ही भूमिका दुटप्पी असल्याचे पर्यावरणप्रेमी सुनील अगरवाल यांनी सांगितले. या ठिकाणी खारफुटी समूळ नष्ट होण्यासाठी केमिकल टाकण्यात येत असल्याचा प्रकार करण्यात येत आहे. शिवाय काही घटकांकडून तिला आगी लावण्याचे प्रकार घडत आहेत.राज्य शासनाने येथील खारफुटीक्षेत्राची पाहणी केली आहे. मात्र, ठोस कार्यवाही केलेली नाही. यामुळे खारफुटीसह फ्लेमिंगोचा अधिवास वाचविण्यासाठी शनिवारी अलर्ट सिटिजन फोरम एन्व्हायरमेंट लाईफ फाउंडेशन, संस्कार फाउंडेशन, प्रकल्पग्रस्त पालक संस्था यांनी आंदोलन केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई