शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या नादात पर्यावरणाचा विनाश

By admin | Updated: July 2, 2017 06:33 IST

विकासाच्या नादात पर्यावरणाचा विनाश होत असून, उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असल्याची खंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : विकासाच्या नादात पर्यावरणाचा विनाश होत असून, उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती ही मानवनिर्मित असल्याची खंत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यामुळे पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा संकल्प करून, तीन वर्षांत ५० कोटी झाडे लावण्याचा निर्धार सरकारने केला असल्याचेही ते म्हणाले. वन विभागामार्फत राबवल्या जात असलेल्या राज्यस्तरीय वृक्ष लागवडीच्या महामोहिमेच्या शुभारंभ प्रसंगी ते ऐरोली येथे उपस्थित होते.राज्यासह अनेक ठिकाणी सध्या पूरपरिस्थितीचा प्रसंग उद्भवत आहे; परंतु ही नैसर्गिक आपत्ती नसून मानवनिर्मित आपत्ती असल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. शहरांचा विकास करण्याच्या नादात जल, जंगल व जमीन यांचा विनाश होत चालला असून, नद्यांचे रूपांतर नाल्यात झाले आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन वन विभागामार्फत तीन वर्षांत राज्यात ५० कोटी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. गतवर्षी या मोहिमेला सुरुवात झाली असून, यंदा ४ कोटी झाडे लावली जाणार आहेत. त्याकरिता १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात वृक्ष लागवडीची महामोहीम राबवली जात आहे. त्याचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी ऐरोली येथील जैव विविधता केंद्रालगत करण्यात आला. या वेळी खाडीकिनारच्या मोकळ्या जागेत सुमारे १८०० वृक्षांचे रोपण करण्यात आले. राज्यात तीन वर्षांत एकूण ५० कोटी झाडे लावली जाणार असून, प्रत्येक झाड लावल्यानंतर जिओ टॅगिंगद्वारे त्यावर लक्ष ठेवले जात असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.‘जलयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत पाण्याचे स्रोत पुनरुजीवित करण्याचे काम सुरू असून, गाळमुक्त नदी, शिवार हे नवे धोरण राबवले जाणार असून, पर्यावरणपूरक जीवन जगण्याचा सरकारचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले. या वेळी ईशा फाउंडेशनचे प्रमुख सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या देशभर सुरू असलेल्या नदीबचाव कार्याची प्रशंसा मुख्यमंत्र्यांनी केली. तसेच राज्यात ही मोहीम राबवण्याकरिता सरकार त्यांच्यासोबत असल्याचे आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आगामी काळात पर्यावरणपूरक इंधनावर चालणाऱ्या वाहनांवर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. त्याची प्राथमिक सुरुवात नागपूरमध्ये बायो इंधनवर चालणाऱ्या ५५ बस सुरू करून केल्याचेही त्यांनी नमूद केले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात २० टक्केपेक्षा कमी हरित क्षेत्र असून, वृक्षारोपण महामोहिमेतून हे प्रमाण ३३ टक्क््यांपर्यंत करणार असल्याचा निर्धार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. कार्यक्रमास राज्यमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम, पालकमंत्री एकनाथ शिंदे, सद्गुरू जग्गी वासुदेव, महापौर सुधाकर सोनवणे, आमदार मंदा म्हात्रे आदी उपस्थित होते.संत तुकाराम वनग्राम पुरस्काराचे प्रदानवन संरक्षणाला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने राज्यात संत तुकाराम वनग्राम पुरस्कार दिला जातो. यानुसार २०१५चा हा पुरस्कार नागपूरमधील सोनापूर गावातील संयुक्त वन समितीला प्रदान करण्यात आला. दहा लाख रुपयांचा धनादेश व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. त्याशिवाय चंद्रपूरमधील पवनपार, लातूरमधील लांबोटा, नांदेडमधील बेंभरगाव, गोंदियामधील नवाटोळा व हिंगोलीमधील अंजनवाडा या गावांनाही द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.वन्यजीव सुरक्षा वाहनजंगलातील पशू-पक्ष्यांवर उपचार करता यावेत, त्यांना सुरक्षा मिळावी, याकरिता वन विभागातर्फे वन्यजीव सुरक्षा वाहन तयार करण्यात आले आहे. अशाप्रकारचे वाहन राज्यात प्रथमच वापरले जाणार असून, त्याद्वारे जखमी वन्यजीवांना वेळीच उपचार मिळणार आहेत. सद्यस्थितीला हे वाहन बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असणार आहे. मोटारसायकल रॅलीवृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. वृक्षारोपण सप्ताहाच्या सात दिवसांच्या कालावधीत ते ऐरोली ते नाशिक, अमरावती, बीड, अहमदनगर, पुणे व ठाणे असा सुमारे दोन हजार किलो मीटरचा प्रवास करणार आहेत.