शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

आरटीईअंतर्गत प्रवेशपत्र वाटपात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:56 IST

आरटीईअंतर्गत शालेय प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या पाल्यांना प्रवेशपत्र मिळण्यास विलंब होत आहे.

नवी मुंबई : आरटीईअंतर्गत शालेय प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या पाल्यांना प्रवेशपत्र मिळण्यास विलंब होत आहे. यामुळे प्रवेशासाठी पात्र ठरूनही प्रक्रियेतील विलंबामुळे अपात्र ठरण्याची चिंता पालकांना सतावत आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी गुरुवारी वाशीतील सहायता केंद्राबाहेर संताप व्यक्त केला.नुकत्याच पार पडलेल्या आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी घोषित झाली आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे आरटीई सहायता केंद्रात जमा केली जात आहेत. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला प्रवेशपत्र मिळाल्यानंतर पुढील प्रक्रियेअंती संबंधित शाळेत त्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. त्यानुसार वाशीतील पालिकेच्या शाळा क्रमांक २८ मध्ये कागदपत्रे जमा करण्यासाठी पालकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, आठवड्यापूर्वी ज्यांनी कागदपत्रे जमा केली आहेत, त्यांना प्रवेशपत्र देण्यात विलंब होत आहे. पात्र विद्यार्थ्यांची संख्या तीन हजारांच्या आसपास असून प्रवेशपत्र मात्र प्रतिदिन सुमारे शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांची दिली जात असल्याचा पालकांचा आरोप आहे. अशातच सलग येणाऱ्या सुट्यांमध्ये कार्यालय बंद असते. त्यामुळे प्रवेशपत्र मिळण्यास होणाºया विलंबामुळे अनेक विद्यार्थी यादीत नंबर लागूनही प्रवेशासाठी अपात्र ठरण्याची चिंता व्यक्त होत आहे.वाशीतील सहायता केंद्राबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करून पालकांनी असंतोष व्यक्त केला. या वेळी तिथल्या कर्मचाऱ्यांसोबतही काहींचा वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, केवळ खासगी शाळांच्या फायद्यासाठी प्रवेशपत्र वाटपात विलंब केला जात असल्याचा आरोप नितीन नाईक या पालकांनी व्यक्त केला. प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या उद्देशाने केंद्र वाढवावेत, अथवा प्रक्रिया गतिशील करावी, अशी मागणी यावेळी पालकांनी केली.अनेकदा त्याठिकाणी चौकशीसाठी गेलेल्या पालकांसोबत संवाद साधण्यात कर्मचारी टाळाटाळ करतात. त्यांच्याकडून सुरक्षा रक्षकामार्फतच पालकांपर्यंत मोघम माहिती पोहचवली जात असल्याचाही पालकांचा आरोप आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील घोळाचा मनस्ताप पालकांना सहन करावा लागत आहे.