शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

आरटीईअंतर्गत प्रवेशपत्र वाटपात दिरंगाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 23:56 IST

आरटीईअंतर्गत शालेय प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या पाल्यांना प्रवेशपत्र मिळण्यास विलंब होत आहे.

नवी मुंबई : आरटीईअंतर्गत शालेय प्रवेशप्रक्रियेच्या पहिल्या यादीत पात्र ठरलेल्या पाल्यांना प्रवेशपत्र मिळण्यास विलंब होत आहे. यामुळे प्रवेशासाठी पात्र ठरूनही प्रक्रियेतील विलंबामुळे अपात्र ठरण्याची चिंता पालकांना सतावत आहे. त्यामुळे संतप्त पालकांनी गुरुवारी वाशीतील सहायता केंद्राबाहेर संताप व्यक्त केला.नुकत्याच पार पडलेल्या आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेची पहिली यादी घोषित झाली आहे. यामध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची आवश्यक कागदपत्रे आरटीई सहायता केंद्रात जमा केली जात आहेत. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्याला प्रवेशपत्र मिळाल्यानंतर पुढील प्रक्रियेअंती संबंधित शाळेत त्याचा प्रवेश निश्चित होणार आहे. त्यानुसार वाशीतील पालिकेच्या शाळा क्रमांक २८ मध्ये कागदपत्रे जमा करण्यासाठी पालकांच्या रांगा लागत आहेत. मात्र, आठवड्यापूर्वी ज्यांनी कागदपत्रे जमा केली आहेत, त्यांना प्रवेशपत्र देण्यात विलंब होत आहे. पात्र विद्यार्थ्यांची संख्या तीन हजारांच्या आसपास असून प्रवेशपत्र मात्र प्रतिदिन सुमारे शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांची दिली जात असल्याचा पालकांचा आरोप आहे. अशातच सलग येणाऱ्या सुट्यांमध्ये कार्यालय बंद असते. त्यामुळे प्रवेशपत्र मिळण्यास होणाºया विलंबामुळे अनेक विद्यार्थी यादीत नंबर लागूनही प्रवेशासाठी अपात्र ठरण्याची चिंता व्यक्त होत आहे.वाशीतील सहायता केंद्राबाहेर मोठ्या संख्येने गर्दी करून पालकांनी असंतोष व्यक्त केला. या वेळी तिथल्या कर्मचाऱ्यांसोबतही काहींचा वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, केवळ खासगी शाळांच्या फायद्यासाठी प्रवेशपत्र वाटपात विलंब केला जात असल्याचा आरोप नितीन नाईक या पालकांनी व्यक्त केला. प्रशासनाने सर्व विद्यार्थ्यांना लाभ मिळावा या उद्देशाने केंद्र वाढवावेत, अथवा प्रक्रिया गतिशील करावी, अशी मागणी यावेळी पालकांनी केली.अनेकदा त्याठिकाणी चौकशीसाठी गेलेल्या पालकांसोबत संवाद साधण्यात कर्मचारी टाळाटाळ करतात. त्यांच्याकडून सुरक्षा रक्षकामार्फतच पालकांपर्यंत मोघम माहिती पोहचवली जात असल्याचाही पालकांचा आरोप आहे. त्यामुळे आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतील घोळाचा मनस्ताप पालकांना सहन करावा लागत आहे.