शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

उद्यानाच्या भिंतीवर अतिक्रमण; रहिवाशांनी मलवाहिन्यांची जागा हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 03:17 IST

उद्यानाच्या सुरक्षा भिंतीवर रहिवाशांनी घराच्या भिंती बांधून अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नवी मुंबई : उद्यानाच्या सुरक्षा भिंतीवर रहिवाशांनी घराच्या भिंती बांधून अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे. उद्यानालगतच्या एकापेक्षा अनेक रोहाउसधारकांनी अशा प्रकारे तिथली मलवाहिन्यांवरील मोकळी जागाही बळकावली आहे; परंतु उघडपणे ही बांधकामे होत असतानाही विभाग अधिकाºयांचे त्यावरील कारवाईकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.घणसोली नोडच्या हस्तांतरानंतर पालिकेने विभागात अनेक नागरी कामांना गती दिली आहे; परंतु ही विकासकामे केली जात असताना, त्या ठिकाणी होणाºया अतिक्रमणांकडे मात्र डोळेझाक होत आहे. उघड्या मैदानांवर चायनिज सेंटर चालवले जात असून, अनधिकृत टपºयांचेही प्रमाण वाढले आहे. अशातच लाखो रुपये खर्चून विकसित केलेल्या उद्यानाची भिंतच अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. घणसोली सेक्टर-४ येथील २१४ क्रमांकाच्या भूखंडावर पालिकेने स्थानिकांच्या सोयीसाठी उद्यान बनवले आहे. या उद्यानाच्या कामाच्या पाहणीनिमित्ताने अनेकदा पालिकेच्या अधिकाºयांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत, त्यानंतरही उद्यानाच्या भिंतीवर झालेले अतिक्रमण त्यांच्या नजरेतून सुटले कसे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.उद्यानाला लागूनच असलेल्या रहिवासी सोसायटीमधील सहा ते सात रोहाउसधारकांनी अशा प्रकारे जागा हडपलेली आहे. विशेष म्हणजे, हडपलेली जागा मलनि:सारण वाहिन्यांची असून, त्यावरच अतिक्रमण झालेले आहे.अंदाजे पाच ते सात फुटांची ही जागा हडपण्याकरिता उद्यानाच्या भिंतीवरच बांधकाम करण्यात आले आहे. यामुळे भविष्यात उद्यानाच्या भिंतीसह सदर अनधिकृत बांधकामांनाही धोका उद्भवू शकतो. तर मलनि:सारण वाहिन्या तुंबल्यास तिथली सफाई कशी करायची? असा प्रश्न पालिकेच्याच कर्मचाºयांना उद्भवणार आहे. शिवाय, भविष्यात उद्यानाचीही जागा हडपली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात काही महिन्यांपूर्वी परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींसह पालिका अधिकाºयांना तक्रारही केलेली आहे. त्यानंतरही उद्यानाच्या भिंतीवरील अतिक्रमण हटवण्यास टाळाटाळ होताना दिसत आहे. यामुळे पालिका अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई