शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

ग्रामीण भागात पक्ष बळकटीवर भर; कळंबोलीत राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2020 00:04 IST

सुरेश लाड यांची उपस्थिती

कळंबोली : रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पनवेल महापालिकेसह ग्रामीण भागात पक्षाची मोट बांधण्यास राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणिस खासदार सुनील तटकरे यांनी सुरुवात केली आहे. त्याकरिता कळंबोली येथील सुधागड विद्या संकुल सभागृहात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा संपन्न झाला.पनवेल महापालिकेसह ग्रामिण भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व प्रस्तापित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कळंबोली येथे शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पक्षवाढीवर भर देण्यात आला. त्याचबरोबर, स्थानिक समस्या सोडविण्यासह गावपातळीवर संघटन करण्यास कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्यात आले. कोरोनामुळे पनवेल महापलिका क्षेत्रात आलेल्या संकटावर मात करत, राष्ट्रवादीच्या माध्यमातून विविध समस्यांचे निरासन करण्यात आले आहे. कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या असल्याचे पालकमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले. भविष्यात पनवेल महापालिकासह तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगले दिवस येणार आहेत. त्याकरिता कार्यकर्त्यांनी उत्साहात कामाला सुरुवात करण्याच्या सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या. या कार्यक्रमासाठी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश भाऊ लाड, पनवेल जिल्हाध्यक्ष सतिश पाटील, सुरदास गोवारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.पनवेल परिसरात पाय रोवणार : पनवेल, उरण परिसरात राष्ट्रवादीचे वारे वाहायला लागले आहेत. येथील स्थानिक कामे, समस्या सोडविण्याचे काम राष्ट्रवादीच्या माध्यमातून केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत शेकापला आपले वर्चस्व प्रस्तापित करता आले नाही. तीन वेळा पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे पनवेल परिसरात राष्ट्रवादीने पाय रोवून पक्ष संघटन करण्यासाठीच कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आल्याचे खासगीत बोलले जात आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस