शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन जिनाच ठरतोय ‘आपत्ती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 00:19 IST

वाशीत अग्निशमन केंद्राच्या इमारतीत त्रुटी : पालिकेच्या अभियांत्रिकी विभागाचा दिव्याखाली अंधार

सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : वाशी येथील अग्निशमन केंद्राच्या इमारतीच्या बांधकामावेळी आपत्कालीन जिन्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी लोखंडी जिना बसवण्यात आला आहे. त्यातही नियोजनाचा अभाव व सुरक्षेच्या बाबींकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आपत्कालीन जिनाच आपत्कालीन परिस्थितीला कारणीभूत ठरू शकतो.

महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून वाशी येथील अग्निशमन केंद्रासाठी प्रशस्त इमारत उभारली आहे. या अग्निशमन केंद्राचा वरचा मजला प्रशासकीय कार्यालयांसाठी बनवण्यात आला असून, सध्या तेथे वाशी विभागाचे विद्युत, पाणीपुरवठा व अभियांत्रिकी कार्यालय चालत आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अग्निशमन केंद्राच्या आतील बाजूस लोखंडी जिना बसवण्यात आला आहे.  ज्या ठिकाणी बेसमेंट पार्किंग बनवण्यात आले आहे, त्याच्याच वरच्या भागावर हा आपत्कालीन लोखंडी जिना बसवला आहे. त्यासाठी बेसमेंटच्या छताला खालील बाजूने लोखंडी पट्टीचा नटाद्वारे आधार देण्यात आला आहे. जिना उभारताच तिथल्या बीमच्या भागाला तडादेखील गेला होता. यामुळे १०० टनाहून अधिक वजनाच्या जिन्याचा भार बेसमेंटचे छत किती काळ पेलू शकेल याबाबत शंका आहे. विशेष म्हणजे बेसमेंटच्या वरच्या भागावर अग्निशमन दलाची ३५ टन वजनाची ‘ब्रँटो’ गाडी उभी करण्यास मनाई आहे. यानंतरही त्या ठिकाणी लोखंडी जिना उभारलाच कसा, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. यावरून पालिका अधिकाऱ्यांच्या बौद्धिक क्षमतेवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधला १०० टनाचा लोखंडी जिना 

n इमारतीचे बांधकाम करताना त्या ठिकाणी आपत्कालीन जिना उभारण्याचा विसर पडला असावा. यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सुमारे १०० टनाचा हा लोखंडी जिना बसवण्यात आला आहे. 

n बांधकामाच्या रचनेनुसार तीस मीटर अंतरावर दोन जिने आवश्यक आहेत. परंतु आराखड्यात आपत्कालीन जिन्याचा विसर पडल्याने बांधकाम पूर्ण झाल्यानंतर मुख्य जिन्याला लागूनच तो बसवण्यात आला. 

n मात्र खासगी बांधकामातील त्रुटींवर बोट ठेवणाऱ्या प्रशासनाला स्वतःच्याच बांधकामातील त्रुटी दिसल्या नाहीत याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

परिस्थिती बिघडल्यास बाधावास्तविक हा जिना आपत्कालीन परिस्थितीत वापरासाठी बसवला असून, तो जिनाच आपत्कालीन परिस्थितीला कारणीभूत ठरू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई