शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

सुरक्षारक्षकाच्या कष्टाच्या पैशांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:47 IST

एटीएममधून पैशांचा अपहार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोपरखैरणेमधील सुरक्षारक्षकाच्या बँक खात्यामधून तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आले आहेत.

नवी मुंबई : एटीएममधून पैशांचा अपहार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोपरखैरणेमधील सुरक्षारक्षकाच्या बँक खात्यामधून तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आले आहेत. कष्टाचे पैसे परत मिळावे यासाठी सुरक्षारक्षक बँकेसह पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे घालत असून न्याय मिळावा यासाठी सर्वांना साकडे घालत आहे.सुरक्षारक्षक बोर्डाच्यावतीने एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या विकास भिलारे यांचे युनियन बँकेमध्ये खाते आहे. २५ फेब्रुवारीला त्यांनी बँकेच्या कोपरखैरणेमधील एटीएम सेंटरमधून ३ हजार रूपये काढले होते. यानंतर एटीएममधून पैशांचा अपहार करणाऱ्या टोळीने १२ मार्चला त्यांच्या एटीएममधून कोपरखैरणे एटीएममधूनच दहा हजार रूपये काढले. थोड्या वेळामध्ये पुन्हा दहा व नंतर पाच हजार असे एकूण २५ हजार रूपये काढले. पुन्हा याच दिवशी ४ हजार, दोन वेळा दहा हजार व पुन्हा ५ हजार रूपये काढले. एकाच दिवशी बँक खात्यामधून तब्बल ५४ हजार रूपये काढले. १३ मार्चला एकाच दिवशी ४६ हजार ८९९ रूपये बँकेतून काढले. दोन वेळा दहा हजार, एकवेळ पाच हजार, १२९०० व ८९९९ रूपये बँकेतून काढले. तिसºया दिवशी एटीएममधून पुन्हा २५ हजार रूपये काढण्यात आले असून बंगळुरूमधील लक्ष्मी गारमेंट दुकानामधून २५ हजार रूपयांची खरेदी केली आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार ८९९ रूपये कोणीतरी काढले आहेत.भिलारे यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे गेल्याची गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी त्यांना बँकेत जाण्याचा सल्ला दिला. बँकेत जावून याविषयी विचारणा केल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना कोणतीही मदत केली नाही व सायबर सेलकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यांनी सायबर सेलकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी म्हणणे ऐकून घेतले व पुन्हा बँकेत जावून औपचारिकता पूर्ण करण्यास सांगितले.या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. बँकेनेही या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिले नाही. भिलारे यांनी त्यांच्या वेतनातून पैसे वाचवून ठेवले होते. काटकसरीने खर्च करून भविष्यासाठी ठेवलेले पैसे गेल्यामुळे त्यांना धक्का बसला असून याप्रकरणी न्याय देण्याची मागणी केली आहे.टोळी सक्रियबँक खाते हॅक करून पैसे हडपणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय झाली आहे. घणसोली सेक्टर ७ मध्ये राहणाºया वर्षा गोळे यांच्या यांच्या इंड्सइंड बँक खात्यातून एक लाख रूपये काढले आहेत. बंगळुरूमधून हे पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. भिलारे यांच्या खात्यातूनही बंगळुरूमध्ये खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.>एवढे पैसे निघाले कसेभिलारे यांच्या बँक खात्यातून तीन दिवसामध्ये १ लाख ५० हजार रूपये गेले आहेत. पहिल्या दिवशी ५४ हजार, दुसºया दिवशी ४६ हजार व तिसºया दिवशी २५ हजार रूपये काढण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना दिवसा जास्तीत जास्त दहा ते २५ हजार रूपये काढता येतात. पण ५० हजार पेक्षा जास्त पैसे काढल्याने बँकेच्या सुरक्षा यंत्रणेविषयीही शंका उपस्थित केली जात आहे.>बँकेसह पोलिसांची उदासीनतासुरक्षारक्षकाच्या बँक खात्यातून तीन दिवसात दीड लाख रूपये गेले. घणसोलीमधील एका व्यक्तीच्या खात्यातून एक लाख रूपयांचा अपहार झाला. दोन्ही प्रकारामध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. बँकांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी होवू लागली आहे.>कष्ट करून साठविलेल्या पैशातील दीड लाख रूपये तीन दिवसांत चोरट्यांनी हडप केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना पकडावे व बँकेने पैसे परत मिळवून द्यावे एवढीच अपेक्षा आहे.- विकास भिलारे, सुरक्षारक्षक