शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षारक्षकाच्या कष्टाच्या पैशांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 02:47 IST

एटीएममधून पैशांचा अपहार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोपरखैरणेमधील सुरक्षारक्षकाच्या बँक खात्यामधून तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आले आहेत.

नवी मुंबई : एटीएममधून पैशांचा अपहार करणारी आंतरराष्ट्रीय टोळी शहरात सक्रिय झाली आहे. कोपरखैरणेमधील सुरक्षारक्षकाच्या बँक खात्यामधून तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार रुपये परस्पर काढण्यात आले आहेत. कष्टाचे पैसे परत मिळावे यासाठी सुरक्षारक्षक बँकेसह पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे घालत असून न्याय मिळावा यासाठी सर्वांना साकडे घालत आहे.सुरक्षारक्षक बोर्डाच्यावतीने एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये कार्यरत असलेल्या विकास भिलारे यांचे युनियन बँकेमध्ये खाते आहे. २५ फेब्रुवारीला त्यांनी बँकेच्या कोपरखैरणेमधील एटीएम सेंटरमधून ३ हजार रूपये काढले होते. यानंतर एटीएममधून पैशांचा अपहार करणाऱ्या टोळीने १२ मार्चला त्यांच्या एटीएममधून कोपरखैरणे एटीएममधूनच दहा हजार रूपये काढले. थोड्या वेळामध्ये पुन्हा दहा व नंतर पाच हजार असे एकूण २५ हजार रूपये काढले. पुन्हा याच दिवशी ४ हजार, दोन वेळा दहा हजार व पुन्हा ५ हजार रूपये काढले. एकाच दिवशी बँक खात्यामधून तब्बल ५४ हजार रूपये काढले. १३ मार्चला एकाच दिवशी ४६ हजार ८९९ रूपये बँकेतून काढले. दोन वेळा दहा हजार, एकवेळ पाच हजार, १२९०० व ८९९९ रूपये बँकेतून काढले. तिसºया दिवशी एटीएममधून पुन्हा २५ हजार रूपये काढण्यात आले असून बंगळुरूमधील लक्ष्मी गारमेंट दुकानामधून २५ हजार रूपयांची खरेदी केली आहे. तीन दिवसांमध्ये तब्बल १ लाख ५० हजार ८९९ रूपये कोणीतरी काढले आहेत.भिलारे यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे गेल्याची गोष्ट निदर्शनास आल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. त्यांनी एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी त्यांना बँकेत जाण्याचा सल्ला दिला. बँकेत जावून याविषयी विचारणा केल्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना कोणतीही मदत केली नाही व सायबर सेलकडे तक्रार करण्यास सांगितले. त्यांनी सायबर सेलकडे तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी म्हणणे ऐकून घेतले व पुन्हा बँकेत जावून औपचारिकता पूर्ण करण्यास सांगितले.या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. बँकेनेही या प्रकरणी गांभीर्याने लक्ष दिले नाही. भिलारे यांनी त्यांच्या वेतनातून पैसे वाचवून ठेवले होते. काटकसरीने खर्च करून भविष्यासाठी ठेवलेले पैसे गेल्यामुळे त्यांना धक्का बसला असून याप्रकरणी न्याय देण्याची मागणी केली आहे.टोळी सक्रियबँक खाते हॅक करून पैसे हडपणारी आंतरराज्यीय टोळी सक्रिय झाली आहे. घणसोली सेक्टर ७ मध्ये राहणाºया वर्षा गोळे यांच्या यांच्या इंड्सइंड बँक खात्यातून एक लाख रूपये काढले आहेत. बंगळुरूमधून हे पैसे काढण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. भिलारे यांच्या खात्यातूनही बंगळुरूमध्ये खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे.>एवढे पैसे निघाले कसेभिलारे यांच्या बँक खात्यातून तीन दिवसामध्ये १ लाख ५० हजार रूपये गेले आहेत. पहिल्या दिवशी ५४ हजार, दुसºया दिवशी ४६ हजार व तिसºया दिवशी २५ हजार रूपये काढण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना दिवसा जास्तीत जास्त दहा ते २५ हजार रूपये काढता येतात. पण ५० हजार पेक्षा जास्त पैसे काढल्याने बँकेच्या सुरक्षा यंत्रणेविषयीही शंका उपस्थित केली जात आहे.>बँकेसह पोलिसांची उदासीनतासुरक्षारक्षकाच्या बँक खात्यातून तीन दिवसात दीड लाख रूपये गेले. घणसोलीमधील एका व्यक्तीच्या खात्यातून एक लाख रूपयांचा अपहार झाला. दोन्ही प्रकारामध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. बँकांनीही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. या प्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध घ्यावा, अशी मागणी होवू लागली आहे.>कष्ट करून साठविलेल्या पैशातील दीड लाख रूपये तीन दिवसांत चोरट्यांनी हडप केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना पकडावे व बँकेने पैसे परत मिळवून द्यावे एवढीच अपेक्षा आहे.- विकास भिलारे, सुरक्षारक्षक