शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

एमएमआरडीएविरोधात १२४ गावांचा एल्गार, पाच दिवसांत विराेधाची धार आणखी तीव्र होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2024 12:15 IST

या क्षेत्रातील अधिसूचित १२४ गावांतील जवळपास सहा हजार ग्रामस्थांनी बुधवारी कोकण भवन येथील नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांकडे हरकती सादर केल्या.

नवी मुंबई : एमएमआरडीएच्या माध्यमातून अटल सेतू प्रभावित क्षेत्रात प्रस्तावित केलेल्या नवनगर प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. या क्षेत्रातील अधिसूचित १२४ गावांतील जवळपास सहा हजार ग्रामस्थांनी बुधवारी कोकण भवन येथील नगर रचना विभागाच्या सहायक संचालकांकडे हरकती सादर केल्या.

राज्य शासनाने सादर केलेल्या नवनगर प्रकल्पाच्या प्रारूप आराखड्यात अनेक त्रुटी असून त्यामुळे येथील ग्रामस्थांची शंभर टक्के जमीन हिरावून घेतली जाणार असल्याचा आक्षेप ग्रामस्थांनी नोंदविला आहे. 

सिडकोच्या खोपटा प्रकल्पातील ३२  आणि नैना क्षेत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील ८० अशा १२४ गावांचा समावेश करून नवनगर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४ मार्चपासून  हरकती मागविल्या आहेत.  या विभागातील ग्रामस्थांनी प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला आहे. याचाच एक भाग म्हणून  हरकती सादर केल्या.

नवी मुंबई प्रकल्पासारखी स्थिती होण्याची भीतीमुंबई पारबंदर प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी नवनगर प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. याअंतर्गत अधिसूचित १२४ गावांतील जमिनीसंपादित केल्या जाणार आहेत. नवी मुंबई प्रकल्पात झाले, तेच या नवनगर प्रकल्पात होण्याची शक्यता आहे, असे ग्रामस्थांनी सांगितले.

३ एप्रिलपर्यंतची मुदत    बुधवारी कोकण भवन येथील सहसंचालक नगररचना कार्यालयात जवळपास सहा हजार हरकती सादर केल्या.     शेतकऱ्यांनी नगर रचना विभागाच्या सहसंचालकांकडे सादर केलेल्या अर्जात ९ मुद्यांवर हरकत नोंदविली आहे.       हरकती नोंदविण्यासाठी ३ एप्रिलपर्यंतची मुदत आहे. चार पाच दिवसांत  हरकती नोंदविण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई