शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

एलिफंटा बेटावरील १० लाख पर्यटकांची गैरसोय होणार दूर

By नारायण जाधव | Updated: November 15, 2023 17:46 IST

शेतबंदर बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसह होणार रुंदीकरणासह ३८.६७ कोटींच्या खर्चास मान्यता.

नवी मुंबई : मुंबई आणि नवी मुंबई या दोन महानगरांच्या मधोमध असलेल्या जगप्रसिद्ध घारापुरी अर्थात एलिफंटा बेटावरील जेट्टीलगत असलेल्या बंधाऱ्याची देखभाल दुरुस्तीअभावी दुरवस्था झाली आहे. घारापुरी बेटावर असलेल्या जगप्रसिद्ध एलिफंटा लेणी आणि तेथील शिवलिंगच्या दर्शनासाठी जगभरातून दरवर्षी १० लाखांहून पर्यटक येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी येथील जेट्टीलगत असलेल्या शेतबंदर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचा निर्णय आता गृह विभागाने घेतला असून त्यासाठी ३८ कोटी ६७ लाख २७ हजार ८७७ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे.

शेतबंदर (घारापुरी) हे गाव एलिफंटा बेटावर वसलेले असून हे बेट मुंबईपासून नऊ सागरी मैल अंतरावर आहे. या लहान बेटाच्या आजूबाजूला सर्वत्र समुद्राचा वेढा असल्याने येथे ये-जा करण्यासाठी जलमार्गानेच प्रवास करावा लागतो. येथील शिवकालीन लेणी पाहण्यासाठी वर्षभरात सुमारे १० लाखांहून अधिक पर्यटक ये-जा करतात.

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान- घारापुरी लेणी जागतिक प्रेक्षणीय स्थळ असून युनेस्कोच्या जागतिक वारसा हक्कांच्या यादीत आहे. येथील जेट्टीला लागून असलेला बंधारा हा विस्कळीत झालेला असून तो ठिकठिकाणी तुटलेला आहे. पर्यटकांची वाढती गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून त्याची दुरुस्ती करून त्याचे रुंदीकरण गरजेचे आहे. याबाबत घारापुरी बेटावर पाच गावांतील स्थानिक रहिवासी, पर्यटक आणि बंदर विभागाने गृहविभागाकडे वारंवार मागणी केली आहे. अखेर तिची दखल घेऊन उशिरा का होईना आता शेतबंदर बंधाऱ्याची दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी ३८ कोटी ६७ लाख २७ हजार ८७७ रुपयांच्या खर्चास गेल्या आठवड्यात प्रशासकीय मान्यता दिली आहे.

पर्यावरण परवानगीनंतर कामास सुरुवात- गृह विभागाने शेतबंदर बंधाऱ्यांच्या दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी आवश्यक खर्चास मान्यता दिल्याने आता मेरिटाइम बोर्डास आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीची मान्यता घेऊन आणि राज्य आणि केंद्रीय पर्यावरण खात्याच्या आवश्यक त्या परवानग्या घेऊन करता येणार आहे. मेरिटाइम बोर्डास स्वनिधीतूनच का खर्च करावा लागणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई