शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

देशी विदेशी लाखो पर्यटकांच्या गर्दीने बहरले एलिफंटा बेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 19:32 IST

सणासुदीच्या आठ दिवसांत पर्यटकांची संख्या तीनपटीने वाढली

मधुकर ठाकूर

उरण : मागील १० दिवसांपासून सुट्ट्या, सणाच्या निमित्ताने गेटवे ऑफ इंडिया वरुन एलिफंटा बेटावर लेणी पाहण्यासाठी पर्यटकांची संख्या तीनपटीने वाढली आहे.नवीन वर्षांच्या पहिल्या आठवड्यापर्यत तरी बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांचा वाढता ओघ कायमच राहणार असल्याची शक्यता आहे.मात्र रविवारी (३१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेटवे ऑफ इंडियाला दिलेल्या भेटीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव सकाळीच एलिफंटा ,मांडवा सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक तीन तास बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे हजारो पर्यटकांचा खोळंबा झाला असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्था, मुंबई मेरिटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा दरम्यान जलमार्गावरुन दररोज साधारणपणे दोन हजारपर्यत देशी-विदेशी पर्यटक घारापुरी लेणी पाहण्यासाठी येतात.सण, सुट्टीत यामध्ये थोडीफार वाढ होते.मात्र ख्रिसमस, थर्टी फर्स्ट,नवीन वर्षाच्या अगोदरपासूनच एलिफंटा बेटावर पर्यटनासाठी येणाऱ्या देशी विदेशी पर्यटकांची संख्या दुपटीहूनही अधिक वाढली असल्याची माहिती मुंबई मेरिटाईम बोर्डाचे घारापुरी बंदर निरीक्षक विनायक करंजे यांनी दिली.तर एलिफंटाच बेटावरच नव्हे तर गेटवे ऑफ इंडिया येथुन मांडवा - अलिबाग जलमार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तोबा गर्दी झाली आहे.त्यामुळे मागील आठ-दहा दिवसांपासून एलिफंटा , अलिबाग -मांडवा या  सागरी मार्गावरील प्रवाशांची वाहतूक तीन पटीने वाढली आहे.

त्यामुळे जलवाहतूकीवरही प्रचंड ताण पडला आहे.नवीन वर्षातही एलिफंटा बेटावर जाणाऱ्या पर्यटकांचा वाढता ओघ कायम राहणार असल्याची शक्यताही मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव मामुमुल्ला आणि मुंबई मेरिटाईम बोर्डाचे घारापुरी बंदर निरीक्षक विनायक करंजे यांनी माहिती देताना व्यक्त केली आहे.तर मागील ८-१० दिवसांपासून घारापुरी बेटावर देशी-विदेशी पर्यटकांचा ओघ दुपटीहून अधिक वाढला असल्यामुळे कार्यरत असलेल्या विविध विभागांच्या सुरक्षा यंत्रणांवरही प्रचंड प्रमाणात ताण वाढला असल्याचे घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले.

 उरण येथील पीरवाडी बीच, पीरवाडी दर्गा आदी ठिकाणी पिकनिकसाठी येणाऱ्या हौशी पर्यटकांच्या संख्येत मागील आठ-दहा दिवसांपासून वाढ झाली आहे.त्यामुळे भाऊचा धक्का -मोरा या सागरी मार्गावरील प्रवाशांच्या वाहतूकीतही दुपटीने वाढ झाली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक एन.एस.कोळी यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांमुळे हजारो पर्यटकांचा तीन तास खोळंबा

गेटवे ऑफ इंडियाच्या मुंबई येथील ऐतिहासिक स्मारकाला  रविवारी (३१) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळीच भेट दिली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या भेटी दरम्यान सूरक्षेच्या कारणास्तव गेटवे ऑफ इंडिया परिसर बंद ठेवण्यात आला होता. यामुळे तीन तास सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने एलिफंटा, मांडवा येथे जाणाऱ्या हजारो पर्यटकांचा चांगलाच खोळंबा झाला. सकाळी ११ वाजल्यानंतरच एलिफंटा, मांडवा या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली असल्याची माहिती मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव मामुमुल्ला यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण