शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले, शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 14:12 IST

निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले बनल्याची शंका निर्माण होत आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

नवी मुंबई- निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले बनल्याची शंका निर्माण होत आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते नवी मुंबईत बोलत होते. कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अवघड नाही. सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. सत्तेचा गैरवापर करणं चुकीचं असल्याचं म्हणत पवारांनी भाजपावर निशाणा साधला आहे.कशाची पार्श्वभूमी नसताना शिवछत्रपतींनी जनतेच स्वराज्य निर्माण केलं. मोठी पार्श्वभूमी छत्रपतींना नव्हती. अनेक घटक त्यांच्या सैन्यामध्ये सामील होते. त्यांच्या मदतीने उभं केलेलं राज्य लोकांसाठी निर्माण केलं. प्रतिगामी शक्तीला लगाम घालण्याच्या दृष्टीने ही निवडणूक आहे. संघटित येऊन परिवर्तनाची चळवळ उभारण्याची गरज आहे. सत्ता आल्यानंतर माजायचे नसते. पण भाजपला याचा विसर पडला आहे.कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारावर दबाव आणला. सत्तेचा गैरवापर केला. पण तेथील जनतेने हा दबाव झुगारुन लावला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खटले भरले. एकूणच देशभरात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. शेतकरी संकटात आहे. पिकवलेला माल रस्त्यावर फेकून देत आहेत. पण सरकार दखल घेत नाही. देशभरात शेतक-यांची स्थिती सारखीच आहे. पण शेतक-यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी करू नये.सध्या लोकांचे मतपरिवर्तन होत आहे. विविध पोटनिवडणुकीतून हे स्पष्ट झाले आहे. पालघरमध्ये विविध पक्षांनी एकत्रित येऊन हितेंद्र ठाकूर यांना विचारात घेतले असते तर चित्र वेगळे असते. गोंदियाच्या पोटनिवडणुकीत मोठा गोंधळ करण्यात आला. निवडणूक यंत्र बंद पडली. उन्हामुळे हे यंत्र बंद पडल्याचा हास्यास्पद खुलासा करण्यात आला. एकूणच या निवडणुकीत भाजपाने साम, दाम आणि दंड या भूमिकेचा सत्ताधा-यांकडून अवलंब करण्यात आला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार