शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

करळ-बेलापूर रस्त्यांवर आठ तास ट्रॅफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:36 IST

ट्रेलरचालकांची मनमानी : १२ कि.मी.पर्यंत वाहनांची रांग

उरण : बेशिस्त ट्रेलरचालक आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे जेएनपीटी मार्गावरील करळ-बेलापूर दरम्यान आणि कळंबोली-जेएनपीटी या रस्त्यावरील वाहतूक शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासूनच ठप्प झाली होती. सुमारे आठ तास ट्रॅफिक जाम झाल्याने रस्त्यावर १२ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची समस्या उद्भवल्याने सकाळीच निघालेल्या शालेय विद्यार्थी, कामगार, प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

जेएनपीटी-बेलापूर आणि जेएनपीटी-कळंबोली दरम्यानच्या रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या ही नित्याचीच बाब ठरली आहे. या दोन्ही मार्गावर वाहतूक नियम मोडीत काढीत शेकडो कंटेनर दुतर्फा रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्र्किं ग करून ठेवले जातात. दुतर्फा पार्र्किं गमुळे मात्र वाहतूककोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामध्ये बेशिस्त कंटेनरचालकांची भर पडत असल्याने या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. गुरुवारी संध्याकाळपासून जांभूळपाडा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली, तसेच मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी अनेक वाहने बंद पडलेली होती. त्यामुळे या दोन्ही मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली. याआधीच या दोन्ही मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामध्ये जांभूळपाडा मार्गावर वाहतूक बंद केल्याने या दोन्ही मार्गावरील वाढलेल्या प्रचंड वाहतुकीच्या गर्दीमुळे शुक्रवारी जेएनपीटी मार्गावरील करळ-बेलापूर दरम्यान आणि कळंबोली-जेएनपीटी या रस्त्यावरील वाहतूक सकाळी ७ वाजल्यापासूनच ठप्प झाली होती.

वाहतूककोंडीमुळे दोन्ही मार्गावर सुमारे १२ कि.मी. अंतरापर्यंत वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. या वाहतूककोंडीचा मोठा फटका दररोज उरणहून मुंबई-वाशी-पनवेलकडे जाणाºया हजारो शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, प्रवासी आणि वाहनचालकांना बसला. अनेकांना वाहतूककोंडीमुळे वेळेत इच्छित स्थळी पोहोचता आले नाही. तर अनेकांवर वाहनांमध्येच अडकून बसण्याची पाळी आली.

गुरुवारी संध्याकाळपासून जांभूळपाडा मार्गावरील वाहतूक अचानक बंद करण्यात आली, त्यामुळे या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली. मात्र, वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्मचारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, वाहतुकीची कोंडी सोडविण्यात अपयश आल्याने वाहतूककोंडीची समस्या आणखी गंभीर बनली होती. १२ वाजल्यानंतर वाहतुकीची कोंडी सुरुवात झाल्यानंतर वाहने पुढे सरकू लागली आणि दुपारी ३ वाजल्यापासून रहदारी संथगतीने सुरू झाली. जासई-गव्हाणफाटा-बेलापूर दरम्यानची वाहतूक वगळता उर्वरित मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली.