शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
3
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
4
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
5
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
6
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
7
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
8
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
9
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
10
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
11
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
12
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
13
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
14
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
15
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत
16
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
17
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
18
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
19
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
20
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी

करळ-बेलापूर रस्त्यांवर आठ तास ट्रॅफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:36 IST

ट्रेलरचालकांची मनमानी : १२ कि.मी.पर्यंत वाहनांची रांग

उरण : बेशिस्त ट्रेलरचालक आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे जेएनपीटी मार्गावरील करळ-बेलापूर दरम्यान आणि कळंबोली-जेएनपीटी या रस्त्यावरील वाहतूक शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासूनच ठप्प झाली होती. सुमारे आठ तास ट्रॅफिक जाम झाल्याने रस्त्यावर १२ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची समस्या उद्भवल्याने सकाळीच निघालेल्या शालेय विद्यार्थी, कामगार, प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

जेएनपीटी-बेलापूर आणि जेएनपीटी-कळंबोली दरम्यानच्या रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या ही नित्याचीच बाब ठरली आहे. या दोन्ही मार्गावर वाहतूक नियम मोडीत काढीत शेकडो कंटेनर दुतर्फा रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्र्किं ग करून ठेवले जातात. दुतर्फा पार्र्किं गमुळे मात्र वाहतूककोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामध्ये बेशिस्त कंटेनरचालकांची भर पडत असल्याने या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. गुरुवारी संध्याकाळपासून जांभूळपाडा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली, तसेच मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी अनेक वाहने बंद पडलेली होती. त्यामुळे या दोन्ही मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली. याआधीच या दोन्ही मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामध्ये जांभूळपाडा मार्गावर वाहतूक बंद केल्याने या दोन्ही मार्गावरील वाढलेल्या प्रचंड वाहतुकीच्या गर्दीमुळे शुक्रवारी जेएनपीटी मार्गावरील करळ-बेलापूर दरम्यान आणि कळंबोली-जेएनपीटी या रस्त्यावरील वाहतूक सकाळी ७ वाजल्यापासूनच ठप्प झाली होती.

वाहतूककोंडीमुळे दोन्ही मार्गावर सुमारे १२ कि.मी. अंतरापर्यंत वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. या वाहतूककोंडीचा मोठा फटका दररोज उरणहून मुंबई-वाशी-पनवेलकडे जाणाºया हजारो शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, प्रवासी आणि वाहनचालकांना बसला. अनेकांना वाहतूककोंडीमुळे वेळेत इच्छित स्थळी पोहोचता आले नाही. तर अनेकांवर वाहनांमध्येच अडकून बसण्याची पाळी आली.

गुरुवारी संध्याकाळपासून जांभूळपाडा मार्गावरील वाहतूक अचानक बंद करण्यात आली, त्यामुळे या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली. मात्र, वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्मचारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, वाहतुकीची कोंडी सोडविण्यात अपयश आल्याने वाहतूककोंडीची समस्या आणखी गंभीर बनली होती. १२ वाजल्यानंतर वाहतुकीची कोंडी सुरुवात झाल्यानंतर वाहने पुढे सरकू लागली आणि दुपारी ३ वाजल्यापासून रहदारी संथगतीने सुरू झाली. जासई-गव्हाणफाटा-बेलापूर दरम्यानची वाहतूक वगळता उर्वरित मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली.