शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

करळ-बेलापूर रस्त्यांवर आठ तास ट्रॅफिक जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 23:36 IST

ट्रेलरचालकांची मनमानी : १२ कि.मी.पर्यंत वाहनांची रांग

उरण : बेशिस्त ट्रेलरचालक आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहतूक नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांमुळे जेएनपीटी मार्गावरील करळ-बेलापूर दरम्यान आणि कळंबोली-जेएनपीटी या रस्त्यावरील वाहतूक शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासूनच ठप्प झाली होती. सुमारे आठ तास ट्रॅफिक जाम झाल्याने रस्त्यावर १२ कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीची समस्या उद्भवल्याने सकाळीच निघालेल्या शालेय विद्यार्थी, कामगार, प्रवाशांचे अतोनात हाल झाले.

जेएनपीटी-बेलापूर आणि जेएनपीटी-कळंबोली दरम्यानच्या रस्त्यांवर वाहतूककोंडीची समस्या ही नित्याचीच बाब ठरली आहे. या दोन्ही मार्गावर वाहतूक नियम मोडीत काढीत शेकडो कंटेनर दुतर्फा रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्र्किं ग करून ठेवले जातात. दुतर्फा पार्र्किं गमुळे मात्र वाहतूककोंडीची समस्या नित्याचीच झाली आहे. त्यामध्ये बेशिस्त कंटेनरचालकांची भर पडत असल्याने या दोन्ही मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. गुरुवारी संध्याकाळपासून जांभूळपाडा मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली, तसेच मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी अनेक वाहने बंद पडलेली होती. त्यामुळे या दोन्ही मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली. याआधीच या दोन्ही मार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते. त्यामध्ये जांभूळपाडा मार्गावर वाहतूक बंद केल्याने या दोन्ही मार्गावरील वाढलेल्या प्रचंड वाहतुकीच्या गर्दीमुळे शुक्रवारी जेएनपीटी मार्गावरील करळ-बेलापूर दरम्यान आणि कळंबोली-जेएनपीटी या रस्त्यावरील वाहतूक सकाळी ७ वाजल्यापासूनच ठप्प झाली होती.

वाहतूककोंडीमुळे दोन्ही मार्गावर सुमारे १२ कि.मी. अंतरापर्यंत वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. या वाहतूककोंडीचा मोठा फटका दररोज उरणहून मुंबई-वाशी-पनवेलकडे जाणाºया हजारो शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, कामगार, प्रवासी आणि वाहनचालकांना बसला. अनेकांना वाहतूककोंडीमुळे वेळेत इच्छित स्थळी पोहोचता आले नाही. तर अनेकांवर वाहनांमध्येच अडकून बसण्याची पाळी आली.

गुरुवारी संध्याकाळपासून जांभूळपाडा मार्गावरील वाहतूक अचानक बंद करण्यात आली, त्यामुळे या मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी वाढली. मात्र, वाहतूक नियंत्रण विभागाचे कर्मचारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, वाहतुकीची कोंडी सोडविण्यात अपयश आल्याने वाहतूककोंडीची समस्या आणखी गंभीर बनली होती. १२ वाजल्यानंतर वाहतुकीची कोंडी सुरुवात झाल्यानंतर वाहने पुढे सरकू लागली आणि दुपारी ३ वाजल्यापासून रहदारी संथगतीने सुरू झाली. जासई-गव्हाणफाटा-बेलापूर दरम्यानची वाहतूक वगळता उर्वरित मार्गावरील वाहतूक पूर्वपदावर आल्याची माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक माणिक नलावडे यांनी दिली.