शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
8
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
9
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
10
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
11
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
12
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
13
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
14
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
15
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
16
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
17
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
18
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
19
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
20
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:26 IST

निकालाच्या रखडपट्टीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाºया विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

नवी मुंबई : निकालाच्या रखडपट्टीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाºया विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला असून पैसे देखील भरले गेले आहेत, मात्र निकाल हाती नसल्याने मायदेशी परतावे लागते की काय अशी चिंता विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पैशांची जमवाजमव, विदेशात शिक्षणासाठी जाण्याची तयारी करूनही निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे.इतर शाखांच्या तुलनेने पदव्युत्तर शिक्षणासाठी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी जास्त असून निकाल न लागल्याने करिअर धोक्यात आले आहे.शेवटच्या वर्षाचे निकाल हे विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारे निकाल असतात. त्यामुळे त्या निकालांमध्ये झालेला घोळ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याशी होणारा खेळच आहे. रखडलेल्या निकालांमुळे विद्यार्थ्यांचे पुढच्या शिक्षणाचे मार्ग मोकळे होऊ शकत नाही. मुंबई विद्यापीठ या सर्व गोष्टींमध्ये अगदी हलगर्जीपणा दाखवत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. अनागोंदी कारभारामुळे गेली तीन ते चार वर्षे अभ्यास करून पदवीची परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या मानसिक तणावातून जात असून विद्यार्थ्यांचा ताण आणखी वाढल्याने पालकांनी असंतोष व्यक्त केला आहे. पेपर तपासणीत व निकालांच्या बाबतीत होणारे गोंधळ थांबवण्यासाठी विद्यापीठाने एक व्यवस्थित अशी यंत्रणा राबवली पाहिजे. नवी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी विदेशात उच्च शिक्षणासाठी अर्ज केले असूनही निकाल वेळेत न लागल्याने पैसे भरुनही वर्ष वाया जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील जवळपास ४० विद्यार्थी परदेशी गेले आहेत यामध्ये यूएसमधील युनिव्हर्सिटी आॅफ टेक्सास येथे एमएसकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षाचा निकाल हाती न आल्याने युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश दिला जात नसल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली. निकालाला आणखी विलंब झाल्यास मात्र पुन्हा मायदेशी परतावे लागेल यांची नाराजी या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर निकाल लावून विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठाने घ्यावी अशी मागणी यावेळी केली आहे.>भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव विनायक पिसाळ यांनी या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली असून प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांची प्रश्न मांडणार आहेत. यावेळी बोलताना विद्यापीठाचे खासगीकरण करणे आवश्यक असून त्याशिवाय गैरव्यवहार थांबणार नाहीत असेही पिसाळ यांनी स्पष्ट केले. परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नामुष्कीमुळे मायदेशी परतावे लागू नये, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. किमान गोपनीय कागदपत्रे पाठवून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी पिसाळ यांनी केली.