शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 03:26 IST

निकालाच्या रखडपट्टीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाºया विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे.

नवी मुंबई : निकालाच्या रखडपट्टीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाºया विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. परदेशातील युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला असून पैसे देखील भरले गेले आहेत, मात्र निकाल हाती नसल्याने मायदेशी परतावे लागते की काय अशी चिंता विद्यार्थी आणि पालकांकडून व्यक्त केली जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पैशांची जमवाजमव, विदेशात शिक्षणासाठी जाण्याची तयारी करूनही निकालाच्या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांची झोप उडाली आहे.इतर शाखांच्या तुलनेने पदव्युत्तर शिक्षणासाठी अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थी जास्त असून निकाल न लागल्याने करिअर धोक्यात आले आहे.शेवटच्या वर्षाचे निकाल हे विद्यार्थ्यांचे भविष्य ठरवणारे निकाल असतात. त्यामुळे त्या निकालांमध्ये झालेला घोळ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या भविष्याशी होणारा खेळच आहे. रखडलेल्या निकालांमुळे विद्यार्थ्यांचे पुढच्या शिक्षणाचे मार्ग मोकळे होऊ शकत नाही. मुंबई विद्यापीठ या सर्व गोष्टींमध्ये अगदी हलगर्जीपणा दाखवत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला आहे. अनागोंदी कारभारामुळे गेली तीन ते चार वर्षे अभ्यास करून पदवीची परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या मानसिक तणावातून जात असून विद्यार्थ्यांचा ताण आणखी वाढल्याने पालकांनी असंतोष व्यक्त केला आहे. पेपर तपासणीत व निकालांच्या बाबतीत होणारे गोंधळ थांबवण्यासाठी विद्यापीठाने एक व्यवस्थित अशी यंत्रणा राबवली पाहिजे. नवी मुंबईतील महाविद्यालयांमध्ये अभियांत्रिकी शाखेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांनी विदेशात उच्च शिक्षणासाठी अर्ज केले असूनही निकाल वेळेत न लागल्याने पैसे भरुनही वर्ष वाया जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील जवळपास ४० विद्यार्थी परदेशी गेले आहेत यामध्ये यूएसमधील युनिव्हर्सिटी आॅफ टेक्सास येथे एमएसकरिता गेलेल्या विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी शाखेच्या शेवटच्या वर्षाचा निकाल हाती न आल्याने युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश दिला जात नसल्याची माहिती ‘लोकमत’ला दिली. निकालाला आणखी विलंब झाल्यास मात्र पुन्हा मायदेशी परतावे लागेल यांची नाराजी या विद्यार्थ्यांकडून व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर निकाल लावून विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी विद्यापीठाने घ्यावी अशी मागणी यावेळी केली आहे.>भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सचिव विनायक पिसाळ यांनी या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली असून प्रभारी कुलगुरू देवानंद शिंदे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भेट घेऊन विद्यार्थ्यांची प्रश्न मांडणार आहेत. यावेळी बोलताना विद्यापीठाचे खासगीकरण करणे आवश्यक असून त्याशिवाय गैरव्यवहार थांबणार नाहीत असेही पिसाळ यांनी स्पष्ट केले. परदेशी गेलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या नामुष्कीमुळे मायदेशी परतावे लागू नये, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. किमान गोपनीय कागदपत्रे पाठवून विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येणार नाही याची खबरदारी घेण्याची मागणी पिसाळ यांनी केली.