शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

मोहाच्या बियांपासून बनवतात खाद्यतेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:36 IST

तेलाच्या घाण्यावर आदिवासींची झुंबड : उन्हाळ्यात जमा करतात फळे

रवींद्र सोनावळे

शेणवा: मोहाच्या बियांपासून तेल गाळून ते खास खाद्यासाठी वापर करण्याची परंपरा शहापूरच्या आदिवासी समाजाने जपली आहे. या तेलाला आयुर्वेदिक महत्त्व असल्याने मोहाच्या तेलाला प्रचंड मागणी आहे. दरवर्षी तेल गाळण्यासाठी पावसाळ्यात आदिवासींची लगबग असते. तेल गाळण्यासाठी सध्या शहापूरमधील गिरण्यांमध्ये आदिवासींनी एकच गर्दी केली आहे.

तालुक्यातील वासिंद, खर्डी, डोळखांब, किन्हवली, कसारा या दुर्गम भागांत वास्तव्य करणारे आदिवासी उन्हाळ्यात जंगलातून मोठ्या मेहनतीने मोहाची फळे गोळा करून आणतात. नंतर, त्यातील बिया काढून त्या उन्हाळ्यात सुकवतात. एका प्लास्टिकच्या पिशवीत व टोपल्या किंवा डब्यांमध्ये साठवून या बियांपासून खाद्यतेल गाळले जाते. तेलाची आम्ही विक्र ी न करता वर्षभर अन्नपदार्थ बनवण्यासाठी खाद्यतेल म्हणून वापरतो, असे गोदीबाई कुवरे व सीता खांजोडे या महिलांनी सांगितले. सध्या बियांपासून तेल गाळण्यासाठी गिरणीवर आदिवासींची झुंबड उडाली आहे. येथील गिरणीतील तेलाच्या घाण्यावर दिवसभरात रोज ७० ते ८० लीटर तेल गाळले जाते. मोहाच्या बियांनी भरलेला एक डबा तेल गाळण्यासाठी २० रु पये दर आकरला जातो, असे गिरणी कामगार रवींद्र हरड यांनी सांगितले. आॅगस्टअखेर अशीच गर्दी राहणार असल्याचे ते म्हणाले.गरीब आदिवासींकडे तेल गाळण्यासाठी पैसे असो वा नसो, एखाद्याची पैशांची चणचण असली, तरी त्या आदिवासींना माघारी न पाठवता त्यास मदत म्हणून विनामूल्य तेल गिरणीत गाळून दिले जाते.- नामदेव देसले, कामगार 

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पNavi Mumbaiनवी मुंबई