शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

मोहाच्या बियांपासून बनवतात खाद्यतेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 23:36 IST

तेलाच्या घाण्यावर आदिवासींची झुंबड : उन्हाळ्यात जमा करतात फळे

रवींद्र सोनावळे

शेणवा: मोहाच्या बियांपासून तेल गाळून ते खास खाद्यासाठी वापर करण्याची परंपरा शहापूरच्या आदिवासी समाजाने जपली आहे. या तेलाला आयुर्वेदिक महत्त्व असल्याने मोहाच्या तेलाला प्रचंड मागणी आहे. दरवर्षी तेल गाळण्यासाठी पावसाळ्यात आदिवासींची लगबग असते. तेल गाळण्यासाठी सध्या शहापूरमधील गिरण्यांमध्ये आदिवासींनी एकच गर्दी केली आहे.

तालुक्यातील वासिंद, खर्डी, डोळखांब, किन्हवली, कसारा या दुर्गम भागांत वास्तव्य करणारे आदिवासी उन्हाळ्यात जंगलातून मोठ्या मेहनतीने मोहाची फळे गोळा करून आणतात. नंतर, त्यातील बिया काढून त्या उन्हाळ्यात सुकवतात. एका प्लास्टिकच्या पिशवीत व टोपल्या किंवा डब्यांमध्ये साठवून या बियांपासून खाद्यतेल गाळले जाते. तेलाची आम्ही विक्र ी न करता वर्षभर अन्नपदार्थ बनवण्यासाठी खाद्यतेल म्हणून वापरतो, असे गोदीबाई कुवरे व सीता खांजोडे या महिलांनी सांगितले. सध्या बियांपासून तेल गाळण्यासाठी गिरणीवर आदिवासींची झुंबड उडाली आहे. येथील गिरणीतील तेलाच्या घाण्यावर दिवसभरात रोज ७० ते ८० लीटर तेल गाळले जाते. मोहाच्या बियांनी भरलेला एक डबा तेल गाळण्यासाठी २० रु पये दर आकरला जातो, असे गिरणी कामगार रवींद्र हरड यांनी सांगितले. आॅगस्टअखेर अशीच गर्दी राहणार असल्याचे ते म्हणाले.गरीब आदिवासींकडे तेल गाळण्यासाठी पैसे असो वा नसो, एखाद्याची पैशांची चणचण असली, तरी त्या आदिवासींना माघारी न पाठवता त्यास मदत म्हणून विनामूल्य तेल गिरणीत गाळून दिले जाते.- नामदेव देसले, कामगार 

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्पNavi Mumbaiनवी मुंबई