शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

आर्थिक विषमता समृद्ध राष्ट्राच्या निर्मितीतील मोठा अडथळा; कामगारांचे आर्थिक शोषण थांबले पाहिजे- सुधीर घरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2023 11:15 IST

भारतीय मजदूर संघाचे २० वे त्रयवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन पाटण्यातील केशव सरस्वती विद्या मंदिर, पटना येथे ७ ते ९ एप्रिल या कालावधीत संपन्न झाले.

उरण : खाजगी क्षेत्रांसोबत, सार्वजनिक उपक्रम व सरकारी संस्थांमध्ये एकाच कामासाठी वेगवेगळे  वेतन दिले जाते, काही ठिकाणी किमान वेतन  देखील दिले जात नाही. त्यामुळे कामगारांचे शोषण होते ते थांबले पाहिजे, त्याकरिता प्रबळ दबाव निर्माण करावा लागेल. आर्थिक विषमता समृद्ध राष्ट्राच्या निर्मितीतील मोठा अडथळा आहे. जसजशी देशाची प्रगती होत आहे तशी आर्थिक विषमता वाढत आहे. प्रगत व समृद्ध देशाची  निर्मिती होत असताना  कामगारांचे आर्थिक शोषण व आर्थिक विषमता थांबली पाहिजे असे असे विचार भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघ चे राष्ट्रीय कोषाध्यक्ष कामगार नेते सुधीर घरत यांनी भारतीय मजदूर संघाच्या पाटण्यात संपन्न होत असलेल्या २०व्या त्रैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात व्यक्त केले. 

भारतीय मजदूर संघाचे २० वे त्रयवार्षिक राष्ट्रीय अधिवेशन पाटण्यातील केशव सरस्वती विद्या मंदिर, पटना येथे ७ ते ९ एप्रिल या कालावधीत संपन्न झाले. या अधिवेशनात भारतीय मजदूर संघाशी संलग्न असणाऱ्या देशभरातील २९ राज्यातील ३८ फेडरेशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते. विशेष म्हणजे नेपाळ देशाने सुद्धा भारतीय मजदूर संघाच्या संघटनेला मान्यता दिली असून तेथील  पदाधिकारी अधिवेशनात सहभागी झाले होते .या अधिवेशनाचे उदघाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह तथा भारतीय मजदूर संघाचे पालक के.भाग्ययाजी   यांनी केले.

यावेळी भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरेन पंड्या, राष्ट्रीय महामंत्री रवींद्र हिमते, पूर्व अध्यक्ष साजी नारायणजी, केंद्रीय संघटन मंत्री बी. सुरेंद्रन, क्षेत्रीय संघटनमंत्री व्ही. राजेश,  उद्योग व पोर्ट फेडेरेशन प्रभारी चंद्रकांत ( अण्णा ) धुमाळ व राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी यांच्यासह २३०० पदाधिकारी या अधिवेशतात उपस्थित राहिले. भारतीय पोर्ट ॲण्ड डॉक मजदूर महासंघाच्या वतीने राष्ट्रीय महामंत्री कामगार नेते सुरेश पाटील उपस्थित होते. या अधिवेशनात महिलांकरिता विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते.  शोषण मुक्त, समता युक्त भारत निर्माण व्हावा याकरिता व महिलांना  सामाजिक सुरक्षा मिळावी असे ठराव अधिवेशनात  घेण्यात आले. भव्य अशी शोभा यात्रा  पटना शहरातून काढण्यात आली, त्याची सांगता सभेने झाली.