शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी महामार्गावर धुळीचे साम्राज्य; धुळीसोबत महामार्गावर लहान खडीच्या प्रमाणात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 19:25 IST

कळंबोली डी पॉईंट ते जेएनपीटी महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणा-यांना  श्वसनाच्या आजाराला आमंत्रण दिले जात आहे.

कळंबोली , अरुणकुमार मेहत्रे  : कळंबोली डी पॉईंट ते जेएनपीटी महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणा-यांना  श्वसनाच्या आजाराला आमंत्रण दिले जात आहे. त्याचबरोबर महामार्गावर लहान खडी जमा झाल्याने  दुचाकी वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरुन गाडी चालवावी लागत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर यंत्रणा जागे होणार का ? असा सवाल वाहनचालकाकडून केला  जात आहे. 

कळंबोली एमजीएम रुग्णालयापासून जेएनपीटी महामार्गाला सुरुवात होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्शवभुमीवर तेसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यामातून आठ लेन असलेला महमार्ग बांधण्यात आला आहे.  गोवा , पुणे , जेएनपीटी जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जातो. २०१६ साली बांधण्यात आलेल्या महामार्गकडे प्राधिकरणाकडून  दुर्लक्ष केल्याने महामार्गवर लहान खडी , धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक केली जाते. या ठिकाणी चार टर्मिनस आहेत. तेथून मालाची निर्यात आयात केली जाते. वर्षाला येथे लाखो कंटेनेर हाताळले जातात. त्यामुळे  कळंबोली ते जेएनपीटी दरम्यान अवजड वाहतूक दिवसेनदिवस वाढत चालली आहे. भरधाव वेगाने धावना-या अवजड वाहतुकीमुळे अपघाताच्या समस्येने डोके वर काढले आहे. त्यात आता धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला  आहे. या दरम्यान महामार्गालगत  अनेक खेडी गावे आहेत.त्यामुळे अनेकजन दुचाकीवरुन प्रवास करतात. महामार्गावर  लहान खडी जमा झाल्याने दुचाकी स्वारांना गाडी चालवताना त्रास होतो आहे. महामार्गावर  अवजड वाहन  सुसाट  धावतात. त्यात धुळीत समोरचे काहीच दिसत नाही. लहान खडीमुळे लहान गाड्या घसरण्याचा प्रकार होत आहे. त्यातून अपघाताला आमंत्रण मिळते आहे. 

महामार्गवरील पार्किंग समस्या बिकट 

कळंबोली सर्कल ते डी पॉईँट येथून जेएनपीटी महामार्गावर दोन्ही बाजूने अवजड वाहतूकीची पार्किंग केली जातात. त्यामुळे महामार्ग वाहतूकीसाठी लहान झाला आहे. त्यात धुळीचे  साम्राज्य पसरल्याने समोरील किंवा बाजूला थांबलेली वाहने दिसत नाहीत. अशात अपघात होतात. त्यास पार्किंग केलेली  वाहने देखिल तितकेच जबाबदार असल्याचे वाहनचालक सांगतात. 

उपाययोजनांचा अभाव 

महामार्गावर शेजारी असणा-या कंटेनर यार्डमुळे यार्डात असणारी धुळ महामार्गावर येत आहे. त्या सोबत लहान खडी रसत्यावर येत आहे. ही धुळ व खडी दोन किमी पर्यंत पसरते आहे. ठिकठिकाणी फलक नसल्याने वाहनचालकांना दिशाभूल होत आहे. अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी  कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्याता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई