शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
2
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
3
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
5
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
6
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
7
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
8
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
9
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
10
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
11
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
12
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?
13
एकावर एक बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; सोबत डिविडंडही मिळणार; गुंतवणुकदारांना दुप्पट फायदा
14
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
15
८८२ कोटींचा खर्च, २०२८ मध्ये होणार पूर्ण; ८ ऑगस्टला सीतामातेच्या जानकी मंदिराचे भूमिपूजन
16
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
17
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
18
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
19
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
20
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

जेएनपीटी महामार्गावर धुळीचे साम्राज्य; धुळीसोबत महामार्गावर लहान खडीच्या प्रमाणात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 19:25 IST

कळंबोली डी पॉईंट ते जेएनपीटी महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणा-यांना  श्वसनाच्या आजाराला आमंत्रण दिले जात आहे.

कळंबोली , अरुणकुमार मेहत्रे  : कळंबोली डी पॉईंट ते जेएनपीटी महामार्गावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणा-यांना  श्वसनाच्या आजाराला आमंत्रण दिले जात आहे. त्याचबरोबर महामार्गावर लहान खडी जमा झाल्याने  दुचाकी वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरुन गाडी चालवावी लागत आहे. एखाद्याचा जीव गेल्यावर यंत्रणा जागे होणार का ? असा सवाल वाहनचालकाकडून केला  जात आहे. 

कळंबोली एमजीएम रुग्णालयापासून जेएनपीटी महामार्गाला सुरुवात होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्शवभुमीवर तेसेच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यामातून आठ लेन असलेला महमार्ग बांधण्यात आला आहे.  गोवा , पुणे , जेएनपीटी जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब केला जातो. २०१६ साली बांधण्यात आलेल्या महामार्गकडे प्राधिकरणाकडून  दुर्लक्ष केल्याने महामार्गवर लहान खडी , धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

जेएनपीटी बंदरातून मोठ्या प्रमाणात मालाची वाहतूक केली जाते. या ठिकाणी चार टर्मिनस आहेत. तेथून मालाची निर्यात आयात केली जाते. वर्षाला येथे लाखो कंटेनेर हाताळले जातात. त्यामुळे  कळंबोली ते जेएनपीटी दरम्यान अवजड वाहतूक दिवसेनदिवस वाढत चालली आहे. भरधाव वेगाने धावना-या अवजड वाहतुकीमुळे अपघाताच्या समस्येने डोके वर काढले आहे. त्यात आता धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला  आहे. या दरम्यान महामार्गालगत  अनेक खेडी गावे आहेत.त्यामुळे अनेकजन दुचाकीवरुन प्रवास करतात. महामार्गावर  लहान खडी जमा झाल्याने दुचाकी स्वारांना गाडी चालवताना त्रास होतो आहे. महामार्गावर  अवजड वाहन  सुसाट  धावतात. त्यात धुळीत समोरचे काहीच दिसत नाही. लहान खडीमुळे लहान गाड्या घसरण्याचा प्रकार होत आहे. त्यातून अपघाताला आमंत्रण मिळते आहे. 

महामार्गवरील पार्किंग समस्या बिकट 

कळंबोली सर्कल ते डी पॉईँट येथून जेएनपीटी महामार्गावर दोन्ही बाजूने अवजड वाहतूकीची पार्किंग केली जातात. त्यामुळे महामार्ग वाहतूकीसाठी लहान झाला आहे. त्यात धुळीचे  साम्राज्य पसरल्याने समोरील किंवा बाजूला थांबलेली वाहने दिसत नाहीत. अशात अपघात होतात. त्यास पार्किंग केलेली  वाहने देखिल तितकेच जबाबदार असल्याचे वाहनचालक सांगतात. 

उपाययोजनांचा अभाव 

महामार्गावर शेजारी असणा-या कंटेनर यार्डमुळे यार्डात असणारी धुळ महामार्गावर येत आहे. त्या सोबत लहान खडी रसत्यावर येत आहे. ही धुळ व खडी दोन किमी पर्यंत पसरते आहे. ठिकठिकाणी फलक नसल्याने वाहनचालकांना दिशाभूल होत आहे. अपघात प्रवण क्षेत्र असलेल्या ठिकाणी  कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्याता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई