शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पोहोचला 352 दिवसांवर; नवी मुंबईकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 23:31 IST

चार विभागांतील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश येऊ लागले आहे. नवी मुंबईमध्ये फक्त २.७३ टक्के रुग्ण शिल्लक आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५२ दिवसांवर पोहोचला असून तब्बल चार विभागांतील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. 

दिवाळीमध्ये योग्य काळजी घेतली तर लवकरच  कोरोनामुक्त नवी मुंबई करणे शक्य होणार आहे.      राज्यातील कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश झाला होता. शहरातील मृत्युदर साडेतीन टक्क्यांवर पोहोचला होता. हॉस्पिटलमध्ये जागा  उपलब्ध होत  नव्हती. चाचण्यांचा अहवाल १० ते १५ दिवस मिळत नव्व्हता. . आयसीयू, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेडची कमतरता निर्माण झाली हाेती. एपीएमसीमधील अनेक प्रथितयश व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने ब्रेक द चेन मोहिमेसह शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट निश्चित करून उपाययोजना करण्यास सुरुवात केली. स्वत:ची स्वतंत्र आरटीपीसीआर लॅब तयार केली. ॲन्टिजन चाचण्यांची संख्या वाढविली. कोरोना रुग्ण आढळून आला की त्याच्या संपर्कातील किमान २० जणांशी संपर्क साधून त्यांची चाचणी करण्यास सुरुवात केली. या सर्व उपाययोजनांमुळे शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे.  

नवी मुंबईमध्ये तब्बल ९५.२४ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २.०३ झाला आहे. बेलापूरमध्ये १.८९, नेरूळमध्ये १.६७, वाशीमध्ये १.७७ व घणसोलीमध्ये १.८७ टक्के मृत्युदर झाला आहे. शिल्लक रुग्णांची संख्या १२०१ एवढी झाली आहे. प्रत्येक विभागातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. दिघामध्ये सर्वांत कमी ३२ व नेरूळमध्ये सर्वांत जास्त २४७ रुग्ण शिल्लक आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई