शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी पोहोचला 352 दिवसांवर; नवी मुंबईकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2020 23:31 IST

चार विभागांतील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी

नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश येऊ लागले आहे. नवी मुंबईमध्ये फक्त २.७३ टक्के रुग्ण शिल्लक आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३५२ दिवसांवर पोहोचला असून तब्बल चार विभागांतील मृत्युदर दोन टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. 

दिवाळीमध्ये योग्य काळजी घेतली तर लवकरच  कोरोनामुक्त नवी मुंबई करणे शक्य होणार आहे.      राज्यातील कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या शहरांमध्ये नवी मुंबईचाही समावेश झाला होता. शहरातील मृत्युदर साडेतीन टक्क्यांवर पोहोचला होता. हॉस्पिटलमध्ये जागा  उपलब्ध होत  नव्हती. चाचण्यांचा अहवाल १० ते १५ दिवस मिळत नव्व्हता. . आयसीयू, व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन बेडची कमतरता निर्माण झाली हाेती. एपीएमसीमधील अनेक प्रथितयश व्यापाऱ्यांचा मृत्यू झाला होता.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने ब्रेक द चेन मोहिमेसह शून्य मृत्युदराचे उद्दिष्ट निश्चित करून उपाययोजना करण्यास सुरुवात केली. स्वत:ची स्वतंत्र आरटीपीसीआर लॅब तयार केली. ॲन्टिजन चाचण्यांची संख्या वाढविली. कोरोना रुग्ण आढळून आला की त्याच्या संपर्कातील किमान २० जणांशी संपर्क साधून त्यांची चाचणी करण्यास सुरुवात केली. या सर्व उपाययोजनांमुळे शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात येण्यास सुरुवात झाली आहे.  

नवी मुंबईमध्ये तब्बल ९५.२४ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्युदर २.०३ झाला आहे. बेलापूरमध्ये १.८९, नेरूळमध्ये १.६७, वाशीमध्ये १.७७ व घणसोलीमध्ये १.८७ टक्के मृत्युदर झाला आहे. शिल्लक रुग्णांची संख्या १२०१ एवढी झाली आहे. प्रत्येक विभागातील रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. दिघामध्ये सर्वांत कमी ३२ व नेरूळमध्ये सर्वांत जास्त २४७ रुग्ण शिल्लक आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई