शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अनधिकृत बांधकामामुळे ऐरोलीतील रहिवाशांच्या जीवाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2019 00:10 IST

ऐरोली येथील महावीर प्लाझा इमारतीमधील रहिवाशांनी विकासकाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

नवी मुंबई : ऐरोली येथील महावीर प्लाझा इमारतीमधील रहिवाशांनी विकासकाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. इमारतीमध्ये अनेक अनधिकृत बदल करण्यात आले असल्याने आपत्कालीन प्रसंगी रहिवाशांच्या सुटकेचे मार्ग बंद झाले आहेत. मात्र यासंदर्भात रहिवाशांनी तक्रारी करून देखील ठोस कारवाई होत नसल्याने १ जूनला त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.ऐरोली सेक्टर १९ येथील महावीर प्लाझा या इमारतीच्या २२ व्या मजल्यावर आग लागल्याची घटना ३० एप्रिलला घडली होती. या दुर्घटनेनंतर रहिवाशांना स्वत:ची सुटका करून घेण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. अग्निशमन दलालाही आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे भविष्यात पुन्हा अशी दुर्घटना घडल्यास जीवितहानीच्या शक्यतेची भीती तिथल्या रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. यामुळे सदर इमारतीमध्ये विकासकाकडून सर्व नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेली अनधिकृत बांधकामे पाडण्याची मागणी रहिवाशांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील मोकळ्या जागेत प्लॅस्टिकचे शेड बांधून हॉटेल चालवले जात आहे. तर इतर पार्किंगची जागा रुग्णालयाला भाड्याने देण्यात आल्याने सोसायटीमधील रहिवाशांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. इमारतीमधील एक हॉल लग्नसमारंभ अथवा इतर कामासाठी भाड्याने दिला जात असल्यानेही त्यानिमित्ताने येणाऱ्यांच्या वाहनांमुळेही वाहतूककोंडी होत आहे.सोसायटीच्या वापरासाठी असलेल्या दोनपैकी एक प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आलेला आहे. तर आपत्कालीन प्रसंगी बाहेर पडण्याच्या जागेतच इमारतीचा मीटर रूम बनवण्यात आलेला आहे. त्यामुळे या मीटर रूमलाच आग लागल्यास रहिवाशांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद होऊ शकतो.