शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईमुळे तुर्भेवासीयांमध्ये तीव्र असंतोष, २५ ऑक्टोबरला आंदोलन

By नामदेव मोरे | Updated: October 19, 2023 18:52 IST

नवी मुंबईमधील तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, गणपतीपाडा, आंबेडकरनगर, गणेशनगर, हनुमान नगर, महानगरपालिका प्रभाग ४८, ६८, ६९, ७०, ७१ व ७३ मध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

नवी मुंबई : तुर्भे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन विशेष जलवाहिनी टाकण्याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. पाण्यासाठी २५ ऑक्टोबरला ठाणे बेलापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी यांनी दिला आहे.

नवी मुंबईमधील तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअर, इंदिरानगर, गणपतीपाडा, आंबेडकरनगर, गणेशनगर, हनुमान नगर, महानगरपालिका प्रभाग ४८, ६८, ६९, ७०, ७१ व ७३ मध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या परिसराला एमआयडीसीकडून येणारे पाणी पुरविले जात आहे. एमआयडीसीकडून पाणी घेण्यासाठी महानगरपालिका महिन्याला दोन कोटी रूपये खर्च करत आहे. परंतु यानंतरही रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नाही. रात्री १२ ते २ वाजता पाणी सोडले जाते. नागरिकांना पाण्यासाठी रात्रभर जागावे लागत आहे. यानंतरही पुरेसे पाणी मिळत नाही. पाणी प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेना उपजिल्हा प्रमुख व स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी यांनी आक्रमक भुमीका घेतली आहे. पाच वर्षापासून शांततेने प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. जून २०२२ मध्ये प्रशासनाने उरण फाटा येथून विशेष जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला एक वर्ष झाल्यानंतरही अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. मनपा अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

महानगरपालिकेचे अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील जाणीवपुर्वक झोपडपट्टी परिसरावर अन्याय करत आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. विशेष जलवाहिनी टाकण्याचे काम त्वरीत सुरू करावे अन्यथाला पाण्यासाठी २५ ऑक्टोबरला ठाणे बेलापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशाराही सुरेश कुलकर्णी यांनी दिला आहे.

तुर्भे परिसरातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पाणी प्रश्न सोडविला जात नसल्यामुळे २५ ऑक्टोबरला ठाणे बेलापूर रोडवर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

सुरेश कुलकर्णी, उपजिल्हा प्रमुख शिवसेना

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईNavi Mumbaiनवी मुंबई