शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

उघड्या नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 00:06 IST

सीवूड, जुईनगर भागांत एमआयडीसीचे सांडपाणी प्रक्रि या न करताच नाल्यात सोडले जात असल्याने या पाण्याला दुर्गंधी येत आहे.

नवी मुंबई : सीवूड, जुईनगर भागांत एमआयडीसीचे सांडपाणी प्रक्रि या न करताच नाल्यात सोडले जात असल्याने या पाण्याला दुर्गंधी येत आहे. नाल्यांची स्वच्छता केली जात नसल्याने, तसेच बदललेल्या वातावरणामुळे परिसरात डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत असून, ते दुर्गंधीने हैराण झाले आहेत. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.एमआयडीसीमधील कंपन्यांचे सांडपाणी खाडीकडे वाहून नेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी नाले बनविण्यात आले आहेत. या सांडपाण्यावर प्रक्रि या न करता, दूषित पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, नाल्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहेत. तसेच गाळ साचल्याने सांडपाणी साचून राहत आहे. नाल्यात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यावर विशिष्ट तवंग निर्माण झाला असून, दुर्गंधीबरोबर डासांचे प्रमाणही वाढले आहे. या उघड्या नाल्यामुळे सीवूड, जुईनगर, सानपाडा भागातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, डेंग्यू, मलेरिया अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. कंपन्यांनी सांडपाण्यावर प्रक्रि या करून नाल्यात सोडणे बंधनकारक असताना, अनेक कंपन्या रसायन मिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करताच नाल्यात सोडत आहेत. त्यामुळे पर्यावरणावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सदरच्या नाल्यांचे बांधकाम करून बंदिस्त करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. नेरु ळ भागातून सीवूडकडे जाणाºया नाल्याचे काही प्रमाणात बांधकाम करण्यात आलेले आहे; परंतु अर्धवट बांधकाम झालेल्या नाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि नाल्याची स्वच्छता करावी, तसेच सांडपाण्यावर प्रक्रि या न करता सांडपाणी थेट नाल्यात सोडणाºया एमआयडीसीतील कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.