शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

उघड्या नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे नागरिक हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 00:06 IST

सीवूड, जुईनगर भागांत एमआयडीसीचे सांडपाणी प्रक्रि या न करताच नाल्यात सोडले जात असल्याने या पाण्याला दुर्गंधी येत आहे.

नवी मुंबई : सीवूड, जुईनगर भागांत एमआयडीसीचे सांडपाणी प्रक्रि या न करताच नाल्यात सोडले जात असल्याने या पाण्याला दुर्गंधी येत आहे. नाल्यांची स्वच्छता केली जात नसल्याने, तसेच बदललेल्या वातावरणामुळे परिसरात डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत असून, ते दुर्गंधीने हैराण झाले आहेत. पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.एमआयडीसीमधील कंपन्यांचे सांडपाणी खाडीकडे वाहून नेण्यासाठी शहरात विविध ठिकाणी नाले बनविण्यात आले आहेत. या सांडपाण्यावर प्रक्रि या न करता, दूषित पाणी सोडण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या नाल्यांची स्वच्छता झाली नसल्याने नाल्यात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, नाल्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर झाडे-झुडपे वाढली आहेत. तसेच गाळ साचल्याने सांडपाणी साचून राहत आहे. नाल्यात अनेक ठिकाणी साचलेल्या पाण्यावर विशिष्ट तवंग निर्माण झाला असून, दुर्गंधीबरोबर डासांचे प्रमाणही वाढले आहे. या उघड्या नाल्यामुळे सीवूड, जुईनगर, सानपाडा भागातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, डेंग्यू, मलेरिया अशा आजारांना सामोरे जावे लागत आहे. कंपन्यांनी सांडपाण्यावर प्रक्रि या करून नाल्यात सोडणे बंधनकारक असताना, अनेक कंपन्या रसायन मिश्रीत सांडपाणी प्रक्रिया न करताच नाल्यात सोडत आहेत. त्यामुळे पर्यावरणावर आणि नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सदरच्या नाल्यांचे बांधकाम करून बंदिस्त करण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. नेरु ळ भागातून सीवूडकडे जाणाºया नाल्याचे काही प्रमाणात बांधकाम करण्यात आलेले आहे; परंतु अर्धवट बांधकाम झालेल्या नाल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि नाल्याची स्वच्छता करावी, तसेच सांडपाण्यावर प्रक्रि या न करता सांडपाणी थेट नाल्यात सोडणाºया एमआयडीसीतील कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.