शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

कच-यामुळे ठाणे-वाशी लोकल घसरण्याची भीती!, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 06:44 IST

ठाणे-ऐरोलीदरम्यान कळव्यातील ठाणे-वाशी या रेल्वे ट्रॅकवर पसरलेल्या कचºयामुळे या रेल्वेमार्गावरून धावणाºया ठाणे-वाशी अथवा ठाणे-पनवेल लोकल घसरण्याची भीती रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे.

पंकज रोडेकर / लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : ठाणे-ऐरोलीदरम्यान कळव्यातील ठाणे-वाशी या रेल्वे ट्रॅकवर पसरलेल्या कचºयामुळे या रेल्वेमार्गावरून धावणाºया ठाणे-वाशी अथवा ठाणे-पनवेल लोकल घसरण्याची भीती रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे. जर या मार्गावर लोकल घसरली, तर हा मार्ग पूर्ण ठप्प होऊन प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होतील. त्यामुळे महापालिका प्रशासनाने वेळीच ट्रॅकवरील आणि त्याच्या आजूबाजूला पसरलेला कचरा हटवण्याची मागणी रेल्वेने केली आहे. पुन:पुन्हा ट्रॅकवर कचरा टाकला जाणार नाही, याची काळजी घेण्याबद्दल पालिकेला बजावले आहे.मध्य रेल्वेच्या जलद मार्गालगत ठाणे-वाशी-पनवेल हा मार्ग आहे. या मार्गावर अप आणि डाउन असे दोनच ट्रॅक आहेत. कळवा-विटावा ब्रिज येथून मध्य रेल्वे आणि ठाणे-वाशी हे मार्ग वेगळे होतात. ठाणे-वाशी मार्ग जेथे वेगळा होतो, तेथे एक वळण आहे. या दोन्ही मार्गांच्या मधोमधच मोठी झोपडपट्टी पसरली आहे. बहुतेक लोक हे परभाषिकआहे. ही झोपडपट्टी एकाच बाजूला असल्याने महापालिका प्रशासनाचे नेहमीच तिकडे दुर्लक्ष होते. तेथे राहणाºया नागरिकांना कचरा टाकण्याची व्यवस्था नसल्याने ते थेट रेल्वे ट्रॅकवर कचरा टाकतात. फेकलेल्या कचºयाचा ढीग हा वळण असलेल्या ट्रॅकच्या आजूबाजूला आहे. जवळपास ३०० ते ४०० मीटर अंतरावर कचºयाचे साम्राज्य पसरल्याचे दिसते. या मार्गावरील लोकल अक्षरश: त्या कचºयातूनच धावते. त्याच झोपडपट्टीतील नागरिक रेल्वे ट्रॅकलगत शौचास जात असल्याने येथून लोकल धावते, तेव्हा प्रवाशांना नाक दाबूनच प्रवास करावा लागतो.बुधवारी दिवा-पारसिक बोगद्यापाशी कल्याणहून तुर्भे येथे जाणाºया मालगाडीचा एक डबा कचरा रेल्वेमार्गात आल्याने घसरला. या घसरलेल्या डब्यामुळे मध्य रेल्वेच्या जलद मार्गावर त्याचा विपरित परिणाम झाला होता. तो मालगाडीचा डबा असल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र, कचºयामुळे लोकलचा डबा घसरण्याची पुनरावृत्ती झाल्यास जीवितहानी होऊ शकते.ठाणे-वाशी मार्गावर लोकल घसरून अपघात होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासन आता नेमके कसे पाऊल उचलते, याकडे प्रवाशांचे डोळे लागले आहेत. तसेच तेथील नागरिकांनी आम्हाला कचरा टाकण्यासाठी व्यवस्थाच नसल्याने हा कचरा रेल्वे ट्रॅकवर टाकावा लागत आहे. महापालिकेने तशी व्यवस्था करून कचरा वेळेवर उचलावा, अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMumbai Localमुंबई लोकल