शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशी खाडी पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनांना बे्रक, वाहतूककोंडीमुळे असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 02:53 IST

वाशी खाडी पुलावर खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली आहे. सकाळी व सायंकाळी मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास वेळ लागत आहे

नवी मुंबई : वाशी खाडी पुलावर खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत असून वारंवार वाहतूककोंडी होऊ लागली आहे. सकाळी व सायंकाळी मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर पाच मिनिटांचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊणतास वेळ लागत आहे. नियमित होणाºया कोंडीमुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण होऊ लागला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार स्वत:ची जबाबदारी झटकत असल्यामुळे खड्डे नक्की बुजवायचे कोणी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.सायन-पनवेल महामार्गावरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडले असून, वाशी ते कळंबोलीपर्यंत रोडवर प्रचंड खड्डे पडले आहेत. या समस्येमध्ये आता वाशी खाडी पुलावरील खड्ड्यांचीही भर पडली आहे. मुंबईकडे जाणाºया मार्गिकेवर जवळपास अर्धा फूट खोलीचे खड्डे पडले आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणातून हजारो वाहने रोज मुंबईकडे येत असतात. याशिवाय पनवेल, नवी मुंबई, उरण परिसरातून नोकरी व व्यवसायासाठी चार ते पाच लाख नागरिक महामार्गावरून मुंबईकडे जातात. जुना खाडी पूल धोकादायक असल्याने त्यावरून फक्त मोटारसायकल व हलकी वाहने अपवाद स्थितीमध्ये जात असतात. पूर्ण वाहतूक नवीन खाडी पुलावरून जात असते. सद्यस्थितीमध्ये पुलावरील खड्ड्यांमुळे रोज सकाळी ७ ते दुपारी ११ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. दुपारी व काही वेळेला सायंकाळीही अनेक वेळा वाहतूक धिम्या गतीने सुरू असते.खाडी पुलावरील वाहतूककोंडी अनेक वेळेला वाशी गाव ते वाशी प्लाझापर्यंत येऊ लागली आहे. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सकाळी व सायंकाळी जादा बंदोबस्त ठेवावा लागत आहे. पोलिसांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरावा केला आहे. टोल कंपनीकडेही याविषयी पाठपुरावा केला आहे; पण दोन्हीकडून खड्डे बुजविण्यासाठी एकमेकांवर जबाबदारी झटकली जात आहे. यामुळे खड्डे बुजविण्यासाठी नक्की कोणाकडे व कसा पाठपुरावा करायचा, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Potholeखड्डे