शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी गावी गेल्याने कांदा मार्केटमधील व्यवहार ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:55 IST

मतदानामुळे फळ मार्केटवर परिणाम; धान्य, मसाला मार्केटमध्येही तारेवरची कसरत

नवी मुंबई : माथाडी कामगार मतदानासाठी गावी गेल्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा-बटाटा मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले होते. फळ मार्केटमध्येही सकाळी चक्काजामची स्थिती निर्माण झाली होती. धान्यसह मसाला मार्केटमध्येही कामगार कमी असल्याने मालाची चढ-उतार करताना तारेवरची कसरत करावी लागत होती.सातारा, माढासह बारामती मतदारसंघामधील निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सातारामधून कामगार नेते नरेंद्र पाटील निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघामधील जावली, वाई, कराड, पाटण व सातारामध्ये माथाडी कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. निवडणुकीसाठी कामगारांनी गावी यावे, असे आवाहन नेत्यांनी केल्यामुळे मतदान असलेले सर्व कामगार सोमवारी रात्रीच गावाकडे रवाना झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या कांदा मार्केटमधील कामगारांची आहे. मतदानासाठी गावी जाणार असल्याचे कामगारांनी व्यापाऱ्यांना यापूर्वीच सांगितल्यामुळे आवक मागविण्यात आली नव्हती. दिवसभर कांदा, बटाटा व लसूणच्या २७ ट्रक व टेम्पोची आवक झाली आहे. कामगार नसल्यामुळे आलेला माल उतरवून घेता आलेला नाही. यापूर्वी मार्केटमध्ये शिल्लक मालाची विक्रीही करता आली नाही. ग्राहकांनाही निराश होऊन परत जावे लागले.भाजी मार्केटमधील आवक सुरळीत सुरू होती. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत ६३० वाहनांची आवक झाली होती. अनेक माथाडी कामगार गावी गेले असले तरी रोजंदारीवर काम करणाºया कामगारांकडून काम करून घेण्यात येत होते. फळ मार्केटच्या व्यवहारावरही परिणाम झाला होता. दिवसभरामध्ये ६७ हजार ४२५ पेटी आंब्याची आवक झाली. इतर फळांचीही समाधानकारक आवक झाली. कामगार कमी असल्यामुळे मालाची चढ-उतार करण्यासाठी वेळ लागत होता. सकाळी मार्केटमध्ये चक्काजामची स्थिती होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुरक्षा विभागाला तारेवरची कसरत करावी लागली. धान्य व मसाला मार्केटमध्येही कामगारांची संख्या कमी असल्यामुळे ग्राहकांना वेळेत माल पोहोचविता आला नाही.माथाडी कामगार मतदानासाठी गावी गेल्यामुळे कांदा-बटाटा मार्केटमधील व्यवहारावर परिणाम झाला होता. कामगार नसल्यामुळे मालाची चढ-उतार करता येत नव्हती. भाजी, फळ, मसाला व धान्य मार्केटमधील व्यवहार दिवसभर सुरू होते.- अनिल चव्हाण, सचिव, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीदुरुस्तीचे काम सुरूकामगार गावी गेल्यामुळे कांदा मार्केटमधील व्यवहार ठप्प झाले होते. यामुळे व्यापाऱ्यांनी गाळ्यांसमोरील धक्के व इतर दुरुस्तीचे काम सुरू केले होते. याशिवाय मोकळ्या पॅसेजची साफसफाईही करण्यावर लक्ष दिले होते. बाजार समिती प्रशासनानेही मार्केटची साफसफाई व इतर कामे करण्यावर लक्ष दिल्याचे पाहावयास मिळत होते.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई