शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

महामार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेची नाचक्की; मुख्यमंत्र्यांकडे केली सायन-पनवेल रस्त्याच्या हस्तांतरणाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 01:59 IST

राहण्यास योग्य शहरात नवी मुंबईचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. असे असले तरी सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेची नाचक्की होत आहे. खड्डेमय महामार्गामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकास बाधा निर्माण होत आहे.

नवी मुंबई : राहण्यास योग्य शहरात नवी मुंबईचा देशात दुसरा क्रमांक आला आहे. असे असले तरी सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेमुळे महापालिकेची नाचक्की होत आहे. खड्डेमय महामार्गामुळे नवी मुंबईच्या नावलौकिकास बाधा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील ९ किमी लांबीचा रस्ता हस्तांतरित करावा,यासाठी महापौर जयवंत सुतार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आता साकडे घातले आहे.मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या नवी मुंबई शहराला जागतिक दर्जा प्राप्त होवू लागला आहे. स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेचा सन्मान झाला आहे. तसेच राहण्यासाठी देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईचा गौरव झाला आहे. चोवीस तास पाणी, मलनि:सारणाची तंत्रशुध्द प्रणाली, मुख्य व अंतर्गत रस्त्यांचे नियोजनबध्द जाळे, उद्याने, शैक्षणिक सुविधा, नोकरीच्या उत्तम संधी आदीमुळे शहराला वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. मुंबईत जाण्यासाठी सायन-पनवेल महामार्गाचा अवलंब केला जातो. परंतु महामार्गावरील खड्ड्यांमुळे बाहेरून येणारे नागरिक महापालिकेच्या कार्यक्षमतेवर शंका व्यक्त करीत आहेत. ही बाब महापौर जयवंत सुतार यांनी रविवारी वाशी येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली. हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आखात्यारित आहे. त्यामुळे महापालिकेला त्याची डागडुजी करता येत नाही. वाशी ते बेलापूरपर्यंतचा ९ किमी लांबीचा महमाार्गाचा भाग हस्तांतरित केल्यास त्याची नियोेजबध्द निगा राखणे शक्य होईल, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, शहरातील नागरी प्रश्नांसाठी लढणाºया नवी मुंबई फर्स्ट चॅरिटेबल ट्रस्ट या संघटनेने वाशी ते बेलापूरपर्यंतचा ९ किमी लांबीचा महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित व्हावा, यासाठी मोहीम छेडली आहे. याचाच एक भाग म्हणून या संस्थेच्या एका शिष्टमंडळाने अलीकडेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेवून यासंदर्भात चर्चा केली होती. इतकेच नव्हे, तर येत्या काळात ही चळवळ अधिक व्यापक करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई