शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
5
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
6
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
7
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
8
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
9
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
10
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
11
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
12
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
13
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
14
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
15
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
16
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
19
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
20
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...

पाली नगरपंचायतीचे स्वप्न भंगले

By admin | Updated: March 22, 2016 02:28 IST

राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २६ जून २०१५ ला अधिसूचना काढून रायगड जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ६ ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये केले

विनोद भोईर,  पालीराज्य शासनाच्या नगरविकास विभागाने २६ जून २०१५ ला अधिसूचना काढून रायगड जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या ६ ग्रामपंचायतींचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये केले. यापैकी ५ ग्रामपंचायतींत नुकतेच निवडणुका घेवून नगरपंचायती होण्याच्या निर्णयास काही ग्रामपंचायत सदस्यांनी विरोध दर्शविला होता व त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने गेल्या ६ महिन्यांपासून नगरपंचायतीचे घोंगडे भिजत पडले होते. अखेर पाली नगरपंचायत स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवून रद्द केला. त्यामुळे पालीकरांचे नगरपंचायतीचे स्वप्न भंगले असून पालीकरांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. या सर्व जुन्या खेळाडूंपुढे पाली ग्रामपंचायतीचा कारभार चालवित असताना नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्याचे मोठे आव्हान आहे. पाली शहराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण पाहता येथील नागरिकांना अनेक समस्यांनी ग्रासले आहे. यामध्ये ग्रामपंचायतीच्या मालकीचे असलेले सरकारी भूचरणातील अतिक्रमण, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे पाली शहरात झालेली अनधिकृत बांधकामे, वाहतूककोंडी, दूषित पाणी, घाणीचे साम्राज्य, डंपिंग ग्राऊंड आदि जटील समस्यांचे निराकरण पाली नगरपंचायत झाली असती तर करता आले असते. कारण की यासाठी नगरविकास खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो. तसेच नगरपंचायतीचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली चालत असल्याने त्यांचे अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे, स्वच्छता आदी बाबींवर कटाक्षाने लक्ष राहते. या उलट पाली ग्रामपंचायत झाल्याने पालीतील नागरिकांना पुन्हा या सर्व समस्यांना सामना करावा लागणार आहे. ग्रामपंचायतीने केलेली कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत, हे पालीकरांनी गेली कित्येक वर्षांपासून अनुभवलेले आहे. या सर्वांतून पालीकरांची सुटका करावयाची असेल तर पाली नगरपंचायत करावी लागेल असे येथील ग्रामस्थांचे मत आहे. या सदस्यांचा ग्रामपंचायतीचा उरलेला दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर तरी पाली नगरपंचायत व्हावी यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात धाव घेवू असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे.