शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

एपीएमसीतील आंब्याची आवक दुप्पट

By admin | Updated: April 7, 2017 01:53 IST

आंब्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने या वर्षी वाशीतील एपीएमसी बाजारपेठेत मार्च महिन्यापासूनच फळांच्या राजाची मागणी वाढली आहे

प्राची सोनवणे,नवी मुंबई- आंब्याचे विक्रमी उत्पादन झाल्याने या वर्षी वाशीतील एपीएमसी बाजारपेठेत मार्च महिन्यापासूनच फळांच्या राजाची मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेने कोकण आणि कर्नाटकी हापूसची आवक ५० टक्क्यांनी वाढली असून दरांमध्ये ४० टक्के घट झाली आहे. वाशीतील फळ बाजारपेठेत गुरुवारी कोकणातील हापूसची ४४ हजार १०७ क्रेट आंब्यांची आवक झाली आहे, तर ३७ हजार ७८ क्रेट, पेट्या ही कर्नाटकी हापूसची आवक झाली आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेने यंदा काही महिने अगोदरच आंब्याची चव चाखता आली. वाढत्या उष्णतेमुळेही फळांच्या राजाला मोठ्या प्रमाणात मागणी असल्याची माहिती व्यापारी वर्गाने दिली. ४००० ते ८००० रुपये किमतीने विकल्या जाणाऱ्या आंब्याच्या पेट्या १ हजार ते ४००० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गुढीपाडव्याला ६७ हजार ३९२ क्रेट, आंब्याच्या पेटींची आवक झाली होती. मात्र आठवडाभरातच ही आवक वाढली असून ८१ हजारांवर पोहोचली आहे. पुढील आठवड्यात आंब्याची मागणी वाढणार असून, दर घटण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. गुढीपाडव्यानंतर वाशी फळ बाजारातील आंब्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दर स्थिरावतील : गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पन्न वाढले असून त्याबरोबरीनेच ग्राहकांची मागणीही वाढत आहे. गुढीपाडव्यानंतर आंब्याच्या मागणीत आणखी वाढ झाली असून गेल्या वर्षी एप्रिलमध्ये झालेली आवक पाहता या वर्षी त्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच दरात घट झाली असून यापुढे दर स्थिरावणार असल्याची माहिती उपसचिव व बाजार समिती अधिकारी सीताराम कावरके यांनी दिली.