शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 07:11 IST

२०२६ च्या मध्यापर्यंत, विमान उड्डाणांची संख्या जवळपास तीनपटीने वाढवून दररोज ५५ उड्डाणे करण्याचे नियोजन आहे

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे औपचारिक उद्घाटन या महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणे सुरू होणार आहेत.

त्या पार्श्वभूमीवर एअर इंडिया समूहाने विस्तार आराखडा जाहीर केला असून,  यानुसार एअर इंडिया एक्स्प्रेसमार्फत सुरुवातीला दररोज २० उड्डाणे सुरू केली जाणार आहेत. त्यामुळे महामुंबईतील नागरिकांना नवी मुंबईतून देश-विदेशसाठी उड्डाण घेता येणार आहे. नंतरच्या टप्प्यात, म्हणजेच २०२६ च्या मध्यापर्यंत, विमान उड्डाणांची संख्या जवळपास तीनपटीने वाढवून दररोज ५५ उड्डाणे करण्याचे नियोजन आहे. त्यात पाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. सन २०२६ च्या हिवाळ्यापर्यंत एकूण ६० दैनिक उड्डाणे सुरू करण्याचे उद्दिष्ट समूहाने समोर ठेवले आहे.

९ कोटी प्रवासी क्षमता

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांची आणि ०.५ दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीची क्षमता निर्धारित केली गेली आहे. सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर हे विमानतळ तब्बल ९० दशलक्ष म्हणजेच ९ कोटी प्रवासी आणि ३.२ दशलक्ष टन मालवाहतूक हाताळण्यास सक्षम असेल.

भारताच्या स्वप्नांना गतीअदानी एअरपोर्ट्ससोबतची भागीदारी जागतिक हवाई केंद्र होण्याच्या स्वप्नांना गती देईल, असा विश्वास एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी व्यक्त केला.  अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण बन्सल यांनीही या भागीदारीचे स्वागत केले.

टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई