शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

गाळ न काढताच नाल्याची दुरुस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 05:14 IST

पावसाळ्यात पुराची भीती : प्रशासनाच्या कामावर घणसोलीकर नाराज

नवी मुंबई : घणसोलीतील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ काढण्याऐवजी महापालिकेकडून नाल्याच्या पिचिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नाल्याची रुंदी कमी होणार असून पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांकडून वर्तवण्यता येत आहे.

गवळीदेव डोंगर परिसरातून पावसाळ्यात वाहणारे पाणी व एमआयडीसीतील सांडपाणी घणसोलीतील मोठ्या नाल्यातून वाहून नेले जाते. मात्र, अनेक वर्षांपासून या नाल्याची सफाई झाली नसल्याने त्यात अनेक फुटांपर्यंतचा गाळ साचलेला आहे. हा गाळ काढण्यात यावा, अशी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिणामी, नाल्याची खोली कमी झाल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहणारे पाणी नाल्यालगतच्या घरोंदा व सिम्पलेक्स तसेच इतर माथाडी वसाहतींमध्ये घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर प्रतिवर्षी पावसाळ्यात काही तास अतिवृष्टी झाल्यास हा नाला तुडूंब भरून वाहत असतो. हेच पाणी गटारांद्वारे उलट्या प्रवाहाने वाहून नागरी वस्तीतही घुसते. त्यामुळे नाल्यातील गाळ काढण्याची गरज निर्माण झालेली असतानाच, नाल्याच्या दुतर्फा पिचिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यात नाल्यातील गाळ काढायचा झाल्यास, त्यात अडथळा निर्माण होणार आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांवर संकट ओढावणार असल्याची भीती सामाजिक कार्यकर्ते संदीप गलुगडे यांनी वर्तवली आहे. तसेच प्रशासनाने उलटा कारभार करत नाल्यातील गाळ काढण्यापूर्वी पिचिंगचे काम सुरू ठेवल्यास तिथला गाळ अधिकाऱ्यांच्या दालनात टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नाल्याच्या भोवती अमृत योजनेअंतर्गत हरित पट्टा तयार करण्यात आलेला आहे. हा हरित पट्टा तयार करण्यापूर्वीच नाल्यातील गाळ काढून सभोवतालची माती ढासळू नये, याकरिता त्या ठिकाणी पिचिंग करणे आवश्यक होते. मात्र, अमृत योजनेअंतर्गतच्या कामांची घाई केली गेल्याने, त्यानंतर वर्षभराने पिचिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, नाल्यातील गाळ तसाच असल्याने पिचिंगची कामे झाल्यानंतर तो कसा काढणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. तर पालिकेने नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीच पिचिंगचे काम हाती घेतल्याने, घणसोलीकरांना पूर परिस्थितीच्या संकटात ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याचाही संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई