शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

गाळ न काढताच नाल्याची दुरुस्ती सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 05:14 IST

पावसाळ्यात पुराची भीती : प्रशासनाच्या कामावर घणसोलीकर नाराज

नवी मुंबई : घणसोलीतील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ काढण्याऐवजी महापालिकेकडून नाल्याच्या पिचिंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नाल्याची रुंदी कमी होणार असून पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता परिसरातील नागरिकांकडून वर्तवण्यता येत आहे.

गवळीदेव डोंगर परिसरातून पावसाळ्यात वाहणारे पाणी व एमआयडीसीतील सांडपाणी घणसोलीतील मोठ्या नाल्यातून वाहून नेले जाते. मात्र, अनेक वर्षांपासून या नाल्याची सफाई झाली नसल्याने त्यात अनेक फुटांपर्यंतचा गाळ साचलेला आहे. हा गाळ काढण्यात यावा, अशी परिसरातील नागरिकांकडून सातत्याने मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिणामी, नाल्याची खोली कमी झाल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहणारे पाणी नाल्यालगतच्या घरोंदा व सिम्पलेक्स तसेच इतर माथाडी वसाहतींमध्ये घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर प्रतिवर्षी पावसाळ्यात काही तास अतिवृष्टी झाल्यास हा नाला तुडूंब भरून वाहत असतो. हेच पाणी गटारांद्वारे उलट्या प्रवाहाने वाहून नागरी वस्तीतही घुसते. त्यामुळे नाल्यातील गाळ काढण्याची गरज निर्माण झालेली असतानाच, नाल्याच्या दुतर्फा पिचिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यात नाल्यातील गाळ काढायचा झाल्यास, त्यात अडथळा निर्माण होणार आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांवर संकट ओढावणार असल्याची भीती सामाजिक कार्यकर्ते संदीप गलुगडे यांनी वर्तवली आहे. तसेच प्रशासनाने उलटा कारभार करत नाल्यातील गाळ काढण्यापूर्वी पिचिंगचे काम सुरू ठेवल्यास तिथला गाळ अधिकाऱ्यांच्या दालनात टाकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

नाल्याच्या भोवती अमृत योजनेअंतर्गत हरित पट्टा तयार करण्यात आलेला आहे. हा हरित पट्टा तयार करण्यापूर्वीच नाल्यातील गाळ काढून सभोवतालची माती ढासळू नये, याकरिता त्या ठिकाणी पिचिंग करणे आवश्यक होते. मात्र, अमृत योजनेअंतर्गतच्या कामांची घाई केली गेल्याने, त्यानंतर वर्षभराने पिचिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, नाल्यातील गाळ तसाच असल्याने पिचिंगची कामे झाल्यानंतर तो कसा काढणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. तर पालिकेने नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीच पिचिंगचे काम हाती घेतल्याने, घणसोलीकरांना पूर परिस्थितीच्या संकटात ढकलण्याचा प्रयत्न होत असल्याचाही संताप व्यक्त होत आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई