शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

शहरातील जलसंपत्तीचे महत्त्व कळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 02:08 IST

जलसंपन्न महापालिका म्हणून नवी मुंबईची देशभर ओळख आहे. स्वत:च्या मालकीचे धरण, १३२ विहिरी, २४ तलाव, ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, रेल्वेचे धरण एवढा प्रचंड जलसाठा शहरात उपलब्ध आहे

नामदेव मोरे नवी मुंबई : जलसंपन्न महापालिका म्हणून नवी मुंबईची देशभर ओळख आहे. स्वत:च्या मालकीचे धरण, १३२ विहिरी, २४ तलाव, ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, रेल्वेचे धरण एवढा प्रचंड जलसाठा शहरात उपलब्ध आहे. परंतु मोरबे धरण वगळता इतर जलसाठ्याचा वापरच होत नाही. पाण्याची उधळपट्टी सुरू असून बांधकामासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर करणारे एकमेव शहर असून भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.देशातील सर्व प्रमुख महानगरांना तीव्र उकाड्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक शहरांमध्ये आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच पाणी मिळत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागत असून अनेक गावांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. परंतु नवी मुंबई हे एकमेव शहर असे आहे जिथे मे अखेरीसही चोवीस तास पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील बांधकामांसाठीही पिण्याचे पाणी वापरले जात आहे. अशाप्रकारे उधळपट्टी करणारे एकमेव शहर आहे. बहुतांश उद्याने व पिण्याव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींसाठी शुद्ध पाण्याचाच वापर केला जात आहे. वास्तविक नवी मुंबईमध्ये मोरबे धरणाव्यतिरिक्त प्रचंड जलसाठा उपलब्ध आहे. दिघा येथील रेल्वेच्या धरणामध्ये उन्हाळ्यातही भरपूर पाणी आहे. परंतु हे धरण हस्तांतर करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन वर्षापूर्वी हस्तांतरणासाठी आजी-माजी खासदारांमध्ये श्रेयवाद सुरू होता. प्रत्यक्षात पाण्याचा काहीही उपयोग झालेला नाही.महापालिका कार्यक्षेत्रामध्ये २४ तलाव असून त्यामधील पाण्याचा काहीही उपयोग केला जात नाही. याशिवाय शहरात १३२ विहिरी आहेत. विहिरींची स्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक विहिरी बुजविल्या जात आहेत. देशातील सर्वात चांगली मलनि:सारण केंद्रे नवी मुंबईमध्ये आहेत. सात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. परंतु येथील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा काहीही उपयोग होत नाही. वास्तविक शहरातील रेल्वेचे धरण, विहिरी व तलावांसह मलनि:सारण केंद्रामधील पाण्याचा वापर बांधकाम व्यवसाय, उद्यान व इतर वापरासाठी केला जावू शकतो. पण यासाठीची यंत्रणा उभी करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर वापर केला नाही तर भविष्यात इतर शहरांप्रमाणे नवी मुंबईकरांनाही पाणीसमस्येला सामोरे जावे लागू शकते.उद्यानांना पाणी वापरण्यास सुरुवातशहरातील मलनि:सारण केंद्रामधील प्रक्रिया केलेले पाणी काही उद्यानांना पुरविले जात आहे. परंतु पाण्याचा उपलब्ध साठा व होणारा वापर यामध्ये प्रचंड तफावत आहे. पाण्यावर प्रक्रिया करून ते खाडीत सोडून द्यावे लागत असून याविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.