शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

शहरातील जलसंपत्तीचे महत्त्व कळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 02:08 IST

जलसंपन्न महापालिका म्हणून नवी मुंबईची देशभर ओळख आहे. स्वत:च्या मालकीचे धरण, १३२ विहिरी, २४ तलाव, ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, रेल्वेचे धरण एवढा प्रचंड जलसाठा शहरात उपलब्ध आहे

नामदेव मोरे नवी मुंबई : जलसंपन्न महापालिका म्हणून नवी मुंबईची देशभर ओळख आहे. स्वत:च्या मालकीचे धरण, १३२ विहिरी, २४ तलाव, ७ अत्याधुनिक मलनि:सारण केंद्र, रेल्वेचे धरण एवढा प्रचंड जलसाठा शहरात उपलब्ध आहे. परंतु मोरबे धरण वगळता इतर जलसाठ्याचा वापरच होत नाही. पाण्याची उधळपट्टी सुरू असून बांधकामासाठीही पिण्याच्या पाण्याचा वापर करणारे एकमेव शहर असून भविष्यात याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.देशातील सर्व प्रमुख महानगरांना तीव्र उकाड्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक शहरांमध्ये आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसच पाणी मिळत आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागत असून अनेक गावांना टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. परंतु नवी मुंबई हे एकमेव शहर असे आहे जिथे मे अखेरीसही चोवीस तास पाणीपुरवठा केला जात आहे. शहरातील बांधकामांसाठीही पिण्याचे पाणी वापरले जात आहे. अशाप्रकारे उधळपट्टी करणारे एकमेव शहर आहे. बहुतांश उद्याने व पिण्याव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींसाठी शुद्ध पाण्याचाच वापर केला जात आहे. वास्तविक नवी मुंबईमध्ये मोरबे धरणाव्यतिरिक्त प्रचंड जलसाठा उपलब्ध आहे. दिघा येथील रेल्वेच्या धरणामध्ये उन्हाळ्यातही भरपूर पाणी आहे. परंतु हे धरण हस्तांतर करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. दोन वर्षापूर्वी हस्तांतरणासाठी आजी-माजी खासदारांमध्ये श्रेयवाद सुरू होता. प्रत्यक्षात पाण्याचा काहीही उपयोग झालेला नाही.महापालिका कार्यक्षेत्रामध्ये २४ तलाव असून त्यामधील पाण्याचा काहीही उपयोग केला जात नाही. याशिवाय शहरात १३२ विहिरी आहेत. विहिरींची स्थिती अत्यंत बिकट आहे. अनेक विहिरी बुजविल्या जात आहेत. देशातील सर्वात चांगली मलनि:सारण केंद्रे नवी मुंबईमध्ये आहेत. सात अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रे उभारली आहेत. परंतु येथील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा काहीही उपयोग होत नाही. वास्तविक शहरातील रेल्वेचे धरण, विहिरी व तलावांसह मलनि:सारण केंद्रामधील पाण्याचा वापर बांधकाम व्यवसाय, उद्यान व इतर वापरासाठी केला जावू शकतो. पण यासाठीची यंत्रणा उभी करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे. शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उपलब्ध जलसाठ्याचा काटेकोर वापर केला नाही तर भविष्यात इतर शहरांप्रमाणे नवी मुंबईकरांनाही पाणीसमस्येला सामोरे जावे लागू शकते.उद्यानांना पाणी वापरण्यास सुरुवातशहरातील मलनि:सारण केंद्रामधील प्रक्रिया केलेले पाणी काही उद्यानांना पुरविले जात आहे. परंतु पाण्याचा उपलब्ध साठा व होणारा वापर यामध्ये प्रचंड तफावत आहे. पाण्यावर प्रक्रिया करून ते खाडीत सोडून द्यावे लागत असून याविषयी दक्ष नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.