शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
6
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
8
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
9
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
10
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
11
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
12
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
13
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
15
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
16
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
17
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
18
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
19
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
20
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!

पुनर्वसनासंदर्भातील भूलथापांना बळी पडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 2:58 AM

विमानतळबाधितांसाठी सिडकोने २२.५ टक्क्यांचे सर्वोत्तम पॅकेज देऊ केले आहे.

नवी मुंबई : विमानतळबाधितांसाठी सिडकोने २२.५ टक्क्यांचे सर्वोत्तम पॅकेज देऊ केले आहे. स्थलांतर होणाऱ्या दहा गावांच्या पुनर्वसनासंदर्भातील बहुतांशी प्रश्न निकाली निघाले आहेत. तरीसुद्धा काही घटकांकडून ग्रामस्थांची दिशाभूल केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या दृष्टीने ही बाब आयोग्य असून, प्रकल्पग्रस्तांनी कोणत्याही भूलथापा आणि अफवांना बळी पडू नये, असे आवाहन सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पपूर्व कामाने वेग घेतला आहे. विमानतळाच्या गाभा क्षेत्रात येणाºया दहा गावांच्या स्थलांतराचा प्रश्न काही प्रमाणात रखडला आहे. या प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही, त्यामुळे ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी सिडकोने पुन्हा कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्थलांतर होणाºया दहापैकी गणेशपुरी गावात शनिवारी बैठक घेण्यात आली. या बैठकील सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. पुनर्वसनासंदर्भातील ग्रामस्थांच्या शंका आणि प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रत्येक गावासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाºयाची नेमणूक करण्यात आली. गणेशपुरी गावासाठी अश्विनी पाटील यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती प्राजक्ता लवंगारे यांनी या वेळी ग्रामस्थांना दिली. विशेष म्हणजे, ही बैठक सुरू असताना काही घटकांकडून पुनर्वसनाच्या मुद्द्यावर ग्रामस्थांची दिशाभूल केली जात असल्याचे उपस्थित सिडको अधिकाºयांच्या निदर्शनास आले. त्यानुसार ग्रामस्थांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन या वेळी करण्यात आले. गणेशपुरी गावातील २१४ कुटुंबांपैकी १५१ कुटुंबांनी भूखंडाचा भाडेकरार केल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा देशाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, त्यामुळे तो पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे गरजेचे असल्याचे प्राजक्ता लवंगारे यांनी या वेळी स्पष्ट केले आहे. दहा गावांच्या स्थलांतराला वेग यावा, प्रकल्पग्रस्तांच्या शंकाचे निरसन व्हावे, या प्रक्रियेत त्यांना भेडसावणाºया विविध प्रश्नांची तातडीने सोडवणूक व्हावी, या दृष्टीने प्रत्येक गावासाठी नोडल अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकाºयाची नेमणूक करण्यात आली आहे. पुनर्वसनासंदर्भात कोणत्याही शंका असल्यास ग्रामस्थांनी संबंधित अधिकाºयाची भेट घ्यावी, असे आवाहन प्राजक्ता लवंगारे यांनी केले आहे.या बैठकीला उपजिल्हाधिकारी अश्विनी पाटील यांच्यासह सिडकोच्या संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.