शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

शहरात कृत्रीम पाणीटंचाई निर्माण करू नका; गणेश नाईक यांचा महापालिकेला इशारा

By कमलाकर कांबळे | Updated: December 6, 2023 19:42 IST

भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी काही घटकांच्या दहशतीखाली येऊन ठराविक प्रभागांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असून कृत्रीम पाणीटंचाई निर्माण करून नका, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा मंगळवारी भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याबरोबर बैठक घेतली. सलग पाच तास चालेल्या या बैठकीत त्यांनी विविध प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. विशेषत: पाण्याच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेऊन नवी मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, असा पवित्रा घेतला. महापालिकेला एमआयडीसीच्या बारवी धरणातून मिळणाऱ्या पाण्यात कपात झाल्याचे वृत्त आहे. तसेच क्षेत्रातील खारघर आणि कामोठे या भागात महापालिकेच्या मोरबे धरणातून ८० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबईत पाणीटंचाई निर्माण झाली असताना अन्य शहराला पाणी देण्याची गरज आहे का, असा सवाल करून याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा महापालिकेचे काम बंद पाडू , असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.

या बैठकीत नाईक यांनी विविध प्रलंबित प्रश्नांचा उहापोह केला. विशेषत: नवीन पाणी योजनेला गती देणे, मोरबे धरण, सिडको आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना तातडीने कायमस्वरूपी नोकऱ्या देणे, शिक्षक भरतीतील घोटाळ्याची चौकशी करावी, महापालिकेच्या विधी विभागाची पुनर्रचना करणे, महापालिका रुग्णालयांत तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणे आदी प्रश्नांचा यात समावेश आहे. या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईक