शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

शहरात कृत्रीम पाणीटंचाई निर्माण करू नका; गणेश नाईक यांचा महापालिकेला इशारा

By कमलाकर कांबळे | Updated: December 6, 2023 19:42 IST

भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी काही घटकांच्या दहशतीखाली येऊन ठराविक प्रभागांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असून कृत्रीम पाणीटंचाई निर्माण करून नका, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा मंगळवारी भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याबरोबर बैठक घेतली. सलग पाच तास चालेल्या या बैठकीत त्यांनी विविध प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. विशेषत: पाण्याच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेऊन नवी मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, असा पवित्रा घेतला. महापालिकेला एमआयडीसीच्या बारवी धरणातून मिळणाऱ्या पाण्यात कपात झाल्याचे वृत्त आहे. तसेच क्षेत्रातील खारघर आणि कामोठे या भागात महापालिकेच्या मोरबे धरणातून ८० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबईत पाणीटंचाई निर्माण झाली असताना अन्य शहराला पाणी देण्याची गरज आहे का, असा सवाल करून याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा महापालिकेचे काम बंद पाडू , असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.

या बैठकीत नाईक यांनी विविध प्रलंबित प्रश्नांचा उहापोह केला. विशेषत: नवीन पाणी योजनेला गती देणे, मोरबे धरण, सिडको आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना तातडीने कायमस्वरूपी नोकऱ्या देणे, शिक्षक भरतीतील घोटाळ्याची चौकशी करावी, महापालिकेच्या विधी विभागाची पुनर्रचना करणे, महापालिका रुग्णालयांत तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणे आदी प्रश्नांचा यात समावेश आहे. या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईक