शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

जि. प.त भाजप,बविआ आघाडी

By admin | Updated: February 17, 2015 22:48 IST

भाजपाने बविआचा बिनशर्त पाठिंबा घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व पदांचा ताबा घेण्याचा चंग बांधला आहे. तर या निवडणूकीत आमची युतीच नव्हती अशी भूमिका सेनेने अखेर घतली आहे़

पालघर : जिल्हा परीषदेच्या अध्यक्षपदासाठी बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपा सेना युतीत फूट पडल्याने भाजपाने बविआचा बिनशर्त पाठिंबा घेऊन जिल्हा परिषदेच्या सर्व पदांचा ताबा घेण्याचा चंग बांधला आहे. तर या निवडणूकीत आमची युतीच नव्हती अशी भूमिका सेनेने अखेर घतली आहे़ठाणे जिल्हयाच्या विभाजना नंतर पालघर जिल्हा परीषदेची निर्मिती करण्यांत आल्या नंतर पालघर नव्या जिल्हा परिषद व आठ पंचायत समित्यांच्या निवडणुका २८ जानेवारी रोजी घेण्यांत आल्या असून ३० जानेवारीच्या मतमोजणीत पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागा पैकी २१ जागावर भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले असून शिवसेनेचे १५ सदस्य तर बहुजन विकास आघाडीचे १० सदस्य असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने ५ जागा हस्तगत केल्या आहेत़ तर राष्ट्रवादीचे ४ सदस्य व कॉगें्रस व अपक्ष प्रत्येकी १ असे संख्याबळ आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपा व शिवसेनेत जागा वाटपा वरून बोलणी फिसकटल्याने दोन्ही पक्षांनी विरोधात उमेदवार उभे करून निवडणुका लढविल्या़ एकाही पक्षाला बहुमत प्राप्त करता न आल्याने किमान पदाधिकारी निवडीच्या वेळी तरी युतीत समेट घडून येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यांत येत होती़ मात्र निवडणूकीच्या आदल्या सायंकाळ पर्यंत भाजपा सेनेत समेटा ऐवजी बेबनाव दिसत होता. जिल्हा परीषद अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत भाजपा मोठा पक्ष म्हणून अध्यक्षपदावरील भाजपाचा दावा सेनेने मान्य केला असला तरी उपाध्यक्षपद व स्टॅडींग समिती व बांधकाम समितीचे चेअरमनपद शिवसेनेला मिळावे यासाठी गेले पांच दिवस वाटाघाटी सुरू होत्या़ त्या निष्फळ ठरल्याने शेवटी कमळाबार्इंनी बहुजन विकास आघाडीची म्होतूर लावणे पसंत केले. त्यामुळे भविष्यात जि.प.त खडाजंगी सुरूच राहण्याची चिन्हे आहेत.४ जि.प.तील सत्ता वाटपाचा मुद्दा अखेर राज्य पातळीवरील नेत्याकडे नेण्यांत आला मात्र तेथेही आज सांयकाळ पर्यंत निर्णय झाला नाही़ भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे़ पालघरचे पालक मंत्री विप्णु सावरा व खासदार चिंतामण वनगा़ जिल्हाध्यक्ष बाबा काठोळे़ तर सेना नेते व ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार अनिल देसाई व सेनेचे प्रदेश कार्यालयीन प्रमुख मिलींद नार्वेकर यांच्या १६ तारखेच्या तसेच दोनही पक्षांच्या आजच्या बैठकीत देखील काही निष्पन्न झाले नाही. तर आमची वरीष्ठ पातळीवर बोलणी सुरू असल्याचे दोन्ही पक्ष म्हणत होते.