शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
5
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
6
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
7
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
8
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
9
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
10
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
11
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
12
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
13
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
14
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
15
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
16
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
17
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
18
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
19
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
20
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?

जिल्ह्यात ६७० जणांना सर्प तर २४१२ जणांना विंचू दंश

By admin | Updated: December 12, 2015 00:55 IST

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात वास्तव्याला असलेल्या ६७० जणांना सर्प दंश झाला,

सुरेश लोखंडे,  ठाणेजिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात वास्तव्याला असलेल्या ६७० जणांना सर्प दंश झाला, तर २४१२ जणाना विंचू चावल्याची घटना घडल्या आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या कालावधील या घटना झाल्या. यात सुदैवाने एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनवणे यांनी केला. गेल्या वर्षी देखील मृत्यू झाला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र लोकमतने सर्व्हे केला असता शहापूरच्या बाबरवाडीत दोन भावंडे, भिवंडीच्या खोणीतील दोन भाऊ आणि खंबाळे येथील एकाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. या वर्षी देखील एकही मृत्यू नसल्याचा दावा केला आहे. या सर्प दंशाच्या सर्वाधिक घटना जून, जुलै, आॅगस्ट या कालावधीत घडल्या आहेत. पावसाचे पाणी बिळात शिरल्यामुळे, निवासी क्षेत्र, पायवाटा, वर्दळीचे ठिकाणे, गवत, शेतातील पीकालगतचे तण, दगडाच्या आडोशाला असलेले सर्प व विंचू चावले. अशा रूग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वेळीच उपचार झाले. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी एकही मृत्यू जिल्ह्यात झाला नसल्याचे प्रतिपादन डॉ. सोनवणे यांनी केले. गेल्या वर्षाच्या मे, जून, जुलै या तीन महिन्यात ठाणे, पालघर या दोन्ही जिह्यात सुमारे एक हजार १२ जणांना सर्प दंश झाला आहे. पण मागील आठ महिन्यात केवळ ठाणे जिल्ह्यातील ६७० जणांना सर्प दंश झाला. यामध्ये सर्वाधिक शहापूर तालुक्यातील २८७ जणांचा समावेश आहे. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील १९७ जण आहेत, मुरबाडमधील ८४, अंबरनाथचे ७४ आणि कल्याणच्या २८ जणांना सर्प दंश झाला आहे. विंचू चावलेल्या दोन हजार ४१२ रूग्णांवर आरोग्य केंद्रांमध्ये उपचार झाले. मागील दोन हजार १४५ विंचू दंशाचे रूग्ण होते. त्यात या वर्षी २६७ रूग्णांची वाढ होऊन विंचू दंशाचे दोन हजार ४१२ जण आढळले आहेत.