शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जिल्ह्यात ६७० जणांना सर्प तर २४१२ जणांना विंचू दंश

By admin | Updated: December 12, 2015 00:55 IST

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात वास्तव्याला असलेल्या ६७० जणांना सर्प दंश झाला,

सुरेश लोखंडे,  ठाणेजिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागात वास्तव्याला असलेल्या ६७० जणांना सर्प दंश झाला, तर २४१२ जणाना विंचू चावल्याची घटना घडल्या आहेत. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्याच्या कालावधील या घटना झाल्या. यात सुदैवाने एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एस. सोनवणे यांनी केला. गेल्या वर्षी देखील मृत्यू झाला नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र लोकमतने सर्व्हे केला असता शहापूरच्या बाबरवाडीत दोन भावंडे, भिवंडीच्या खोणीतील दोन भाऊ आणि खंबाळे येथील एकाचा मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. या वर्षी देखील एकही मृत्यू नसल्याचा दावा केला आहे. या सर्प दंशाच्या सर्वाधिक घटना जून, जुलै, आॅगस्ट या कालावधीत घडल्या आहेत. पावसाचे पाणी बिळात शिरल्यामुळे, निवासी क्षेत्र, पायवाटा, वर्दळीचे ठिकाणे, गवत, शेतातील पीकालगतचे तण, दगडाच्या आडोशाला असलेले सर्प व विंचू चावले. अशा रूग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वेळीच उपचार झाले. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी एकही मृत्यू जिल्ह्यात झाला नसल्याचे प्रतिपादन डॉ. सोनवणे यांनी केले. गेल्या वर्षाच्या मे, जून, जुलै या तीन महिन्यात ठाणे, पालघर या दोन्ही जिह्यात सुमारे एक हजार १२ जणांना सर्प दंश झाला आहे. पण मागील आठ महिन्यात केवळ ठाणे जिल्ह्यातील ६७० जणांना सर्प दंश झाला. यामध्ये सर्वाधिक शहापूर तालुक्यातील २८७ जणांचा समावेश आहे. या खालोखाल भिवंडी तालुक्यातील १९७ जण आहेत, मुरबाडमधील ८४, अंबरनाथचे ७४ आणि कल्याणच्या २८ जणांना सर्प दंश झाला आहे. विंचू चावलेल्या दोन हजार ४१२ रूग्णांवर आरोग्य केंद्रांमध्ये उपचार झाले. मागील दोन हजार १४५ विंचू दंशाचे रूग्ण होते. त्यात या वर्षी २६७ रूग्णांची वाढ होऊन विंचू दंशाचे दोन हजार ४१२ जण आढळले आहेत.