शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीविरोधात असंतोष

By admin | Updated: October 1, 2015 02:06 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघा परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

नवी मुंबई : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एमआयडीसीने दिघा परिसरातील बेकायदा बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. परंतु या कारवाईच्या विरोधात रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला. हजारोंच्या संख्येने रहिवासी रस्त्यावर उतरल्याने परिसरात सकाळपासूनच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काही दुकानांच्या गाळ्यावर कारवाईची औपचारिकता करून एमआयडीसीच्या पथकाला माघारी फिरावे लागले. असे असले तरी सोमवारपासून पुन्हा कारवाई गतिमान करणार असल्याचे एमआयडीसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.आरटीआय कार्यकर्ते राजीव मिश्रा यांच्या जनहित याचिकेची दखल घेत न्यायालयाने दिघा परिसरातील ९९ इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. यातील बहुतांशी इमारती एमआयडीसीच्या जमिनीवर आहेत. त्यामुळे एमआयडीसीने या बांधकामांना एमआरपी अ‍ॅक्टनुसार नोटिसा बजावून मंगळवारपासून प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे. पहिल्या दिवशी बिंदूमाधव नगरमधील बांधकाम सुरू असलेल्या तीन इमारतींवर कारवाई करण्यात आली. तर आज दिघा परिसरातील तीन निवासी इमारतींवर कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार सकाळपासूनच या विभागाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. मात्र या कारवाईच्या विरोधात हजारोंच्या संख्येने रहिवासी रस्त्यावर उतरल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आयुष्यभराची कमाई खर्ची घालून आम्ही या इमारतीत घरे घेतली. त्यावर आता कारवाई होणार असेल तर आम्ही जायचे कुठे, असा सवाल संतप्त महिलांनी उपस्थित केला. आम्हाला बेघर करण्यापेक्षा या इमारती बांधणारे विकासक, त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, महापालिकेचे अधिकारी, वीज पुरवठा देणारे महावितरणचे संबंधित अधिकारी व बघ्याची भूमिका घेणारे पोलीस यांच्यावर पहिल्यांदा कारवाई करा, अशी मागणी संतप्त रहिवाशांनी यावेळी लावून धरली. दरम्यान, रहिवाशांच्या विरोधामुळे सकाळी ९.३0 ते दुपारी २.३0 वाजेपर्यंत एमआयडीसीच्या पथकाला कोणतीही कारवाई करता आली नाही. शेवटी न्यायलयाच्या आदेशानुसार ही कारवाई अपरिहार्य असल्याचे एमआरडीसी व पोलीस अधिकाऱ्यांनी रहिवाशांना समजावून सांगितले. त्यामुळे दुपारनंतर त्यांचा विरोध काहीसा मावळल्याने तीन वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली. असे असले तरी आज केवळ इमारतीतील काही वाणिज्य गाळे व एका हॉटेलच्या बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर तिन्ही इमारतींचा वीज व पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)--------------------दिघ्यातील शिवराम सदन, पार्वती अपार्टमेंट व केरू प्लाझा या तीन अनधिकृत इमारतींवर आज कारवाई करण्यात येणार होती. त्यानुसार सकाळपासूनच या विभागाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. परंतु रहिवाशांनी या कारवाईच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. घोषणाबाजी करीत रहिवाशांनी कारवाईला अटकाव करण्याचा प्रयत्न केला. काही महिलांनी मार्गात गणपती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ठेवला होता. विरोध करणाऱ्यांत महिलांची संख्या लक्षणीय होती. समाजसेविका ऋता आव्हाड यांनी आज पुन्हा रहिवाशांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.