शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषणामुळे तुर्भेसह कोपरीच्या नागरिकांमध्ये असंतोष, आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 23:58 IST

Navi Mumbai : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदार रसायनमिश्रीत पाणी प्रक्रिया न करता नाल्यांमध्ये सोडून देत आहेत.

नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील रसायनमिश्रीत पाणी नाल्यांमध्ये सोडले जात असल्यामुळे तुर्भेसह कोपरी परिसरामधील प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. रहिवाशांनी पालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली असून, कडक कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदार रसायनमिश्रीत पाणी प्रक्रिया न करता नाल्यांमध्ये सोडून देत आहेत. पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमधून हे पाणी खाडीमध्ये मिसळत आहे. नाल्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या वसाहतीमध्ये तीव्र दुर्गंधी पसरत आहे. कारखान्यांमधून हवेत धूर सोडला जात असून, त्यामुळेही कोपरी, वाशी सेक्टर २६, तुर्भे गाव, तुर्भे सेक्टर २१, २२ व इतर परिसरातील प्रदूषण वाढत आहे. कोपरी परिसरामध्ये एक वर्षापासून प्रदूषण सातत्याने वाढत आहे. सप्टेंबरपासून खूपच वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. चक्कर येणे, मळमळणे व इतर अजार होऊ लागले आहेत. लोकप्रतिनिधीनी वारंवार याविषयी महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या जात असूनही त्याची योग्य पद्धतीने दखल घेतली जात नाही. नुकतीच आमदार गणेश नाईक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देण्यात आले आहे.एमआयडीसीतील कारखानदारांनी दूषित पाणी सीईटीपी केंद्रात पाठवून तेथे त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी नाल्यात सोडून देणे अपेक्षित आहे, परंतु प्रक्रिया न करताच रसायनमिश्रीत पाणी नाल्यात सोडले जात आहे. याविषयी रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. लोकप्रतिनिधीही वारंवार आवाज उठवत आहेत, परंतु प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. यामुळे लवकरच प्रदूषण थांबविण्यासाठी येथील नागरिक तीव्र लढा उभा करणार आहेत.

कोपरी परिसरात एक वर्षापासून प्रदूषण वाढत आहे. आम्ही वारंवार याविषयी तक्रारी केल्या आहेत, परंतु प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. लवकरच जनआंदोलन उभे केले जाईल.- परशुराम भोईर, माजी नगरसेवक, कोपरी

तुर्भे परिसरातही प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुर्गंधीमुळे नागरिक आजारी पडू लागले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याविषयी निवेदन दिले असून, कारवाई झाली नाही, तर जनहितासाठी आंदोलन केले जाईल.- शुभांगी पाटील, माजी स्थायी समिती सभापती

एमआयडीसीला लागून असलेल्या परिसरामध्ये प्रदूषण वाढत आहे. सकाळी व सायंकाळी दुर्गंधी वाढत आहे. नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडले जात आहे. तत्काळ प्रदूषण थांबविले नाही व संबंधितांवर कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल.- रामचंद्र घरत, जिल्हा अध्यक्ष भाजप

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई