शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

प्रदूषणामुळे तुर्भेसह कोपरीच्या नागरिकांमध्ये असंतोष, आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 23:58 IST

Navi Mumbai : ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदार रसायनमिश्रीत पाणी प्रक्रिया न करता नाल्यांमध्ये सोडून देत आहेत.

नवी मुंबई : औद्योगिक वसाहतीमधील रसायनमिश्रीत पाणी नाल्यांमध्ये सोडले जात असल्यामुळे तुर्भेसह कोपरी परिसरामधील प्रदूषणामध्ये वाढ झाली आहे. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. रहिवाशांनी पालिकेसह प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली असून, कडक कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील अनेक कारखानदार रसायनमिश्रीत पाणी प्रक्रिया न करता नाल्यांमध्ये सोडून देत आहेत. पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांमधून हे पाणी खाडीमध्ये मिसळत आहे. नाल्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या वसाहतीमध्ये तीव्र दुर्गंधी पसरत आहे. कारखान्यांमधून हवेत धूर सोडला जात असून, त्यामुळेही कोपरी, वाशी सेक्टर २६, तुर्भे गाव, तुर्भे सेक्टर २१, २२ व इतर परिसरातील प्रदूषण वाढत आहे. कोपरी परिसरामध्ये एक वर्षापासून प्रदूषण सातत्याने वाढत आहे. सप्टेंबरपासून खूपच वाढ झाली आहे. प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. चक्कर येणे, मळमळणे व इतर अजार होऊ लागले आहेत. लोकप्रतिनिधीनी वारंवार याविषयी महानगरपालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या जात असूनही त्याची योग्य पद्धतीने दखल घेतली जात नाही. नुकतीच आमदार गणेश नाईक व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदन देण्यात आले आहे.एमआयडीसीतील कारखानदारांनी दूषित पाणी सीईटीपी केंद्रात पाठवून तेथे त्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रक्रिया केल्यानंतर ते पाणी नाल्यात सोडून देणे अपेक्षित आहे, परंतु प्रक्रिया न करताच रसायनमिश्रीत पाणी नाल्यात सोडले जात आहे. याविषयी रहिवाशांनी वारंवार तक्रारी केल्या आहेत. लोकप्रतिनिधीही वारंवार आवाज उठवत आहेत, परंतु प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. यामुळे लवकरच प्रदूषण थांबविण्यासाठी येथील नागरिक तीव्र लढा उभा करणार आहेत.

कोपरी परिसरात एक वर्षापासून प्रदूषण वाढत आहे. आम्ही वारंवार याविषयी तक्रारी केल्या आहेत, परंतु प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नाही. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. लवकरच जनआंदोलन उभे केले जाईल.- परशुराम भोईर, माजी नगरसेवक, कोपरी

तुर्भे परिसरातही प्रदूषणामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुर्गंधीमुळे नागरिक आजारी पडू लागले आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे याविषयी निवेदन दिले असून, कारवाई झाली नाही, तर जनहितासाठी आंदोलन केले जाईल.- शुभांगी पाटील, माजी स्थायी समिती सभापती

एमआयडीसीला लागून असलेल्या परिसरामध्ये प्रदूषण वाढत आहे. सकाळी व सायंकाळी दुर्गंधी वाढत आहे. नाल्यांमध्ये दूषित पाणी सोडले जात आहे. तत्काळ प्रदूषण थांबविले नाही व संबंधितांवर कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन उभे केले जाईल.- रामचंद्र घरत, जिल्हा अध्यक्ष भाजप

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई