शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

नवी मुंबई शहरातील सिग्नल यंत्रणेचा उडाला बोजवारा; टायमिंगच्या उपकरणात बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 1:21 AM

वाहनचालकांचा उडतोय गोंधळ , नवी मुंबईमधील प्रत्येक महत्त्वाच्या चौकामध्ये वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे.

नवी मुंबई : स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या नवी मुंबईमधील सिग्नल यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. सिग्नलमधील टायमिंगचे उपकरण बिघडले असून अनेक ठिकाणचे सिग्नल व्यवस्थित चालत नाहीत. यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नवी मुंबईमधील प्रत्येक महत्त्वाच्या चौकामध्ये वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. पामबीच रोड, वाशीतील शिवाजी चौक, महामार्ग व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नलमध्ये टायमिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. सिग्नल किती वेळ सुरू राहणार याची माहिती वाहनचालकांना मिळावी यासाठी टायमिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पामबीच रोडवरील आगरी कोळी भवन, सारसोळे जंक्शन, मोराज सर्कल, वाशी सेक्टर १७ मधील दोन सिग्नल, महामार्गावरील वाशीमधील सिग्नल, शिवाजी चौक व इतर अनेक महत्त्वाच्या सिग्नलच्या टायमिंगचे उपकरण नादुरुस्त झाले आहे. यामुळे सिग्नल नक्की किती वेळ असणार हे लक्षात येत नाही. परिणामी, सिग्नलचे नियम तोडून वाहने चालविण्यात येत आहेत. अनेक सिग्नल वारंवार बंदही होत आहेत. यामुळेही वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.

पामबीच रोड व इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या सिग्नलमधील टायमिंगची यंत्रणा नादुरुस्त असूनही ठेकेदाराकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक, प्रतिदिन प्रत्येक सिग्नल व्यवस्थित सुरू आहे की नाही हे मनपाच्या विद्युत विभागाने पाहणे आवश्यक आहे. ठेकेदारानेही ते पाहून आवश्यक ती दुरुस्ती तत्काळ केली पाहिजे. परंतु नागरिकांनी तक्रारी करूनही दुरुस्ती वेळेत होत नसल्यामुळे वाहनधारकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सिग्नल व्यवस्थित नसेल तर वाहतूककोंडी वाढण्याची व अपघात होण्याची शक्यता आहे.

अपघात झाल्यास जबाबदार कोण?सिग्नल व्यवस्थित चालत नसल्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होत आहे. गंभीर अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. भविष्यात सिग्नल बंद असल्यामुळे एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. अपघातजन्य परिस्थिती निर्माण केल्याबद्दल ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.

सिग्नल यंत्रणा व्यवस्थित चालत नसेल तर तत्काळ पाहणी करून ठेकेदारास दुरुस्तीच्या सूचना दिल्या जातील. याविषयी विनाविलंब कार्यवाही केली जाईल.    - सुनील लाड, कार्यकारी अभियंता, महानगरपालिका