शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
3
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
4
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
5
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
6
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
7
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
8
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
9
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
10
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
11
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
12
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
13
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
14
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
15
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
16
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
17
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
18
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
19
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
20
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलवरील कारवाईकडे दुर्लक्ष;  रिकाम्या जागेत शेड बांधून वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 01:02 IST

अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी संशय

- सुर्यकांत वाघमारे नवी मुंबई : हॉटेल व्यावसायिकांकडून होणाºया अतिक्रमणांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिक्रमण विरोधी कारवाईबाबत संशय व्यक्त होत आहे. हॉटेल समोरील जागेसह इतर मोकळ्या जागेत अतिक्रमण करुन त्याचा व्यवसायिक वापर केला जात आहे.

शहरातील हॉटेल व्यावसायिकांसाठी पालिकेची अभय योजना अस्तित्वात असल्याचा संशय सर्वसामान्यांकडून व्यक्त होत आहे. मागील काही वर्षात शहरातील वेगवेगळ्या प्रकारच्या अतिक्रमणांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. यावरुन सर्वसामान्यांचा प्रशासनाविषयी रोष वाढत चालला आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपासून पालिकेची विभाग निहाय अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु आहे. मात्र या कारवार्इंमध्ये हॉटेल्स व्यावसायिकांना वगळले जात असल्याचे दिसून येत आहे.

सद्यस्थितीला शहरात हॉटेल व्यवसाय तेजीत असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांच्याकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्याकरिता मार्जिनल स्पेसचा वापर करण्यासह हॉटल लगतच्या मोकळ्या जागाही बळकावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याठिकाणी ग्राहकांच्या बैठकीची सोय करुन संबंधीत जागेचा व्यवसायिक वापर करण्यावर जोर दिला जात आहे. याकरिता सरसकट सर्वच हॉटेल व्यावसायिकांमध्ये स्पर्धा लागल्याचे पहायला मिळत आहे. तर काहींनी मोक्याच्या जागा शोधूनच हॉटेल सुरु केले आहेत. त्यांच्याकडून पदपथ अथवा सोसायटीच्या आवारातील मोकळी जागा देखिल बंदिस्त करुन घेतली जात आहे. सध्या शहरातील प्रत्येक नोडमध्ये छोट्या मोठ्या हॉटेल्सच्या आवारात हे चित्र पहायला मिळत आहे.

काही हॉटेल व्यवसायिकांनी टेरेसच्या जागेत शेड उभारुन त्याठिकाणी मद्यपींसाठी विशेष सोय करुन दिल्या आहेत. तर काहींनी हॉटेल व बारच्या बाहेरच्या जागेतच टेबल मांडून उघड्यावर ग्राहकांची सोय करुन दिली आहे. याठिकाणी रात्री उशीरापर्यंत खानावळ अथवा तळीरामांच्या पार्ट्या रंगत आहेत. अशा ठराविक हॉटेल व बारवर यापूर्वी कारवाईचा दिखावा पालिकेकडून झालेला आहे. मात्र दुसरयाच दिवशी तिथली परिस्थीती जैसे थे पहायला मिळत आहे.

तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात बहुतांश हॉटेल्सचे अतिक्रमण पाडण्यात आले होते. मात्र त्यांच्या बदलीनंतर पुन्हा त्याठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आहे. मात्र पक्के बांधकाम करण्याऐवजी बांबूचे शेड उभारण्यात आले आहेत. वाशी, कोपर खैरणे, घणसोली, नेरुळ, सीबीडी यासह ऐरोली परिसरात असे प्रकार दिसून येत आहेत. तर काही रहिवाशी अथवा वाणिज्य इमारतींचे दोन पैकी एक प्रवेशद्वार देखील हॉटेल व्यवसायिकांनी बळकावले आहेत. त्याकरिता सोसायटी कमिटीला महिना ठराविक रसद पुरवली जात असल्याच्याही चर्चा आहेत.

टॅग्स :hotelहॉटेलNavi Mumbaiनवी मुंबई