शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
2
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
3
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
4
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
5
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
6
राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
7
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
9
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
10
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
11
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
12
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
13
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   
14
पक्के घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेची मुदत वाढवली, कशी आहे प्रक्रिया?
15
१८ महिन्यांनी राहु-केतु गोचर: शनीशी अशुभ युती संपणार; ८ राशींना बंपर लाभ होणार, शुभच घडणार!
16
परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३' सोडला, दिग्दर्शक प्रियदर्शन यांची आली प्रतिक्रिया; म्हणाले...
17
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलून 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' करा, उच्च न्यायालयात याचिका
18
भाच्याच्या प्रेमासाठी पतीची हत्या करुन शेजाऱ्यांना पाठवलं जेलमध्ये, सत्य समजताच हादरले पोलीस
19
3 दिवसांत सर केली हिमालयाची 5 शिखरे, CISFच्या महिला अधिकाऱ्याची ऐतिहासिक कमगिरी
20
जम्मू-काश्मीरमधील सुरनकोट मंदिरावरील हल्ल्यात पाकिस्तानचा हात; SIA कडून मोठा खुलासा

माथाडींच्या घरांचा वाद चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 02:20 IST

माथाडी कामगारांसाठी घणसोलीत उभारली जात असलेली इमारत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे

सूर्यकांत वाघमारे  नवी मुंबई : माथाडी कामगारांसाठी घणसोलीत उभारली जात असलेली इमारत वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सदर भूखंड माथाडी कामगारांसाठी सवलतीच्या दरात मिळवल्यानंतर, त्याचा मोठा भाग खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न युनियन करत असल्याचा कामगारांचा आरोप आहे. त्याचा जाब विचारल्याने युनियनने कामगारांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माथाडी कामगारांच्या घरांचा वाद चव्हाट्यावर आला असून मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.घणसोली सेक्टर ९ येथील २० क्रमांकाच्या सुमारे तीन एकरच्या भूखंडावर माथाडी कामगारांसाठी दोन इमारती उभारण्यात आल्या आहेत. सदर भूखंड अखिल महाराष्टÑ माथाडी कामगार युनियनने सुमारे दहा वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीवरून हा भूखंड सिडकोकडून अत्यल्प दराने मिळवला आहे. यानुसार त्यावर सुरवातीला सात मजली चार इमारती उभारल्या जाणार होत्या. परंतु कालांतराने बदलत गेलेल्या निर्णयानंतर सद्यस्थितीला त्याठिकाणी सतरा मजली दोन इमारती उभ्या आहेत. त्यामध्ये एफएसआयपासून ते सर्वच बाबतीत मोठा घोटाळा असल्याचा कामगारांचा आरोप आहे. तसेच कामगारांच्या नावे मिळवलेल्या एकूण भूखंडापैकी मोक्याचा भाग वेगळा करून तो खासगी विकासकाच्या घशात घालण्याचा युनियनचा प्रयत्न असल्याचाही कामगारांचा आरोप आहे. त्यावरून युनियन आणि कामगार यांच्यात काही वर्षांपासून वाद सुरू आहेत. अशातच इमारत बांधून पूर्ण असतानाही मागील चार वर्षांपासून घरांचा ताबा मिळत नसल्यानेही कामगार संतप्त झाले आहेत. अनेक कामगारांच्या पगारातून गृहकर्जाचे हप्ते जावू लागले आहेत. यामुळे लवकरात लवकर घराचा ताबा मिळावा यासाठी कामगारांनी युनियनकडे तगादा लावला आहे.मात्र कामगारांकडून वारंवार केल्या जाणाºया चौकशांना कंटाळून युनियनने काही प्रमुख कामगारांविरोधात पोलिसांकडेच तक्रार केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे १००/१५० कामगारांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याठिकाणी युनियन प्रमुख व कामगार समोरासमोर आल्याने वाद उद्भवून तणाव निर्माण झाला होता. अखेर संतप्त कामगारांनी देखील युनियनच्या पदाधिकाºयांविरोधात फसवणुकीची व दमदाटी केल्याची तक्रार केली आहे. वर्षभरापूर्वीच एका युनियनमार्फत घरे देण्याचे आमिष दाखवून, माथाडी तसेच बिगर माथाडींकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार घडलेला असतानाच, हा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे माथाडी कामगारांच्या नावे घरे लाटली जात असल्याची शक्यता नाकारता येत नाही.घणसोली सेक्टर ९ येथील माथाडी कामगारांसाठी मिळालेला २० क्रमांकाचा भूखंड मुख्य रस्त्यालगत मोक्याच्या ठिकाणी आहे. याच भूखंडालगतच्या इतर भूखंडाचे प्रति शंभर मीटरचे दर कोटीच्या घरात आहेत. त्यामुळे माथाडी कामगारांच्या या सुमारे तीन एकराच्या भूखंडापैकी शिल्लक असलेल्या जागेकडे अनेक खासगी विकासक डोळा लावून आहेत. त्याकरिताच भूखंडाच्या समोरच्या भागाऐवजी मागच्या भागात गृहप्रकल्प उभारण्यात आल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.कामगारांना लवकरात लवकर घरांचा ताबा देण्याचा युनियनचा प्रयत्न आहे. परंतु गृहप्रकल्प उभारताना अनेक कारणांनी झालेल्या विलंबामुळे बांधकाम खर्च अपेक्षेपेक्षा जास्त झाला आहे. त्याचा भार कामगारांवर नको याकरिता इमारतीखाली अथवा उर्वरित जागेत व्यावसायिक गाळे उभारणीचा प्रस्ताव सिडकोकडे मांडला असता सिडकोने तो नाकारला आहे. त्याव्यतिरिक्त माथाडी कामगारांच्या घराची जागा खासगी विकासकाला देण्यासंबंधी कसल्याही हालचाली झालेल्या नाहीत.- पोपट पाटील, संस्थापक,अखिल महाराष्टÑ माथाडी कामगार युनियनमाथाडी कामगारांना सदर इमारतीमध्ये सुमारे सात लाख रुपये मोजून घरे मिळणार आहेत. मात्र प्रत्यक्षात घराची पाहणी केल्यानंतर हे घर की खुराडे असा प्रश्न कामगारांच्या कुटुंबीयांना पडला आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी सिडकोने माथाडी कामगारांना पावणेदोन लाखात सिम्प्लेक्स वसाहतीत घरे दिली होती. त्यापेक्षाही या घरांचा आकार कमी व किंमत जास्त आहे. तर अग्निशमन यंत्रणाही उशिराने व उघड्यावर बसवल्याने अडचणीची ठरत आहे. शिवाय अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजावेळीच सिमेंट कोसळण्याचे प्रकार घडू लागले आहेत. यामुळे येथे रहायचे कसे असा प्रश्न कामगारांना पडला आहे. परंतु युनियनने घरे सुटसुटीत बांधण्याऐवजी जागा वाचवून विकासकाच्या घशात घालण्याला प्राधान्य दिल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप आहे.