शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्याची गैरपद्धतीने विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:24 IST

प्लास्टिकच्या वापरावर आलेल्या बंदीनंतरही वेगवेगळ्या समारंभांमध्ये त्याचा वापर होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. मात्र, चोरीछुपे वापरले जाणारे प्लास्टिक उघड्यावर जाळले जात

नवी मुंबई : प्लास्टिकच्या वापरावर आलेल्या बंदीनंतरही वेगवेगळ्या समारंभांमध्ये त्याचा वापर होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. मात्र, चोरीछुपे वापरले जाणारे प्लास्टिक उघड्यावर जाळले जात असल्याने नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृहाच्या समोरील मैदानावर हा प्रकार उघडकीस आला आहे.पर्यावरणाच्या दृष्टीने शासनाने राज्यात प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणली आहे. बंदी असलेल्या प्लास्टिकच्या उत्पादनांमध्ये पिशव्या, ग्लास, थर्माकोल आदीचा समावेश आहे. त्यानुसार अशी उत्पादने विकणाºया अथवा ग्राहकांना पुरवणाºया व्यावसायिकांवर पालिकेने कारवाया देखील केल्या आहेत. मात्र, विविध समारंभांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे ग्लास तसेच थर्माकोलच्या प्लेट वापरल्या जात असल्याचे दिसून येत आहे. मंगल कार्यालये, हॉल व्यवस्थापन तसेच कॅटरिंग व्यावसायिक यांच्याकडून चार भिंतीच्या आत या प्लास्टिकच्या साहित्यांचा वापर होत आहे. त्यामुळे मात्र पालिका अधिकाºयांचे अद्याप लक्ष गेले नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. याच संधीचा फायदा घेऊन मोठमोठ्या समारंभांमध्ये वापरला जाणारा प्लास्टिकचा कचरा जाळून नष्ट केला जात असल्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. प्लास्टिकच्या वापरापेक्षा तो जाळणे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक घातक आहे. त्यानंतरही उघडपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.कोपरखैरणे सेक्टर ४ ए येथील भूखंड क्रमांक १ वर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठवलेला कचरा जाळला जात आहे. त्यामध्ये प्लास्टिकचे ग्लास व प्लेटचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शेतकरी समाज मंदिर सभागृहासमोरच असलेल्या मोकळ्या भूखंडावर हा प्रकार होत आहे. यामुळे त्याच ठिकाणी होणाºया समारंभांमधला हा प्लास्टिकचा कचरा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर एक ते दोन दिवसांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा जाळला जात असल्याची परिसरातील रहिवाशांची तक्रार आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर व दुर्गंधी पसरत असल्याचीही त्यांची तक्रार आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीचा निर्णय खासगी हॉल, मंगल कार्यालये यांना वगळून आहे का? असा प्रश्नही रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.