शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

कचऱ्याची गैरपद्धतीने विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 04:24 IST

प्लास्टिकच्या वापरावर आलेल्या बंदीनंतरही वेगवेगळ्या समारंभांमध्ये त्याचा वापर होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. मात्र, चोरीछुपे वापरले जाणारे प्लास्टिक उघड्यावर जाळले जात

नवी मुंबई : प्लास्टिकच्या वापरावर आलेल्या बंदीनंतरही वेगवेगळ्या समारंभांमध्ये त्याचा वापर होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. मात्र, चोरीछुपे वापरले जाणारे प्लास्टिक उघड्यावर जाळले जात असल्याने नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोपरखैरणे येथील शेतकरी समाज मंदिर सभागृहाच्या समोरील मैदानावर हा प्रकार उघडकीस आला आहे.पर्यावरणाच्या दृष्टीने शासनाने राज्यात प्लास्टिकच्या वापरावर बंदी आणली आहे. बंदी असलेल्या प्लास्टिकच्या उत्पादनांमध्ये पिशव्या, ग्लास, थर्माकोल आदीचा समावेश आहे. त्यानुसार अशी उत्पादने विकणाºया अथवा ग्राहकांना पुरवणाºया व्यावसायिकांवर पालिकेने कारवाया देखील केल्या आहेत. मात्र, विविध समारंभांमध्ये अद्यापही मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे ग्लास तसेच थर्माकोलच्या प्लेट वापरल्या जात असल्याचे दिसून येत आहे. मंगल कार्यालये, हॉल व्यवस्थापन तसेच कॅटरिंग व्यावसायिक यांच्याकडून चार भिंतीच्या आत या प्लास्टिकच्या साहित्यांचा वापर होत आहे. त्यामुळे मात्र पालिका अधिकाºयांचे अद्याप लक्ष गेले नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. याच संधीचा फायदा घेऊन मोठमोठ्या समारंभांमध्ये वापरला जाणारा प्लास्टिकचा कचरा जाळून नष्ट केला जात असल्याचा गंभीर प्रकार सुरू आहे. प्लास्टिकच्या वापरापेक्षा तो जाळणे पर्यावरणाच्या दृष्टीने अधिक घातक आहे. त्यानंतरही उघडपणे सुरू असलेल्या या प्रकाराकडे प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे.कोपरखैरणे सेक्टर ४ ए येथील भूखंड क्रमांक १ वर हा प्रकार उघडकीस आला आहे. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा साठवलेला कचरा जाळला जात आहे. त्यामध्ये प्लास्टिकचे ग्लास व प्लेटचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. शेतकरी समाज मंदिर सभागृहासमोरच असलेल्या मोकळ्या भूखंडावर हा प्रकार होत आहे. यामुळे त्याच ठिकाणी होणाºया समारंभांमधला हा प्लास्टिकचा कचरा असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दर एक ते दोन दिवसांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा कचरा जाळला जात असल्याची परिसरातील रहिवाशांची तक्रार आहे. यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर व दुर्गंधी पसरत असल्याचीही त्यांची तक्रार आहे. त्यामुळे प्लास्टिकबंदीचा निर्णय खासगी हॉल, मंगल कार्यालये यांना वगळून आहे का? असा प्रश्नही रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.