शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य दिवाळखोरीत काढणारे सरकार बरखास्त करा, नाना पटोले यांची मागणी

By योगेश पिंगळे | Updated: October 7, 2023 17:11 IST

ज्या सरकारमध्ये गरिबांना, शेतकऱ्यांना, तरुणांना न्याय मिळत नसेल तर हे सरकारच बरखास्त करण्याची आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी सांगितले.

नवी मुंबई : यावर्षीचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्या पाहता या सरकारने राज्य दिवाळखोरीत काढल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबईत केला. राज्याला दिवाळखोरीकडे नेण्याचे काम शिंदे-भाजपने केले असून त्यांनी जनतेचे पैसे लुटल्याचा आरोप करून हे सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यपालांकडे केली असल्याचे पटोले यांनी सांगितले. नवी मुंबईतील ऐरोली येथे शनिवारी पार पडलेल्या काँग्रेसच्या कोकण विभागीय जिल्हा आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ज्या सरकारमध्ये गरिबांना, शेतकऱ्यांना, तरुणांना न्याय मिळत नसेल तर हे सरकारच बरखास्त करण्याची आमची भूमिका असल्याचे पटोले यांनी सांगितले. लोकसभा, विधानसभा, स्थानिक संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय आढावा घेतला जात असून १२ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील सर्व सहा विभागांचा आढावा घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक काँग्रेस लढणार असून मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याचे ते म्हणाले. राहुल गांधीच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढत असून भाजपाची रावणाची प्रवृत्ती जागी झाल्याने त्यांना सर्वत्र रावण दिसत असल्याची टीका यावेळी त्यांनी केली.

महागाई, बेरोजगारी, मोठ्या संख्येने होणाऱ्या आत्महत्या, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही, गरीबांना दवाखान्यात उपचार न मिळणे हे सर्व दहा डोक्यांचे रावणाचे गुण भाजपाचे असल्याचा हल्ला पटोले यांनी चढविला. भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली असून भाजपाच्या या रावण बुद्धीला दहन करण्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, कोकण विभागाचे समन्वयक प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, प्रदेश सरचिटणीस रमाकांत म्हात्रे, संतोष शेट्टी, नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा पुनम पाटील, जिल्हा प्रवक्ता रवींद्र सावंत आदी उपस्थित होते.

न्यायालयाचे ताशेरे तरीही मुश्रीफ सरकारमध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले असतानाही ते सत्तेत आहेत कारण ते गुजरातच्या वॉशिंगमशिनमध्ये असल्याची टीका यावेळी त्यांनी केली. जगातील सर्वात मोठा भ्रष्ट्राचार हा नोटबंदी असल्याचा आरोपदेखील यावेळी पटोले यांनी केला.

सत्तेत येण्यासाठी जाती धर्माचे बीज पेरले

भाजपने सत्तेत येण्यासाठी विविध जातीधर्माच्या लोकांना आरक्षण देण्याचा शब्द दिला. दोन वेळा केंदात आणि राज्यात सत्ता घेतली परंतु, आरक्षण मात्र न दिल्याचा आरोप पटोले यांनी यावेळी केला.

नवी मुंबई विमानतळाला दिबांचेच नाव

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा ठराव काँग्रेसने केला होता. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आणि विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याबाबत कॅबिनेटमध्ये निर्णय झाला. भाजपचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. परंतु, विमानतळाच्या नावाबाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून विमानतळाला दिबांचे नाव दिल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नसल्याचे पटोले यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNana Patoleनाना पटोले