शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

महामार्गावरील समस्यांमुळे प्रवाशांमध्ये असंतोष; अंधारामुळे अपघाताची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 06:42 IST

सायन - पनवेल महामार्गावरील सर्व पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. याविषयी नागरिकांनी वारंवार आवाज उठविल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेतलेली नाही.

- शैलेश चव्हाणतळोजा : सायन - पनवेल महामार्गावरील सर्व पथदिवे अनेक महिन्यांपासून बंद आहेत. याविषयी नागरिकांनी वारंवार आवाज उठविल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याची दखल घेतलेली नाही. अंधारामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. निष्काळजीपणा करणारे प्रशासन व ठेकेदाराविरोधात नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.शासनाने १२00 कोटी खर्च करून बांधलेल्या महामार्गावरील पथदिवे बंदच आहेत. अंधारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कळंबोली मॅकडोनाल्ड हॉटेलसमोरील पुणे एक्स्प्रेसवेच्या सुरवातीला खासगी वाहनांचा अनधिकृत थांबा तयार झाला आहे. यामुळे रोडवर वाहतूककोंडी होत आहे. अंधार व वाहतूककोंडी यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. कामोठे, कळंबोली शिवसेना शाखा व मॅकडोनाल्ड हॉटेलसमोर सध्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या ठिकाणी असलेल्या पादचारी पुलाखाली एसटी महामंडळाचा अधिकृत थांबा आहे, मात्र याच मार्गावर खासगी ट्रॅव्हल्स, त्याचप्रमाणे खासगी गाड्या थांबत असल्याने सध्या दुपारपासूनच या ठिकाणी मोठी गर्दी व यामुळे वाहतूककोंडी होत आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस रस्त्यावर विजेचे पोल बंद असल्याने रात्रीच्या वेळेस समोरून येणाऱ्या भरधाव गाड्यांचा अंदाज येत नाही. अंधारामुळे येथे मद्यपी, अमली पदार्थांचे सेवन करणाºयांचा वावरही वाढला आहे. चोरीच्या घटनांमध्येही वाढ होवू लागली आहे.कळंबोली, कामोठेप्रमाणे नवी मुंबईमधील वाशी, सानपाडा, नेरूळमध्ये एस.टी. च्या थांब्यावर अनधिकृतपणे खासगी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे संपूर्ण रोड अडविला जात असून रात्री चक्काजामची स्थिती असते. नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. पथदिव्यांचे वीज बिल भरले नसल्यामुळे विद्युतपुरवठा बंद करण्यात आला आहे. लवकरात लवकर पथदिवे बसविले नाहीत तर अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्रशासनाचे दुर्लक्षफिफा वर्ल्डकपदरम्यान महामार्गावरील पथदिवे सुरू केले होते. महामार्गावरील सर्व समस्या सोडविल्या होत्या, परंतु फिफा स्पर्धा संपल्यानंतर पुन्हा महामार्गाला समस्यांचा विळखा पडला आहे. पथदिव्यांचे बिलही भरले जात नाही. समस्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे प्रवाशांनी व नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.वारंवार याबाबत शासनाला हा प्रकार लक्षात आणून दिला तरी देखील गांभीर्याने याकडे लक्ष दिले जात नाही. या ठिकाणी असलेला थांबा या ठिकाणाहून दुसरीकडे उभारावा जेणेकरून प्रवाशांना या समस्यांचा सामना करावा लागणार नाही.- प्रशांत रणवरे,सामाजिक कार्यकर्ते

महामार्गावरील विजेच्या पोलच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून चार दिवसात उर्वरित काम पूर्ण करून पूर्ववत विद्युतपुरवठा सुरू केला जाईल.- विजय सानप,सा.बां. कनिष्ठ अभियंता,विद्युत विभाग

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई