शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

नवी मुंबई मनपा आयुक्तांच्या निवासस्थानातून साहित्य गहाळ झाल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 00:24 IST

Navi Mumabai News : नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांसाठी नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर संत गाडगेबाबा उद्यानाच्या पायथ्याशी बंगला बांधण्यात आला आहे. विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर हे अद्याप या निवासस्थानामध्ये राहण्यासाठी आलेले नाहीत.

नवी मुंबई : नेरुळ येथील मनपा आयुक्त निवासस्थानातून टीव्ही, फ्रीजसह इतर जुने साहित्य गहाळ झाल्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात सुरू आहे. युद्धपातळीवर बंगल्याची रंगरंगोटी करण्यात आली असून, नवीन साहित्य बसविण्यात आले आहे. साहित्य गहाळ झाल्याची कोणतीही तक्रार दाखल नसून, प्रशासनाने असे काही घडलेच नसल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे.नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांसाठी नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर संत गाडगेबाबा उद्यानाच्या पायथ्याशी बंगला बांधण्यात आला आहे. विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर हे अद्याप या निवासस्थानामध्ये राहण्यासाठी आलेले नाहीत. मागील काही दिवसांमध्ये या निवासस्थानातून जुने टीव्ही, फ्रीज, पडदे व इतर साहित्य गहाळ झाले आहे. मनपा प्रशासनाने गेल्या आठवड्यात युद्धपातळीवर बंगल्याची रंगरंगोटी केली असून, नवीन साहित्य बसविले आहे. पण, खरोघर साहित्य गहाळ झाले का, याविषयी प्रशासनाने ठोस दुजोरा दिलेला नाही. आयुक्त बंगल्यातील साहित्य गहाळ झाल्याविषयी सुरू असलेल्या चर्चेविषयी परिमंडळ एकचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्याशी संपर्क साधला असता, असे काहीही घडले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे साहित्य गहाळ झाले की, कोणी याविषयी अफवा उठविली, यावरून तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

अनेक प्रश्न उपस्थितखरे तर नवीन साहित्य बसविले असल्यास जुन्या साहित्याचे काय झाले, ते कोणाला दिले, कोणी नेले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. साहित्य गहाळ झाले असल्यास, त्याविषयी तक्रार दाखल होणेही आवश्यक आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका