शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

कासाडीला प्रदूषणाला विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 02:45 IST

प्रदूषणकारी कारखान्यांमुळे तळोजा येथील कासाडी नदीला धोका निर्माण झाला आहे.

- शैलेश चव्हाण तळोजा : प्रदूषणकारी कारखान्यांमुळे तळोजा येथील कासाडी नदीला धोका निर्माण झाला आहे. नदीच्या पात्रात कारखान्यातील रसायनमिश्रित पाणी सोडले जात असल्याने संपूर्ण नदीला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. याचा फटका परिसरातील मच्छीमारांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भातील वाढत्या तक्रारीची राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी गंभीर दखल घेतली असून नदीचे पात्र प्रदूषित करणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.तळोजा येथील कासाडी नदीची प्रदूषणामुळे पूर्णत: नासाडी झाली आहे. तळोजा एमआयडीसी क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातील प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीच्या पाण्याचा रंग बदलला आहे. पाण्याला काळा, निळा, लाल, हिरवा असे रंग प्राप्त झाले आहेत. त्यामुळे या नदीच्या पात्रात मासेमारी करणाºया स्थानिकांच्या रोजगारावर गदा आली आहे. विशेष म्हणजे पावसाळ्यात नदीचे पाणी आणखी गडद होते. नदीच्या पात्रात सोडल्या जाणाºया दूषित पाण्यामुळे मासे व इतर जलजीवांना धोका निर्माण झाला आहे. मासे मृत पावण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. शिवाय या नदीत आढळणारे खेकडा, कटले, चिवणी, लहान कोळंबी, जिताडा या माशांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. या प्रकाराबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण मंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.तळोजा औद्योगिक वसाहतीच्या पूर्वेकडून पश्चिमेस कासाडी नदी वाहते. हाजीमलंग डोंगराच्या पायथ्यापासून स्वच्छ व पारदर्शक असा निर्मळ पाण्याचा प्रवाह या नदीतून वाहतो. परंतु नदीचा प्रवाह तळोजा औद्योगिक वसाहतीच्या जवळ येताच पाण्याचा रंग बदलतो. ही बाब स्थानिकांनी संबंधित प्रशासनाच्या अनेकदा निदर्शनास आणून दिली आहे. परंतु आजतागायत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून आले आहे. मात्र आता खुद्द पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनीच या प्रकरणी कारवाई करण्याचे संकेत दिल्याने प्रदूषणकारी कारखान्यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अनंत हर्षवर्धन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.>अर्थपूर्ण चुप्पीपडघे गाव येथून पश्चिमेकडे वाहणाºया कासाडी नदीच्या काठावर औद्योगिक कारखाने वसले आहेत. तसेच तळोजा जलशुद्धी प्रकल्पही याच भागात आहे. कारखान्यातून सोडल्या जाणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया होते की, नाही हे तपासणे एमआयडीसी आणि प्रदूषण महामंडळाचे काम आहे. परंतु या दोन्ही यंत्रणांनी अर्थपूर्ण चुप्पी साधल्याने कासाडी नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.>कासाडी नदीत छुप्या पद्धतीने दूषित पाणी सोडणाºया कारखान्यांची गय केली जाणार नाही. स्थानिक मच्छीमार आणि पर्यावरणप्रेमींनी अशा कारखान्यांची नावे दिल्यास संबंधित कारखान्यांवर नियमाने कारवाई केली जाईल. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यात लक्ष घालीत नसतील, तर त्यांनाही समज दिली जाईल.- प्रवीण पोटे,राज्यमंत्री, पर्यावरण>कासाडी नदीच्या पात्रात दिवसाढवळ्या रसायनमिश्रित पाणी सोडले जाते. त्यामुळे नदीतील मासे व इतर जलजीवांना धोका निर्माण झाला आहे. याप्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.- योगेश पगडे,मच्छीमार, रोडपाली