शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
6
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
7
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
8
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
9
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
10
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
11
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
12
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
13
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
14
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
15
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
16
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
17
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
18
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
19
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
20
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...

माथाडी संघटनेमधील मतभेद उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 23:36 IST

बंदविषयी एकवाक्यता नाही; कडकडीत बंदची परंपरा पहिल्यांदा खंडित

नवी मुंबई : प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदनिमित्त माथाडी संघटनेमधील मतभेद पुन्हा उघडकीस आले आहेत. कामगार नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांच्यामध्ये बंदविषयी एकवाक्यता झाली नाही. परिणामी, बाजारसमितीच्या स्थापनेपासून प्रथमच कडकडीत बंदची परंपरा खंडित झाली असून आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला.सद्यस्थितीमध्ये राज्यातील सर्वात मोठी कामगार संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची ओळख आहे. माथाडी कायद्याचे जनक अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या या संघटनेची व्याप्ती राज्यभर पसरली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही याच संघटनेचे वर्चस्व आहे. ४३ वर्षांपासून कामगार संघटनेने आंदोलनाचे आवाहन केल्यानंतर बाजार समितीमधील पाचही मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळला जात होता; परंतु २६ फेब्रुवारीला पुकारण्यात आलेल्या बंदला प्रथमच संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. भाजी मार्केटमधील व्यवहार सुरळीत सुरू होते. बंदचा फारसा परिणाम येथील व्यवहारांवर झालेला नाही. जीवनावश्यक वस्तू असल्यामुळे मार्केट सुरू ठेवण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र माथाडी नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांच्यामध्ये एकवाक्यता नसल्यामुळे मार्केट सुरू राहिल्याची चर्चा दिवसभर बाजार समितीमध्ये सुरू होती. नरेंद्र पाटील हे संप यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मार्केट सुरू ठेवण्यासाठी काही घटक व इतर संघटना प्रयत्न करत होत्या. फळ मार्केटमध्येही इतर माथाडी संघटनांनीही मार्केट सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता; परंतु दुपारनंतर कामगार आक्रमक झाल्यामुळे जावक थांबविण्यात आली. कांदा, धान्य व मसाला मार्केटमध्ये बंद होते.माथाडी संघटनेमधील प्रमुख नेत्यांमध्ये अनेक वर्षांपासून काही विषयांवर मतभेद होत असल्याचे समोर येऊ लागले होते; परंतु कामगारांच्या हितासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनामध्ये सर्व नेते आक्रमकपणे सहभागी होतानाचे चित्र दिसत होते; परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र पाटील यांना सातारा मतदारसंघामध्ये शिवसेनेची उमेदवारी मिळाली होती. संघटनेचे कार्याध्यक्ष शशिकांत शिंदे हे राष्ट्रवादीचे प्रचारक होते. यामुळे प्रथमच प्रमुख नेत्यांमध्ये राजकीय मतभेद झाले. बाजार समिती निवडणुकीमध्ये कामगार मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना बिनविरोध निवडून देण्यात आले. दोन्ही प्रमुख नेत्यांनी चर्चा करून हा निर्णय घेतल्यामुळे मतभेद मिटल्याची चर्चा सुरू झाली होती; परंतु आंदोलनाच्या निमित्ताने हे मतभेद पुन्हा समोर आले आहेत. यामुळे कामगारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली आहे.संघटना एक राहावीमाथाडी कामगारांनीही नेत्यांच्या मतभेदाच्या चर्चेविषयी चिंता व्यक्त केली आहे. नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे हे दोन्हीही आक्रमक नेते असून कामगारांना त्यांची गरज आहे. माथाडी कायदा व कामगार दोन्हींच्या अस्तित्वासमोर अनेक संकटे निर्माण झाली आहेत. अशा स्थितीमध्ये दोन्ही नेत्यांनी एकविचाराने काम करावे, मतभेद वाढू देऊ नये, अशा प्रतिक्रिया अनेक कामगारांनी बंद दरम्यान व्यक्त केल्या.बंदसाठी पाटील आक्रमकमाथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नासाठी पुकारण्यात आलेला बंद यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील दिवसभर बाजार समिती परिसरात ठाण मांडून होते. प्रमुख पदाधिकाऱ्यांना घेऊन ते प्रत्येक मार्केटचा आढावा घेत होते. नाशिक, पुणे, सातारा व इतर ठिकाणी बंदची स्थिती काय आहे, याविषयी माहिती घेऊन कार्यकर्त्यांना सूचना देत होते.मतभेदाविषयी सावध प्रतिक्रियामाथाडी संघटनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा दिवसभर प्रसारमाध्यमे व बाजारसमितीमध्ये सुरू होती. याविषयी माहिती घेण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा मुद्दा महत्त्वाचा नाही. संपाची शासनाने दखल घेतली हे महत्त्वाचे असे सांगून मतभेदावर भाष्य करणे टाळले. माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी मात्र मतभेदाच्या वृत्तामध्ये तथ्य नसल्याचे सांगितले. आम्ही एकत्रपणे कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू व शासनाकडून सर्व मागण्या मान्य करून घेऊ, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती