शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

पनवेलमधील सैन्य भरतीतील उमेदवारांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 04:33 IST

आॅक्टोबर हिटचाही फटका : पाणी, प्रसाधनगृहांचीही कमतरता; जीव मुठीत घेऊन काढावी लागते रात्र

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी येथे ४ ते १३ आॅक्टोबर दरम्यान सैन्य भरती सुरू आहे, याकरिता दररोज पाच हजार उमेदवार येत आहेत. त्या तुलनेत या ठिकाणच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयाची कमरता असल्याने तरुणांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आॅक्टोबर हिट असल्याने, मिळेल त्या सावलीत बसून दिवस काढावा लागत आहे.

शासकीय नोकरी मिळणे, आजमितीला दुरापस्त झाले आहे. कित्येक तरुण, करेन तर सरकारी नोकरीच करेन, नाही तर घरी बसेन, अशी भूमिका घेतात. त्यामुळे पोलीस आणि सैन्यातील भरती होऊन स्वप्नपूर्ती करण्याची संधी राहते. त्याकरिता हजारो तरुण भरतीत उतरतात, त्यातील त्यात सैन्यात दरवर्षी अनेक जागा निघतात, रिक्त होतात. त्याचबरोबर समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी नोकरी असल्याने याकडे आजही तरुणांचा कल दिसून येतो. गुरुवारपासून कर्नाळा अकादमीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतील उमेदवारांकरिता सैन्यभरती सुरू झाली आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील हजारो तरुण पनवेलमध्ये दाखल झाले आहेत. पहाटे भरती प्रक्रि या सुरू होते. मात्र, तोपर्यंत उमेदवारांना अकादमीच्या बाहेरच रात्र काढावी लागत आहे. ठाणा नाका ते एनएच-४ बीला जोडणाºया रस्त्यावर भरतीकरिता आलेले तरुण झोपतात.उमेदवारांसाठी फक्त सहा मोबाइल टॉयलेटची सोय करण्यात आलेली आहे. पाच हजारांकरिता ही संख्या अपुरी असल्याने त्या ठिकाणी रांगा लागत आहेत, त्यामुळे उमेदवारांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या व्यतिरिक्त बाहेर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मिनरल वॉटर विकत घ्यावे लागत आहे. त्याचबरोबर रोडच्या दोन्ही बाजूला गवत वाढलेले आहे. तिथे स्वच्छता नसल्याने जीव मुठीत धरून झोपावे लागत आहे. आॅक्टोबर हिट असल्याने उकाडा जास्त आहे, त्यामुळे दिवसभर विसाव्याकरिता झाडे किंवा दुकानांच्या शेडचा आश्रय घ्यावा लागत आहे.बाहेर सहा टॉयलेट ठेवण्यात आलेले आहेत आणि पाच हजार युवक आले आहेत. त्यांना ते कसे पुरतील, त्यामुळे खूप गैरसोय झाली. याबाबत प्रशासनाने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, दोन दिवसांत तसे काही आढळले नाही. आम्हाला या गैरसोयींचा सामना करण्याशिवाय पर्याय नाही.- सचिन पाटील, मालेगावशौचालयाबरोबर पिण्याकरिता पाण्याची सोय नसल्याने आम्हाला तहान भागविण्याकरिता वणवण करावी लागली. मिनरल वॉटर घेऊन पाणी प्यावे लागत आहे. दोन दिवसांत अनेक बाटल्या विकत घ्याव्या लागल्या, त्याचाही भुर्दंड बसला. शेवटी आम्हाला सैन्यात भरती व्हायचे असल्याने गरजवंतांना अक्कल नसते.- दीपक सुळे, सटाना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई