शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

पनवेलमधील सैन्य भरतीतील उमेदवारांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 04:33 IST

आॅक्टोबर हिटचाही फटका : पाणी, प्रसाधनगृहांचीही कमतरता; जीव मुठीत घेऊन काढावी लागते रात्र

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी येथे ४ ते १३ आॅक्टोबर दरम्यान सैन्य भरती सुरू आहे, याकरिता दररोज पाच हजार उमेदवार येत आहेत. त्या तुलनेत या ठिकाणच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयाची कमरता असल्याने तरुणांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आॅक्टोबर हिट असल्याने, मिळेल त्या सावलीत बसून दिवस काढावा लागत आहे.

शासकीय नोकरी मिळणे, आजमितीला दुरापस्त झाले आहे. कित्येक तरुण, करेन तर सरकारी नोकरीच करेन, नाही तर घरी बसेन, अशी भूमिका घेतात. त्यामुळे पोलीस आणि सैन्यातील भरती होऊन स्वप्नपूर्ती करण्याची संधी राहते. त्याकरिता हजारो तरुण भरतीत उतरतात, त्यातील त्यात सैन्यात दरवर्षी अनेक जागा निघतात, रिक्त होतात. त्याचबरोबर समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी नोकरी असल्याने याकडे आजही तरुणांचा कल दिसून येतो. गुरुवारपासून कर्नाळा अकादमीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतील उमेदवारांकरिता सैन्यभरती सुरू झाली आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील हजारो तरुण पनवेलमध्ये दाखल झाले आहेत. पहाटे भरती प्रक्रि या सुरू होते. मात्र, तोपर्यंत उमेदवारांना अकादमीच्या बाहेरच रात्र काढावी लागत आहे. ठाणा नाका ते एनएच-४ बीला जोडणाºया रस्त्यावर भरतीकरिता आलेले तरुण झोपतात.उमेदवारांसाठी फक्त सहा मोबाइल टॉयलेटची सोय करण्यात आलेली आहे. पाच हजारांकरिता ही संख्या अपुरी असल्याने त्या ठिकाणी रांगा लागत आहेत, त्यामुळे उमेदवारांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या व्यतिरिक्त बाहेर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मिनरल वॉटर विकत घ्यावे लागत आहे. त्याचबरोबर रोडच्या दोन्ही बाजूला गवत वाढलेले आहे. तिथे स्वच्छता नसल्याने जीव मुठीत धरून झोपावे लागत आहे. आॅक्टोबर हिट असल्याने उकाडा जास्त आहे, त्यामुळे दिवसभर विसाव्याकरिता झाडे किंवा दुकानांच्या शेडचा आश्रय घ्यावा लागत आहे.बाहेर सहा टॉयलेट ठेवण्यात आलेले आहेत आणि पाच हजार युवक आले आहेत. त्यांना ते कसे पुरतील, त्यामुळे खूप गैरसोय झाली. याबाबत प्रशासनाने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, दोन दिवसांत तसे काही आढळले नाही. आम्हाला या गैरसोयींचा सामना करण्याशिवाय पर्याय नाही.- सचिन पाटील, मालेगावशौचालयाबरोबर पिण्याकरिता पाण्याची सोय नसल्याने आम्हाला तहान भागविण्याकरिता वणवण करावी लागली. मिनरल वॉटर घेऊन पाणी प्यावे लागत आहे. दोन दिवसांत अनेक बाटल्या विकत घ्याव्या लागल्या, त्याचाही भुर्दंड बसला. शेवटी आम्हाला सैन्यात भरती व्हायचे असल्याने गरजवंतांना अक्कल नसते.- दीपक सुळे, सटाना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई