शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील सैन्य भरतीतील उमेदवारांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 04:33 IST

आॅक्टोबर हिटचाही फटका : पाणी, प्रसाधनगृहांचीही कमतरता; जीव मुठीत घेऊन काढावी लागते रात्र

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी येथे ४ ते १३ आॅक्टोबर दरम्यान सैन्य भरती सुरू आहे, याकरिता दररोज पाच हजार उमेदवार येत आहेत. त्या तुलनेत या ठिकाणच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पिण्याच्या पाण्यापासून ते शौचालयाची कमरता असल्याने तरुणांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. आॅक्टोबर हिट असल्याने, मिळेल त्या सावलीत बसून दिवस काढावा लागत आहे.

शासकीय नोकरी मिळणे, आजमितीला दुरापस्त झाले आहे. कित्येक तरुण, करेन तर सरकारी नोकरीच करेन, नाही तर घरी बसेन, अशी भूमिका घेतात. त्यामुळे पोलीस आणि सैन्यातील भरती होऊन स्वप्नपूर्ती करण्याची संधी राहते. त्याकरिता हजारो तरुण भरतीत उतरतात, त्यातील त्यात सैन्यात दरवर्षी अनेक जागा निघतात, रिक्त होतात. त्याचबरोबर समाजात प्रतिष्ठा प्राप्त करून देणारी नोकरी असल्याने याकडे आजही तरुणांचा कल दिसून येतो. गुरुवारपासून कर्नाळा अकादमीत मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, नाशिक, ठाणे, रायगड या जिल्ह्यांतील उमेदवारांकरिता सैन्यभरती सुरू झाली आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील हजारो तरुण पनवेलमध्ये दाखल झाले आहेत. पहाटे भरती प्रक्रि या सुरू होते. मात्र, तोपर्यंत उमेदवारांना अकादमीच्या बाहेरच रात्र काढावी लागत आहे. ठाणा नाका ते एनएच-४ बीला जोडणाºया रस्त्यावर भरतीकरिता आलेले तरुण झोपतात.उमेदवारांसाठी फक्त सहा मोबाइल टॉयलेटची सोय करण्यात आलेली आहे. पाच हजारांकरिता ही संख्या अपुरी असल्याने त्या ठिकाणी रांगा लागत आहेत, त्यामुळे उमेदवारांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या व्यतिरिक्त बाहेर पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मिनरल वॉटर विकत घ्यावे लागत आहे. त्याचबरोबर रोडच्या दोन्ही बाजूला गवत वाढलेले आहे. तिथे स्वच्छता नसल्याने जीव मुठीत धरून झोपावे लागत आहे. आॅक्टोबर हिट असल्याने उकाडा जास्त आहे, त्यामुळे दिवसभर विसाव्याकरिता झाडे किंवा दुकानांच्या शेडचा आश्रय घ्यावा लागत आहे.बाहेर सहा टॉयलेट ठेवण्यात आलेले आहेत आणि पाच हजार युवक आले आहेत. त्यांना ते कसे पुरतील, त्यामुळे खूप गैरसोय झाली. याबाबत प्रशासनाने उपाययोजना करणे अपेक्षित होते. मात्र, दोन दिवसांत तसे काही आढळले नाही. आम्हाला या गैरसोयींचा सामना करण्याशिवाय पर्याय नाही.- सचिन पाटील, मालेगावशौचालयाबरोबर पिण्याकरिता पाण्याची सोय नसल्याने आम्हाला तहान भागविण्याकरिता वणवण करावी लागली. मिनरल वॉटर घेऊन पाणी प्यावे लागत आहे. दोन दिवसांत अनेक बाटल्या विकत घ्याव्या लागल्या, त्याचाही भुर्दंड बसला. शेवटी आम्हाला सैन्यात भरती व्हायचे असल्याने गरजवंतांना अक्कल नसते.- दीपक सुळे, सटाना

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई