शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल बिलबोर्डमुळे वाहन अपघातांसह पक्ष्यांच्या अधिवासाला धोका!

By नारायण जाधव | Updated: November 8, 2023 14:37 IST

तत्काळ बंदी आणा, पर्यावरणप्रेमींचे मुख्यमंत्र्याना पत्र

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: तेजोमय दिवाळी सर्वांचा आवडता सण आहे. दिवाळीच नव्हे तर इतर सणासुदीला केलेली रोषणाई सर्वांना आकर्षित करते. परंतु प्रखर डिजीटल बिलबोर्डांमुळे नवी मुंबईसह महामुंबईत वाहनांच्या अपघातासह पक्ष्यांच्या नैसर्गिक हालचाली व अधिवासास धोका निर्माण झाल्याचा दावा पर्यावरणप्रेमी संघटनानी केला आहे. एवढेच नव्हे तर अशा डिजिटल बिलबोर्डांना तत्काळ मनाई करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ई मेलद्वारा केली आहे.

वारंवार जाहिरात बदलणारे प्रखर लाइट्स कमालीचे त्रासदायक असतातच सोबत त्यामुळे सावधानतेमध्ये आलेल्या एका सेकंदाच्या व्यत्यय आणि विचलनाने देखील रहदारींच्या रस्त्यावर अपघात होऊ शकतात, तीन एनजीओंनी मुख्यमंत्र्यांना या आशयाचा ईमेल पाठवला आहे. हे लाइट्स अतिशय प्रखर असतात, त्यांच्या एका फ्लॅशने देखील व्हिज्युअल्स बदलू शकतात.

ते अतिशय त्रासदायक आणि विचलन करणारे असल्यामुळे एका झटक्याने सुद्धा चालकांना दिसेनासे होऊन भयंकर अपघातामध्ये पर्यवसनहोऊ शकते. या अपघातांमुळे गंभीर इजांसोबत कधीकधी कायम स्वरुपी व्यंग देखील येऊ शकते, रहदारी पाहता लोकमृत्यूमुखीदेखील पडू शकतात, असे नवी मुंबईतील नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार म्हणाले.

या गंभीर प्रखरतेचा आणखीन एक दुर्धर परिणाम म्हणजे यामुळे “प्रकाश प्रदूषण” होते, वन्यजीवांच्या खासकरुन पक्ष्यांच्या नैसर्गिक पध्दतींमध्ये अडचणी येतात, असे कुमार यांनी पुढे सांगितले. वॉचडॉग फाउंडेशनच्या गॉडफ्रे पिमेंटा यांनी पश्चिम द्रुतगती मार्गावरच्या, सायन-पनवेल महामार्गावरच्या आणि अगदी बीकेसी कनेक्टरच्या डिजिटल बिलबोर्डांबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे, ते मारक होर्डिंग्ज साबित होऊ शकतात, कारण त्यामुळे मोटार चालकांचे लक्ष रस्त्यांवरुन सहजपणे ढळू शकते.

प्रकाश प्रदूषणामुळेदेखील वातावरणातल्या कार्बन डायऑक्साईडच्या पातळीत वाढ होते आणि त्याप्रमाणे महामार्ग आणि रस्त्यांच्या लगतच्याघरांमध्ये लोकांच्या झोपेवर परिणाम होतो असे पिमेंटा म्हणाले. पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो. मागच्या वर्षीच्या जागतील स्थलांतरीत पक्षी दिनाची थीम प्रकाश प्रदूषण होती. संपूर्ण वर्षभर कार्यक्रमाने प्रखर प्रकाशामुळे पक्षांच्या हालचालीवर होणा-या परिणामावर लक्ष केंद्रित केले होते. या प्रकाशामुळे पक्षी रस्ता चुकू शकतात आणि मृत्यूमुखी पडू शकतात, असे कुमार म्हणाले.

स्थलांतरीत पक्षी चांगल्या पर्यावरणाचे मूक दूत असतात, कारण ते जिथे कुठेही जातात तिथले चांगले गुणविशेष दिसून येतात, असे नॅटकनेक्टने सांगितले आहे. संस्थेने या उडणाया पाहुण्यांविषयी संवेदनशील असण्याची, सहानुभूती दाखवण्याची शहर व शासकीय संस्थांना विनंती केली आहे. ईमेलमध्ये हे नमुद करण्यात आले आहे की, मुख्यमंत्र्यांनी रहदारीच्या स्थितींकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण ते स्वत:  मुंबई ते ठाणे तसेच इतर अनेक ठिकाणी प्रवास करतात. त्यामुळे या सर्व परिस्थितीचे गांभीर्य त्यांच्या लक्षात आले असावे. श्री एकवीरा आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार म्हणाले, जाहिरातीच्या डिझाइनर्सनी जरी “सृजनात्मक यश” मिळवले असले तरी, खास करुन हे सांगावेसे वाटते की प्रखर प्रकाश ही खरंतर धोकादायक संकल्पना आहे. म्हणून, त्यांनी मुंबईतील या प्रखर संकल्पनेला समाप्त करावे अशी सूचना दिली. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे प्रखर प्रकाशाचे बिलबोर्ड्स इतर ठिकाणी उदा. द्रुतगती मार्ग, मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गापर्यंत पोहोचण्यापासून निर्बंधित करण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई