शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
8
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
9
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
10
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
11
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
12
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
13
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
14
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
15
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
16
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल
17
संपादकीय : घोषणा नको, कृती हवी! दहशतवादाविरोधात भारताला आत्मनिर्भर व्हावे लागेल
18
इस्रायल की सशस्त्र टोळ्यांचा हल्ला? गाझामध्ये मदतीची प्रतीक्षा करणाऱ्यांवरच गोळीबार, ७३ जण ठार
19
तरुणांना भाषणबाजी नको, रोजगार हवा! राहुल गांधी यांनी व्यक्त केली चिंता
20
कृषिमंत्री कोकाटेंच्या मोबाइलवर पत्ते; विधानपरिषदेतील व्हिडीओने खळबळ

खालापूर तालुक्यातील धरणे ओव्हरफ्लो

By admin | Updated: July 13, 2016 02:09 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दमदार पाऊस आहे. शनिवारपासून खालापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण व पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत.

अमोल पाटील,  खालापूररायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दमदार पाऊस आहे. शनिवारपासून खालापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण व पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, खालापूर तालुक्यातील डोणवत, भिलवले, कलोते-मोकाशी या धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळेही धरण ओसंडून वाहत आहे. आतकरगाव, नढाळ, उसरोली व अन्य पाझर तलावही भरले आहेत. तालुक्यातील नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण मात्र अजूनही भरलेले नाही. मात्र मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असून, लवकरच हे धरणही ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत २८ धरणे आहेत. त्याचबरोबर अनेक पाझर तलावही रायगडमध्ये आहेत. खालापूर तालुक्यात मोरबे हे धरण मोठे असून, जलसंपदा विभागाकडून नवी मुंबई महापालिकेने हे धरण विकत घेतले आहे. या धरणातून नवी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणीसंचय क्षमता ६८ हजार २८६ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. गेले आठ दिवस खालापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत असला तरी मोरबे धरण मात्र अद्याप भरलेले नाही. तालुक्यातील डोणवत, भिलवले व कलोते-मोकाशी ही धरणे पावसामुळे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. खालापूरमध्ये सोमवारी दिवसभरात २४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ९७९.३ इतका मि.मी. पाऊस गेल्या काही दिवसांत खालापूर तालुक्यात पडला आहे.नवी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर इतकी असून, भिलवले २.१० दशलक्ष घनमीटर, कलोते-मोकाशी ४.१९ दशलक्ष घनमीटर तर डोणवत धरणामध्ये ३.२७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राहतो. त्यातील भिलवले धरणाचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. तर कलोते मोकाशी व डोणवत धरणातील पाणी शेती आणि उद्योगासाठी वापरण्यात येते. आजूबाजूच्या गावातील पाणी योजनाही या धरणावर अवलंबून आहेत. या क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणे भरली आहेत.