शहरं
Join us  
Trending Stories
1
GT 'टायटन्स' जहाज बुडता बुडता वाचलं! हार्दिकच्या चुकीमुळं MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

खालापूर तालुक्यातील धरणे ओव्हरफ्लो

By admin | Updated: July 13, 2016 02:09 IST

रायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दमदार पाऊस आहे. शनिवारपासून खालापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण व पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत.

अमोल पाटील,  खालापूररायगड जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून दमदार पाऊस आहे. शनिवारपासून खालापूर तालुक्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरण व पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. त्यामुळे आगामी काळातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून, खालापूर तालुक्यातील डोणवत, भिलवले, कलोते-मोकाशी या धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळेही धरण ओसंडून वाहत आहे. आतकरगाव, नढाळ, उसरोली व अन्य पाझर तलावही भरले आहेत. तालुक्यातील नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण मात्र अजूनही भरलेले नाही. मात्र मोरबे धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत असून, लवकरच हे धरणही ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.रायगड जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत २८ धरणे आहेत. त्याचबरोबर अनेक पाझर तलावही रायगडमध्ये आहेत. खालापूर तालुक्यात मोरबे हे धरण मोठे असून, जलसंपदा विभागाकडून नवी मुंबई महापालिकेने हे धरण विकत घेतले आहे. या धरणातून नवी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा केला जातो. जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाणीसंचय क्षमता ६८ हजार २८६ दशलक्ष घनमीटर एवढी आहे. गेले आठ दिवस खालापूर तालुक्यात समाधानकारक पाऊस पडत असला तरी मोरबे धरण मात्र अद्याप भरलेले नाही. तालुक्यातील डोणवत, भिलवले व कलोते-मोकाशी ही धरणे पावसामुळे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे या भागातील पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. खालापूरमध्ये सोमवारी दिवसभरात २४ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ९७९.३ इतका मि.मी. पाऊस गेल्या काही दिवसांत खालापूर तालुक्यात पडला आहे.नवी मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १९०.८९ दशलक्ष घनमीटर इतकी असून, भिलवले २.१० दशलक्ष घनमीटर, कलोते-मोकाशी ४.१९ दशलक्ष घनमीटर तर डोणवत धरणामध्ये ३.२७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा राहतो. त्यातील भिलवले धरणाचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. तर कलोते मोकाशी व डोणवत धरणातील पाणी शेती आणि उद्योगासाठी वापरण्यात येते. आजूबाजूच्या गावातील पाणी योजनाही या धरणावर अवलंबून आहेत. या क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणे भरली आहेत.