शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

शहरातील पर्यटनस्थळांचा विकास कागदावरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 22:44 IST

गवळीदेवलाही समस्यांचा विळखा, अडवली-भुतावलीचा प्रस्तावही बारगळला

- नामदेव मोरे

नवी मुंबई : स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या नवी मुंबईमधील पर्यटनस्थळांचा विकास रखडला आहे. गवळीदेव धबधबा परिसरालाही समस्यांचा विळखा पडला आहे. अडवली - भुतावली निसर्ग पर्यटनस्थळाचा प्रस्तावही बारगळला असून प्रशासनाच्या उदासीनतेविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

पावसाळा सुरू झाल्यापासून गवळीदेव धबधब्यावर पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई, ठाणेसह रायगड जिल्ह्यामधील पर्यटकांसाठी सर्वात सुरक्षित धबधबा म्हणून गवळीदेवची ओळख आहे. पनवेलमधील कुंडी धबधब्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

अपघातामुळे पांडवकडा धबधब्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घातली आहे. परंतु गवळीदेववर आतापर्यंत पर्यटकांचा मृत्यू झालेला नाही. यामुळे येथे सहकुटुंब पावसाळी सहलीचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. पर्यटकांची संख्या वाढली, परंतु त्या प्रमाणात सुविधा मिळत नसल्यामुळे नागरिकांकडून प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. येथील दोन्ही ठिकाणच्या प्रसाधनगृहांची दुरवस्था झाली आहे. त्याची साफसफाई करण्यासाठी काहीही सोय नाही. धबधबा परिसरामध्ये जाण्यासाठी पायरी मार्ग तयार करण्यात आलेला नाही. रेलिंग बसविण्यात आले नाही. सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. पर्यटकांची सर्वाधिक गर्दी या ठिकाणी होत असते. पण अद्याप त्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळालेला नाही. क वर्ग पर्यटनस्थळामध्ये याचा समावेश व्हावा अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिक करू लागले आहेत. दिघामधील रेल्वे धरण परिसरामध्येही निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करण्यात येणार होते. धरण व बाजूच्या डोंगरावर पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे प्रस्तावित होेते. याविषयी घोषणा झाली प्रत्यक्ष काहीच कार्यवाही झालेली नाही.

महापालिकेने यापूर्वी अडवली - भुतावली परिसरामध्ये निसर्ग पर्यटनकेंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. ६४४ हेक्टर जमिनीवर हे उद्यान विकसित केले जाणार होते.पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावानवी मुंबईमधील एकाही ठिकाणास पर्यटनस्थळाचा दर्जा नाही. गवळीदेवला क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा अशी अपेक्षा निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे. पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे या परिसराच्या विकासाला चालना मिळेल व गैरसोयी दूर होतील अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली आहे.

गवळीदेव धबधबा हा ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील सर्वात सुरक्षित धबधबा आहे. नवी मुंबईला निसर्गाचे लाभलेले वरदान असून येथे येणाºया पर्यटकांसाठी काहीही सुविधा नाहीत. येथील प्रसाधनगृहाचीही दुरवस्था झाली आहे. प्रशासनाने येथील गैरसोयी दूर केल्यास पर्यटकांची संख्या वाढेल.- सचिन पवार, पर्यटक

मोरबेचा प्रकल्पही बारगळलामहापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण आहे. याठिकाणी १०० एकरपेक्षा जास्त भूभागाचा काहीही वापर होत नाही. येथे पर्यटनस्थळ विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यासाठीचा एक प्रस्तावही सर्वसाधारण सभेत आणला होता, परंतु तो विषय बारगळला आहे.अर्थसंकल्पात फक्त तरतूदनवी मुंबईमधील गवळीदेव, अडवली भूतावली निसर्ग पर्यटनस्थळ, खाडीकिनाºयावर कृत्रिम चौपाटी विकसित करणे, मोरबे धरण परिसरात पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी प्रत्येक वर्षी तरतूद केली जात आहे. पण प्रत्यक्षात काहीही खर्च केला जात नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई