शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

गवळीदेव डोंगराचा विकास कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:52 IST

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील एकमेव निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गवळीदेव डोंगर परिसराचा विकास गेल्या ...

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील एकमेव निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गवळीदेव डोंगर परिसराचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच होत आहे. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तिथल्या निसर्ग संपत्तीचा ºहास होत चालला आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली खर्च होणारा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.

एकविसाव्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईचा विकास करताना शहरालगतच्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे. यामुळे पारसिक हिलवर झाडांऐवजी सिमेंटचे जंगल तयार झाले आहे, तर गवळीदेव डोंगर परिसर अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. ट्रेकिंगची अथवा निसर्ग भ्रमंतीची आवड असणाऱ्यांसाठी गवळीदेव परिसर हा शहरालगतचा एकमेव पर्याय आहे; परंतु अनेक वर्षांपासून सदर परिसराचा विकास केवळ कागदावरच होत असल्याने निसर्गप्रेमींची घोर निराशा होत आहे. वनखात्याच्या ताब्यात असलेला हा डोंगरभाग पालिकेने संवर्धनासाठी स्वत:च्या ताब्यात देखील मागितला होता. परंतु तो देण्यास नाकारल्याने पालिकेने वनखात्याला निधी देऊन त्याठिकाणी उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले होते. त्यानुसार वनखात्याला निधी देण्याचा प्रस्ताव देखील महासभेत मंजूर झालेला आहे. त्याद्वारे धबधब्याचा परिसर व गवळीदेव मंदिराकडे जाणाºया मार्गावरील पायºया, शौचालये, बैठक व्यवस्था यासह नव्या वृक्षांची लागवड केली जाणार होती. प्रत्यक्षात मात्र त्यापैकी कसलीही ठोस सुविधा त्याठिकाणी नसल्याने निसर्गप्रेमींना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात क्षणभर विरंगुळ्याच्या शोधात अनेक जण मित्रमंडळींसह अथवा सहकुटुंब गवळीदेव परिसराला भेट देतात. पावसाळ्यात तर धबधब्याच्या आकर्षणामुळे त्याठिकाणी पर्यटकांचा लोंढा येत असतो. या वेळी पर्यटनाच्या नावाखाली चालणाºया दारूच्या पार्ट्यांना व त्यानंतरच्या संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त लावला जातो. मात्र, पावसाळा संपताच संबंधित सर्वच प्रशासनाला पुढच्या पावसाळ्यापर्यंत या ठिकाणाचा विसर पडत असल्याचे पावलोपावली दिसून येत आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी कसलीही ठोस सुविधा त्याठिकाणी नसल्याने निसर्ग भ्रमंतीसाठी येणाºयांची घोर निराशा होत असून, त्यांना गैरसोयीला देखील सामोरे जावे लागत आहे.

दोन ठिकाणी सार्वजनिक शौचालये असून, त्यांचीही मोडतोड झालेली आहे. तर बैठकीसाठी बनवलेल्या लाकडी शेडची मोडतोड करून त्याचे भाग चोरीला गेल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात जोराच्या वाऱ्याने पायवाटांवर आडवी कोसळलेली झाडे अद्याप हटवली नाहीत. त्यामुळे गवळीदेव डोंगर परिसर हे केवळ पावसाळी पर्यटनस्थळ नसून त्याचा कायमस्वरूपी पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई