शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
3
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
4
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
5
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
6
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
7
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
9
रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
10
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
11
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
12
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
13
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
14
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
15
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
16
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
17
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
18
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
19
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
20
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?

गवळीदेव डोंगराचा विकास कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:52 IST

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील एकमेव निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गवळीदेव डोंगर परिसराचा विकास गेल्या ...

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील एकमेव निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गवळीदेव डोंगर परिसराचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच होत आहे. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तिथल्या निसर्ग संपत्तीचा ºहास होत चालला आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली खर्च होणारा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.

एकविसाव्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईचा विकास करताना शहरालगतच्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे. यामुळे पारसिक हिलवर झाडांऐवजी सिमेंटचे जंगल तयार झाले आहे, तर गवळीदेव डोंगर परिसर अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. ट्रेकिंगची अथवा निसर्ग भ्रमंतीची आवड असणाऱ्यांसाठी गवळीदेव परिसर हा शहरालगतचा एकमेव पर्याय आहे; परंतु अनेक वर्षांपासून सदर परिसराचा विकास केवळ कागदावरच होत असल्याने निसर्गप्रेमींची घोर निराशा होत आहे. वनखात्याच्या ताब्यात असलेला हा डोंगरभाग पालिकेने संवर्धनासाठी स्वत:च्या ताब्यात देखील मागितला होता. परंतु तो देण्यास नाकारल्याने पालिकेने वनखात्याला निधी देऊन त्याठिकाणी उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले होते. त्यानुसार वनखात्याला निधी देण्याचा प्रस्ताव देखील महासभेत मंजूर झालेला आहे. त्याद्वारे धबधब्याचा परिसर व गवळीदेव मंदिराकडे जाणाºया मार्गावरील पायºया, शौचालये, बैठक व्यवस्था यासह नव्या वृक्षांची लागवड केली जाणार होती. प्रत्यक्षात मात्र त्यापैकी कसलीही ठोस सुविधा त्याठिकाणी नसल्याने निसर्गप्रेमींना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात क्षणभर विरंगुळ्याच्या शोधात अनेक जण मित्रमंडळींसह अथवा सहकुटुंब गवळीदेव परिसराला भेट देतात. पावसाळ्यात तर धबधब्याच्या आकर्षणामुळे त्याठिकाणी पर्यटकांचा लोंढा येत असतो. या वेळी पर्यटनाच्या नावाखाली चालणाºया दारूच्या पार्ट्यांना व त्यानंतरच्या संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त लावला जातो. मात्र, पावसाळा संपताच संबंधित सर्वच प्रशासनाला पुढच्या पावसाळ्यापर्यंत या ठिकाणाचा विसर पडत असल्याचे पावलोपावली दिसून येत आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी कसलीही ठोस सुविधा त्याठिकाणी नसल्याने निसर्ग भ्रमंतीसाठी येणाºयांची घोर निराशा होत असून, त्यांना गैरसोयीला देखील सामोरे जावे लागत आहे.

दोन ठिकाणी सार्वजनिक शौचालये असून, त्यांचीही मोडतोड झालेली आहे. तर बैठकीसाठी बनवलेल्या लाकडी शेडची मोडतोड करून त्याचे भाग चोरीला गेल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात जोराच्या वाऱ्याने पायवाटांवर आडवी कोसळलेली झाडे अद्याप हटवली नाहीत. त्यामुळे गवळीदेव डोंगर परिसर हे केवळ पावसाळी पर्यटनस्थळ नसून त्याचा कायमस्वरूपी पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई