शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

गवळीदेव डोंगराचा विकास कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:52 IST

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील एकमेव निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गवळीदेव डोंगर परिसराचा विकास गेल्या ...

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : महापालिका क्षेत्रातील एकमेव निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गवळीदेव डोंगर परिसराचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून कागदावरच होत आहे. पावसाळ्याव्यतिरिक्त इतर वेळी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तिथल्या निसर्ग संपत्तीचा ºहास होत चालला आहे. त्यामुळे विकासाच्या नावाखाली खर्च होणारा निधी नेमका जातो कुठे असा प्रश्न निर्माण होत आहे.

एकविसाव्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईचा विकास करताना शहरालगतच्या नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्याकडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे. यामुळे पारसिक हिलवर झाडांऐवजी सिमेंटचे जंगल तयार झाले आहे, तर गवळीदेव डोंगर परिसर अनेक वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहे. ट्रेकिंगची अथवा निसर्ग भ्रमंतीची आवड असणाऱ्यांसाठी गवळीदेव परिसर हा शहरालगतचा एकमेव पर्याय आहे; परंतु अनेक वर्षांपासून सदर परिसराचा विकास केवळ कागदावरच होत असल्याने निसर्गप्रेमींची घोर निराशा होत आहे. वनखात्याच्या ताब्यात असलेला हा डोंगरभाग पालिकेने संवर्धनासाठी स्वत:च्या ताब्यात देखील मागितला होता. परंतु तो देण्यास नाकारल्याने पालिकेने वनखात्याला निधी देऊन त्याठिकाणी उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलले होते. त्यानुसार वनखात्याला निधी देण्याचा प्रस्ताव देखील महासभेत मंजूर झालेला आहे. त्याद्वारे धबधब्याचा परिसर व गवळीदेव मंदिराकडे जाणाºया मार्गावरील पायºया, शौचालये, बैठक व्यवस्था यासह नव्या वृक्षांची लागवड केली जाणार होती. प्रत्यक्षात मात्र त्यापैकी कसलीही ठोस सुविधा त्याठिकाणी नसल्याने निसर्गप्रेमींना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात क्षणभर विरंगुळ्याच्या शोधात अनेक जण मित्रमंडळींसह अथवा सहकुटुंब गवळीदेव परिसराला भेट देतात. पावसाळ्यात तर धबधब्याच्या आकर्षणामुळे त्याठिकाणी पर्यटकांचा लोंढा येत असतो. या वेळी पर्यटनाच्या नावाखाली चालणाºया दारूच्या पार्ट्यांना व त्यानंतरच्या संभाव्य गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून बंदोबस्त लावला जातो. मात्र, पावसाळा संपताच संबंधित सर्वच प्रशासनाला पुढच्या पावसाळ्यापर्यंत या ठिकाणाचा विसर पडत असल्याचे पावलोपावली दिसून येत आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी कसलीही ठोस सुविधा त्याठिकाणी नसल्याने निसर्ग भ्रमंतीसाठी येणाºयांची घोर निराशा होत असून, त्यांना गैरसोयीला देखील सामोरे जावे लागत आहे.

दोन ठिकाणी सार्वजनिक शौचालये असून, त्यांचीही मोडतोड झालेली आहे. तर बैठकीसाठी बनवलेल्या लाकडी शेडची मोडतोड करून त्याचे भाग चोरीला गेल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे. पावसाळ्यात जोराच्या वाऱ्याने पायवाटांवर आडवी कोसळलेली झाडे अद्याप हटवली नाहीत. त्यामुळे गवळीदेव डोंगर परिसर हे केवळ पावसाळी पर्यटनस्थळ नसून त्याचा कायमस्वरूपी पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा, अशी मागणी पर्यटकांकडून होत आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई