शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

दिवाळीसाठी विकासकांची लगबग; ग्राहकांसाठी आकर्षक योजना, नवीन प्रकल्पांना खीळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 02:46 IST

मागील काही वर्षांत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यातच नोटाबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे नवीन घरांच्या निर्मितीला काही प्रमाणात खीळ बसली आहे. बड्या गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने विकासकांचे धाबे दणाणले आहेत.

नवी मुंबई : मागील काही वर्षांत घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. यातच नोटाबंदी, रेरा आणि जीएसटीमुळे नवीन घरांच्या निर्मितीला काही प्रमाणात खीळ बसली आहे. बड्या गुंतवणूकदारांनी हात आखडता घेतल्याने विकासकांचे धाबे दणाणले आहेत. तसेच सर्वसामान्य ग्राहकांनीही घरखरेदीकडे पाठ फिरविल्याने रीयल इस्टेट उद्योगावर मंदीचे सावट निर्माण झाले आहे. असे असले तरी दिवाळीच्या मुहूर्तावर किमान शिल्लक राहिलेली घरे तरी विकली जावीत, यासाठी विकासकांची लगबग सुरू झाली आहे.नवी मुंबईत दिवसेंदिवस घरांची मागणी वाढत आहे; परंतु शहरातील जमिनीचे भाव गगनाला भिडल्याने स्वस्त व परवडणारी घरे बांधणे विकासकांना अवघड होऊन बसले आहे. मागणी व पुरवठा यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. त्यामुळे दीड-दोन वर्षांपासून घरांची मागणी कमालीची मंदावली आहे. मालमत्ता विकल्या न गेल्याने, बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. त्यामुळे रीयल इस्टेट मार्केटवर चिंतेची काजळी पसरली आहे. अशा परिस्थितीत दिवाळीचा मुहूर्त काही प्रमाणात का होईना तारून नेईल, असा विश्वास विकासकांना वाटतो आहे. विशेष म्हणजे, गुढी पाडवा आणि दसºयाच्या मुहूर्तालाही ग्राहकांनी घर खरेदीकडे पाठ फिरविली. त्यामुळे विकासक चांगलेच धास्तावले आहेत. किमान दिवाळीच्या मुहूर्तावर तरी ग्राहकांअभावी धूळखात पडून असलेल्या मालमत्ता विकल्या जातील, असे विकासकांना वाटते आहे. त्यानुसार ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. काहींनी तर घरखरेदीवर चक्क डिस्काउंट देऊ केले आहे. तर अनेकांनी घर नोंदणीवर आकर्षक सवलत जाहीर केली आहे. एकूणच घरखरेदीच्या प्रतीक्षेत असलेला ग्राहक बाहेर पडेल, असे विकासकांना वाटत आहे.जुन्या मालमत्ता विकण्यासाठी धडपडमागील वर्षभरापासून मालमत्ता विक्रीला खीळ बसली आहे. असे असले तरी मालमत्तेच्या किमतीत मात्र सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात घरांच्या किमती स्थिर राहिल्या आहेत. राज्य शासनाने १ एप्रिल रोजी रेडी रेकनेरचे नवीन दर जाहीर केले आहेत. त्यामुळे घरांच्या किमतीत आणखी अल्पशी वाढ झाली आहे. नोटाबंदी, रेरा कायदा, जीएसटी आदींमुळे गेल्या वर्षभरात नवीन गृहप्रकल्पांना फारशी चालना मिळाली नाही. त्यामुळे पडून असलेल्या मालमत्ता विकण्यासाठी विकासकांची धडपड सुरू असल्याचे चित्र दिवाळीत पाहावयास मिळत आहे.बेकायदा घरांना मिळते पसंतीराज्य शासनाने डिसेंबर २0१५पर्यंतची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अनधिकृत घरांचा बाजार तेजीत आला आहे. ही घरे तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त असल्याने ग्राहकांची त्यांना पसंती मिळत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत. गाव गावठाणातील सिडको आणि वन विभागाच्या जागा बळकावून त्यावर रातोरात इमारती उभारल्या गेल्या आहेत. महिनाभरापूर्वी अशा अनधिकृत प्रकल्पातील घरे दहा-बारा लाखांना मिळत होती; परंतु अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या राज्य सरकारच्या घोषणेनंतर या घरांनाही चांगलाच भाव आल्याचे दिसून येते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई